शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

पंतप्रधान गोव्यात पोहोचले, पण नागपूरकर ‘पार्किंग’मध्येच अडकले; ढिसाळ नियोजनाचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2022 11:16 IST

केवळ पार्किंगमधून वाहने निघायलाच लागले अडीच तास

नागपूर : ‘गरज सरो अन् वैद्य मरो’ ही म्हण एरवी नेहमीच वापरली जाते. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या ११ प्रकल्पांच्या लोकार्पण-पायाभरणी कार्यक्रमादरम्यान हजारो नागरिकांना ही म्हण प्रत्यक्ष अनुभवायला मिळाली. कार्यक्रम संपल्यावर पंतप्रधान गोव्याला रवाना झाले व तेथे पोहोचलेदेखील. मात्र एम्सच्या शेजारी असलेल्या वाहनांच्या पार्किंगमधून बाहेर निघायला लोकांना अडीच ते तीन तास प्रतीक्षा करावी लागले. हजारो नागरिकांना प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनाचा फटका बसला.

पंतप्रधानांच्या कार्यक्रमाला लोक आणण्यासाठी भाजपच्या नेत्यांना व पदाधिकाऱ्यांना जबाबदारी देण्यात आली होती. विदर्भातील विविध ठिकाणांहून लोक गाड्या व बसेसमधून नागपुरात पोहोचले. दुपारी एकच्या सुमारास कार्यक्रम संपल्यानंतर पंतप्रधान विमानतळाकडे रवाना झाले. तर लोक वाहनांकडे जाऊ लागले. ज्या ठिकाणी वाहने लावण्यात आली होती, त्या मैदानाला एकच एंट्री व एकच एक्झिट होती. त्यामुळे तेथे प्रचंड गर्दी झाली. आश्चर्याची बाब म्हणजे इतर नेतेमंडळी निघताच वाहतूक पोलिसदेखील सुस्तावले. समोर इतका मोठा गोंधळ दिसत असतानादेखील पोलिसांनी वाहने सुरळीत बाहेर काढण्यासाठी कुठलाही पुढाकार घेतला नाही. मैदानात शेकडो वाहने होती व अनेक ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, महिलादेखील अन्नपाण्याविना वाहनांमध्ये बसले होते. परंतु वाहने एक इंचदेखील समोर सरकत नव्हती. यामुळे काही जणांमध्ये वाददेखील झाले.

अखेर पोहोचले पोलिस

प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींच्या बसेसदेखील याच गर्दीत अडकल्या होत्या. दीड तास प्रतीक्षा केल्यानंतर अखेर वरिष्ठ अधिकाऱ्यांना या गोंधळाची माहिती देण्यात आली. सोनेगाव पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दिलीप सागर तेथे पोहोचले. त्यांनी त्या गोंधळातून वाहने काढण्यास सुरुवात केली. मात्र प्रचंड कोंडी झाली होती व त्यामुळे अनेकांना अडीच तासांहून अधिक वेळ अडकून रहावे लागले.

कार्यकर्त्यांमध्ये संताप

ज्या पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांना कार्यक्रमस्थळी आणले होते, ते या कोंडीच्या वेळी तेथून गायब झाले होते. यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड संताप होता. अनेकांनी सार्वजनिकपणे आपल्या भावना व्यक्तदेखील केल्या.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीnagpurनागपूर