शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

९९ वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन : ... नाही तर रंग पुन्हा सुना सुना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2019 01:03 IST

काळाची पावले ओळखून बदल केला नाही तर कोणतीही कला टिकत नाही. तमाशा या पारंपरिक लोककलेबाबत असेच झाले का ही भीती व्यक्त होत असताना रघुवीर खेडकर या हरहुन्नरी कलावंताने या तमाशात जीव ओतला. तमाशात नाविन्यपूर्ण गोष्टींचा अंतर्भाव करून नव्या रूपात घडविले. त्यांच्या या तुफान गाजलेल्या तमाशाची झलक शनिवारी रसिकांनी ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या व्यासपीठावरून अनुभवली.

ठळक मुद्देखेडकरांच्या तमाशाला रसिकांची दाद : गण, गवळण, वगाचे नाविन्यपूर्ण दर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : काळाची पावले ओळखून बदल केला नाही तर कोणतीही कला टिकत नाही. तमाशा या पारंपरिक लोककलेबाबत असेच झाले का ही भीती व्यक्त होत असताना रघुवीर खेडकर या हरहुन्नरी कलावंताने या तमाशात जीव ओतला. तमाशात नाविन्यपूर्ण गोष्टींचा अंतर्भाव करून नव्या रूपात घडविले. त्यांच्या या तुफान गाजलेल्या तमाशाची झलक शनिवारी रसिकांनी ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या व्यासपीठावरून अनुभवली.पुरुषोत्तम दारव्हेकर रंगमंच, रेशीमबाग मैदान येथे रघुवीर खेडकर व कलावंतांचा तमाशा सादर झाला. आई कांताबाई सातारकर यांच्या प्रेरणेतून तमाशा कलेत आलेल्या खेडकरांच्या संचात १३० पेक्षा अधिक कलावंत सहभागी आहेत. पारंपरिक तमाशात दिसणारे गण, गवळण आणि वगनाट्य येथेही होते, मात्र त्यांचे सादरीकरण नव्या रूपात दिसले. गण अर्थात ईश्वर स्तवनाने या तमाशाला सुरुवात झाली. ‘आधी गणाला रणी आणा, नाही तर रंग पुन्हा सुना सुना...’ या स्तवनाने नृत्याविष्कार करीत रसिकांच्या सेवेसाठी ईश्वराची साथ आणि आशीर्वाद राहण्याची कामना केली. तमाशा म्हटला की गवळण आलीच. त्यानुसार सजूनधजून मथुरेच्या बाजारी निघालेल्या गवळणी पुढे आल्या व एकेक करीत त्यांनी ओळखही दिली. अर्थात ही ओळख करून देण्यात ‘मावशी’ हे पारंपरिक पात्र पुढे होतेच. यादरम्यान कलावंतांनी २१ व्या शतकातील आधुनिक कृष्णलीला सादर केल्या, ज्यात गवळणींच्या मोहक नृत्याची झलक बघायला मिळाली. ‘गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा...’ हे दमदार नृत्य कलावंतांनी सादर केले. पुढे कलावंतांनी वगनाट्य सादर केले. मात्र या नाट्यात नेहमी तमाशात सादर होणारे कथानक नव्हते तर काही लोकप्रिय पारंपरिक आख्यायिका व आजच्या काळातील प्रसंगाचे चित्रण होते. महिषासूर वधाचा प्रसंग तसेच शिवाजी महाराज, भगतसिंग यांचे जीवन दर्शन आणि भारतीय जवानांची गाथा कलावंतांनी मांडली. पुढे आधुनिक रंगाचा हा तमाशा उत्तरोत्तर बहरत गेला. तमाशातील कलावंतांनी अभिनयाने, विनोदाने, गाण्याने, नृत्याने प्रेक्षकांची करमणूक केली.

टॅग्स :Natakनाटकmarathiमराठी