शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

 लाथ लागली म्हणून धावत्या ट्रेनमधून तरुणाला खाली फेकले; नागपूर-पुणे गरीबरथमध्ये थरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2022 21:27 IST

Nagpur News पुण्याहून नागपूरकडे येणाऱ्या गरीबरथ या रेल्वेगाडीत एका तरुणाची दुसऱ्याला लाथ लागली. त्यामुळे तरुणांच्या दोन गटात किरकोळ कारणावरून वाद झाला. त्यानंतर आरोपींनी एका तरुणाला धावत्या रेल्वे गाडीतून खाली फेकले.

ठळक मुद्देअकोल्याच्या तरुणाचा मृत्यू

नागपूर : पुण्याहून नागपूरकडे येणाऱ्या गरीबरथ या रेल्वेगाडीत एका तरुणाची दुसऱ्याला लाथ लागली. त्यामुळे तरुणांच्या दोन गटात किरकोळ कारणावरून वाद झाला. त्यानंतर आरोपींनी एका तरुणाला धावत्या रेल्वे गाडीतून खाली फेकले. त्यामुळे त्या तरुणाचा करुण अंत झाला. गुरुवारी सकाळी ८.२०च्या सुमारास बुटीबोरी ते गुमगाव रेल्वे ट्रॅकवर ही थरारक घटना घडली.

शेख अकबर (वय अंदाजे २५ वर्षे, रा. अकोला) असे मृत तरुणाचे नाव आहे. अकबर त्याच्या काही मित्रांसह बाबा ताजुद्दीन यांच्या नागपूर येथे सुरू असलेल्या ऊर्समध्ये सहभागी होण्यासाठी गुरुवारी सकाळी ५.३०च्या सुमारास गरीबरथ या ट्रेनमध्ये अकोला स्थानकावरून चढला. रेल्वेगाडीत मोठी गर्दी असल्याने अकबर त्याचे मित्र जनरल डब्यात दाराजवळ अन्य काही प्रवाशांसह दाटीवाटीने उभे होते. सकाळी ८ च्या सुमारास रेल्वेगाडी बुटीबोरीजवळ आली असताना शेख अकबर याचा पाय (लाथ) दुसऱ्या एका तरुणाला लागला. त्यावरून शेख अकबर आणि आरोपींमध्ये वाद सुरू झाला. हा वाद एवढा वाढला की आरोपी तरुणांनी शेख अकबरला धावत्या ट्रेनमधून खाली फेकले. अनेकांसमोर ही घटना घडली. मात्र, कुणीही कोणतीही मदत अकबरला केली नाही.

गाडी नागपूरच्या अजनी स्थानकावर आल्यानंतर अकबरच्या मित्रांनी रेल्वे पोलिसांना झालेल्या घटनेची माहिती सांगितली. त्यानंतर रेल्वे सुरक्षा दलाचे पोलीस निरीक्षक हरिओम निरंजन, जीआरपीच्या पोलीस निरीक्षक मनीषा काशिद, एपीआय डोळे, एएसआय चहांदे, हवालदार पटले, शेळके, अली तसेच रेल्वे पोलिसांचा ताफा घटनास्थळाकडे रवाना झाला. बरीच शोधाशोध केल्यानंतर बुटीबोरी ते गुमगाव दरम्यान रेल्वेलाइनच्या बाजूला एका तरुणाचा मृतदेह आढळला. तो शेख अकबरच असल्याचे स्पष्ट झाले.

एकानेही चेन ओढली नाही

विशेष म्हणजे, अकबरसोबत चार ते पाच मित्र होते. तर, दुसरे काही तरुणही उर्स बघण्यासाठी अकोला स्थानकावरून रेल्वेत चढले होते. त्यांच्यासमोर अकबरला आरोपींनी धावत्या ट्रेनमधून खाली फेकले. मात्र अकबरच्या मित्रांनी अथवा गर्दीतील कुणीही चेन ओढून रेल्वेगाडी थांबविण्याचे किंवा १३९वर फोन करून मदत मागण्याचे प्रसंगावधान दाखवले नाही. परिणामी घटना घडल्यानंतर सुमारे दीड ते दोन तासपर्यंत अकबरला वैद्यकीय मदत मिळाली नाही. त्यामुळे त्याचा जीव गेला. जेव्हा रेल्वे पोलीस ट्रॅक चेक करत त्याच्याजवळ पोहोचले तोपर्यंत जखमी अकबरचा मृत्यू झाला होता.

संशयित आरोपी ताब्यात

अकबरच्या मित्रांनी दिलेल्या माहितीवरून रेल्वे पोलिसांनी गुन्हा दाखल करून संशयित आरोपी शेख शरिक शेख अब्बास (वय २५, रा. अकोला) याला ताब्यात घेतले. वृत्त लिहिस्तोवर त्याला अटक करण्याची प्रक्रिया सुरू होती.

----

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी