शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

रात्री शेत राखणीला गेलेल्या इसमाला वाघाने केले ठार

By निशांत वानखेडे | Updated: October 16, 2024 16:47 IST

Nagpur : पेंचच्या जमुनिया येथील घटना

नागपूर : मंगळवारी सकाळी वाघाच्या मृत्युची घटना समाेर आल्यानंतर आज वाघाने हल्ला करीत शेतकऱ्याला ठार केल्याची माहिती समाेर आली आहे. रामटेक तालुक्यातील पवनी वनपरिक्षेत्राअंतर्गत टुयापार बिटमध्ये जमुनिया या गावी घडली. हा व्यक्ती मंगळवारी रात्री नेहमीप्रमाणे शेत राखणीला शेतावर गेले हाेते.

सुखराम गुंटू सर्याम (५५) असे मृतक व्यक्तिचे नाव असून टुयापार (जमुनिया) येथील रहिवासी आहेत. बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. मिळालेल्या माहितीनुसार सुखराम सर्याम हे १५ ऑक्टाेबरला नेहमीप्रमाणे सायंकाळी ६ ते ७ वाजताच्या दरम्यान शेत राखणीला गेले हाेते. येथील शेतकरी पुंडलिक इडपाची यांच्या शेताच्या पायवाटेवरून जात असताना जवळच्या शेतात लपलेल्या वाघाने सुखराम सर्याम यांच्यावर हल्ला करून ठार केले असल्याचे सांगण्यात येत आहे. वाघाने त्यांच्या शरीराचे तुकडे केले हाेते. सकाळी शेतकरी शेतावर गेले असताना त्यांना मृतक सर्याम यांचा पाय दिसून आला. धड जवळपास नव्हते. पाहणी केली असत वाघाने फरफटत नेले असलेले त्यांचे धड दूरच्या शेतात आढळून आले. त्यांच्या मृतदेहाचे तुकडे शेतावर विखुरले असल्याचे दिसून आले. ही घटना उघडकीस आल्याने ग्रमास्थांमध्ये दहशत आणि राेषही पसरला आहे.

१० दिवसात दाेघे ठारयाच महिन्याच्या ६ तारखेला बेलदा बिटमधील खानोरा येथील राजकुमार खंडाते यांच्यावरही वाघाने हल्ला करून त्यांना ठार केले होते. अवघ्या १० दिवसांत दुसरी घटना घडल्याने गावकऱ्यांमध्ये दहशत आणि संतापाचे वातावरण आहे. वाघ दररोज माणसांवर व पाळीव प्राण्यांवर हल्ले करत आहेत. पवनी देवलापार परिसरात वाघ व वन्य प्राण्यांच्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून, लोक आपल्या शेतात जाण्यास घाबरत आहेत.

टॅग्स :FarmerशेतकरीNagpur Aakashvaniनागपूर आकाशवाणी केंद्र