शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कळमन्यात १५ वर्षीय बालिकेचा बालविवाह रोखला; बालविवाह पोलीस व जिल्हा बाल संरक्षण कक्षातर्फे कारवाई

By मंगेश व्यवहारे | Updated: April 4, 2024 17:40 IST

वरात पोहचली होती लग्नमंडपात , कायद्याचा धाक दाखविताच मंडळींची उडाली भंबेरी.

मंगेश व्यवहारे ,नागपूर : कळमना भागातील विजयनगर भागात १५ वर्षीय बालिकेचा होणारा बालविवाह पोलीस व जिल्हा बाल संरक्षण कक्षातर्फे कारवाई करून रोखण्यात आला.

यासंदर्भात चाईल्ड लाईनच्या हेल्पलाईनवर विजयनगर भागात एका बालिकेचा बालविवाह होणार असल्याची तक्रार प्राप्त झाली होती. त्या तक्रारीच्या अनुषंगाने बाल संरक्षण पथक पोलीसांच्या सहकार्याने लग्नाच्या मंडपात दाखल झाले. छत्तीसगड येथील राजनांदगाव येथून मुलाची वरात लग्नमंडपात दाखल झाली होती. लग्नाची संपूर्ण तयारी झालेली असताना पथकाने धाड टाकून मुलीच्या आईवडीलांकडे मुलीचे कागदपत्र व वयाचा दाखला मागितला. परंतु घरच्यांनी कुठलाच पुरावा दिला नसल्याने, बाल संरक्षणाचे पथक ती ज्या शाळेत शिक्षण घेत होती, त्या शाळेतून वयाचा दाखला घेतला असता बालिका १५ वर्ष वयाचीच निघाली. त्यामुळे बाल संरक्षण पथक व पोलीसांनी बालिकेच्या आईवडीलांना बाल विवाह प्रतिबंधक कायदा २००६ अन्वये लग्न झाल्यास कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल, असा दम दिल्यानंतर लग्नात उपस्थित मंडळींची भंबेरी उडाली.

पोलीसांकडून मुलांकडच्यांनाही कायद्याची माहिती देताच वर मंडळींनीही परतीचा मार्ग धरला. मुलीच्या आईवडीलांकडून कायद्यान्वये हमीपत्र लिहून घेत, बालिकेला पोलीसांद्वारे काळजी व संरक्षणासाठी बालगृहात दाखल करण्यात आले.

ही कारवाई जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी भारती मानकर व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुश्ताक पठाण यांच्या मार्गदर्शनात बाल संरक्षण अधिकारी साधना ठोंबरे, मिनाक्षी धडाडे, अंगणवाडी सेविका कल्पना नागपूरे आदींकडून करण्यात आली.

जिल्हाधिकाऱ्यांनी काढले परिपत्रक-

जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी कोणीही बालविवाह लावल्यास मंडप डेकोरेशन, भटजी, पंड़ीत, मौलवी, आचारी, नातेवाईक, मध्यस्थी, प्रिंटींग प्रेस यांच्यावर कार्यवाही होणार असल्याचे परिपत्रक काढले.

टॅग्स :nagpurनागपूरPoliceपोलिस