शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

डाक विभागाचा अनाथ बालकांना आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2020 20:52 IST

अनाथाश्रमातील मुलांना आधारशी जोडता यावे म्हणून एक अभियान डाक विभागाने राबविले आहे. याअंतर्गत पहिला कॅम्प श्रद्धानंद पेठ येथील अनाथाश्रमात राबविण्यात आला.

ठळक मुद्देश्रद्धानंद अनाथाश्रमात पहिला कॅम्प : कर्मचारी झाले मुलांचे पालक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जन्माला येणाऱ्या प्रत्येक बालकाची स्वतंत्र एक ओळख असायला हवी, याकरिता प्रत्येक बालकाला आधारशी जोडणे अनिवार्य करण्यात आले आहे. मात्र अनाथाश्रमातील मुलांना आधारशी जोडण्यात अनेक अडचणी निर्माण होतात. विशेषत: त्यांची जन्मनोंद आणि पालकांबाबत अनेक समस्या येतात. हे अडथळे दूर करून त्यांनाही आधार लिंक करण्यासाठी डाक विभागाने पुढाकार घेतला आहे. या मुलांना सहज आधारशी जोडता यावे म्हणून एक अभियान डाक विभागाने राबविले आहे. याअंतर्गत पहिला कॅम्प श्रद्धानंद पेठ येथील अनाथाश्रमात राबविण्यात आला.आधार कार्ड ही आज प्रत्येक नागरिकाची गरज झाली आहे. शासनाच्या कोणत्याही योजना, बँकेचे व्यवहार असो किंवा मोबाईलचे सीमकार्ड घेण्याचा प्रकार, प्रत्येक गोष्ट आधार लिंकशिवाय अपूर्ण आहे. अनाथाश्रमातील मुलांसमोर मात्र आधार लिंकच्या अनेक अडचणी आहेत. एकतर त्यांच्या जन्माच्या नोंदणीची अडचण आहे आणि दुसरीकडे पालक म्हणून कुणाचे नाव नोंदवायचे हाही मोठा प्रश्न आहे. ही अडचण दूर करण्यासाठी डाक विभागाने अनाथाश्रमात आधार नोंदणीचे अभियान राबविले आहे. प्रत्येक बालकाला ओळख, नाव आणि राष्ट्रीयत्वाचा अधिकार असून, बालकांना त्यांची विशिष्ट ओळख असल्यास रस्त्यावर आढळून येणाऱ्या बालकांसोबतच विविध बालगृहांमधील बालकांचे संगोपन, निरीक्षण, नियंत्रण सोयीस्कर होण्यासाठी मदत होऊ शकते. त्यामुळे राज्यभरातील अनाथ बालकांसह विविध कारणांनी बालगृहात दाखल झालेल्या मुलांचे आधार तयार करून त्यांना रेकॉर्डवर आणण्याचा प्रयत्न आहे. यासंदर्भात भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाकडे (यूआयडीएआय) आयोगाने प्रस्ताव सादर केल्यानंतर डाक विभागाने अनाथाश्रमातच आधार नोंदणी माहिती चालविली आहे. जन्मतारखेची अडचण सोडविण्यासाठी अनाथाश्रमातील पोलीस रेकार्डनुसार असलेली जन्मतारखेची नोंद ग्राह्य धरत संबंधित अनाथालयाचा पत्ता बालकांच्या आधार कार्डवर टाकला जात आहे. अनाथाश्रमाचे संचालक आणि नियमित कर्मचाऱ्यांना या बालकांचे पालक म्हणून ग्राह्य धरले जात आहे. त्यानुसार राबविलेल्या शिबिरात अनाथाश्रमाच्या ११० मुलांचे नवीन आधार कार्ड काढण्यात आले. श्रद्धानंद अनाथालयाच्या संचालिका डॉ. निशा बुटी, ललिता गावंडे, उज्ज्वला बांगर, प्रतिमा दिवाणजी, रेखा वाघमारे आदींचे पालक म्हणून नाव नोंदविण्यात आले. मुलांचे भारतीय डाक विभागाच्या आयपीपीबीबीचे नवीन अकाऊंट काढण्याचे काम करण्यात आले.यावेळी सिनिअर पोस्टमास्टर जयेश जोशी व मार्केटिंग ऑफिसर धनंजय राऊत, निनीश कुमार, संजीव कुमार, निवृत्ती केंद्रे, संजय साठे, अजय शेंडे, सांची रामटेके आदींचा सहभाग होता. बालकांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी विविध कायदे अस्तित्वात असले, तरी विविध कायद्यांमुळेही या प्रक्रियेत अडचणी येतात. त्यासोबतच मतिमंद मुले, अनाथ मुले, बालकामगार यांच्या समस्या वेगवेगळ्या आहेत. कागदपत्रांअभावी अनेक योजनांपासून निराधार बालके वंचित राहतात. अनाथालयातील बालकांबरोबरच रस्त्यावरील भिक मागणाऱ्या बालकांचीही आधार नोंदणी करणे गरजेचे आहे. त्यासाठी समाजातील विविध घटकांनी आणि स्वयंसेवी संस्थांनी स्वयंस्फूर्तीने पुढे येण्याची गरज आहे. अशा संस्थांनी सामाजिक भावनेतून बालहक्क जोपासण्यासाठी काम करण्याचे आवाहन धनंजय राऊत यांनी केले.

टॅग्स :Post Officeपोस्ट ऑफिसAdhar Cardआधार कार्ड