शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

९९ वे अ.भा. मराठी नाट्यसंमेलन; बाल रंगभूमीची अवहेलना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 11:23 IST

अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात महाराष्ट्रातील रंगभूमीशी जुळलेल्या सर्व प्रकारच्या नाटकांचा व कलाप्रकारांचा अंतर्भाव करण्याचा दावा करणाऱ्या अ.भा. मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांना बाल रंगभूमीचा मात्र विसर पडला.

ठळक मुद्देना बालनाटक, ना परिसंवाद, ना चर्चा बाल नाटककारांची खंत

निशांत वानखेडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात महाराष्ट्रातील रंगभूमीशी जुळलेल्या सर्व प्रकारच्या नाटकांचा व कलाप्रकारांचा अंतर्भाव करण्याचा दावा करणाऱ्या अ.भा. मराठी नाट्य परिषदेच्या अध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांना बाल रंगभूमीचा मात्र विसर पडला. संपूर्ण संमेलनात बाल रंगभूमीचा कुठेही अंतर्भाव झाला नाही. बाल नाटक तर सोडाच पण कुठला परिसंवाद किंवा बालनाट्याची चर्चाही संमेलनात दिसली नाही. यामुळे नाटकांच्या या मेळाव्यात बाल रंगभूमीची अवहेलना झाल्याची खंत बाल नाटककारांनी व्यक्त केली.प्रौढ रंगभूमी हे नाट्य क्षेत्रातले हायस्कूल असेल तर बाल रंगभमी ही प्राथमिक शाळा आहे. याच शाळेत प्रवेश घेतल्यानंतर नाट्य कलावंतांना हायस्कूलमध्ये प्रवेश मिळतो. म्हणूनच बाल रंगभूमी ही प्रौढ रंगभूमीच्या यशाची शिडी आहे असेही म्हणायला हरकत नाही. कारण उद्याचा सुजाण कलावंत आणि प्रेक्षक घडवायचा असेल तर बाल रंगभूमीला जिवंत ठेवणे, प्रोत्साहन देणे तितकेच आवश्यक आहे. मग महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशातील सर्वात मोठ्या नाटकांच्या मेळाव्यात बाल नाटकांना स्थान देण्यात येऊ नये, यापेक्षा दुसरी शोकांतिका ती काय? आयोजनातील ‘पुन्हा सही रे सही’ या नाटकांपासून सुरुवात केल्यास नऊ एकांकिका, दोन झाडीपट्टीची नाटके, दोन परिसंवाद, एकपात्री प्रयोग, रघुवीर खेडकरांचा तमाशा, तीन इतर नाटके, स्वरानंदनवन हा वाद्यवृंदांचा कार्यक्रम, असे काही कार्यक्रम संमेलनात आहेत. संमेलनात ‘गीत रामायण’ हा बाल वाद्यवृंदांचा कार्यक्रम आहे. परंतू वाद्याच्या समावेशाने बाल नाटकांचा अंतर्भाव झाला असे म्हणता येणार नाही. ‘संमेलनाची वारी’ या विशेष कार्यक्रमात बाल कलावंतांचा सहभाग होता, मात्र तो नाच गाण्यापुरताच. यातून बाल नाटकांना प्रोत्साहन कसे मिळेल हा प्रश्नच आहे. बाल नाटक म्हणजे बालकांनीच सादर केलेले नाटक असा होत नाही तर बालकांसाठी, त्यांच्यातील भावना, अभिरुची व प्रतिभेला प्रोत्साहन देणारे सादरीकरण म्हणजे बाल नाट्य होय. पण असे झाले नाही. ८५ च्या काळात बीड येथे झालेल्या नाट्य संमेलनात बाल नाटकांचा समावेश करण्यात आला होता व तेव्हापासून सातत्याने एकतरी बाल नाटक राहील याची तजवीज करण्यात येत होती. मात्र नागपूरच्या संमेलनात हा प्रवास पुन्हा खंडित झाल्याचे बोलले जात आहे.संमेलनात आणि एकु णच रंगभूमीवर सध्या कार्यरत असलेले ७० टक्के कलावंत हे बाल रंगभूमीतूनच पुढे आले आहेत. मात्र तरीही नाट्य संमेलनात बालनाट्याला स्थान देण्यात आले नाही, याला काय म्हणावे?

बाल नाटकांना संधी मिळावी यासाठी अ.भा. मराठी नाट्य परिषदेकडे अर्जही केला होता. त्यामुळे बाल कलावंतांमध्येही नाटकांचे, नाट्य संमेलनाचे आकर्षण निर्माण होईल, ही बाब अनेकांच्या लक्षात आणून दिली होती. मात्र त्याची दखल घेतली गेली नाही. माझे नाटक झाले नाही याची खंत नाही, पण महाराष्ट्रातून कुणाचेही एकतरी बाल नाटक संमेलनात असावे, अशी अपेक्षा होती. मात्र ती अपूर्ण राहिल्याची खंत आहे.- संजय पेंडसे,बाल नाटककार

टॅग्स :Natakनाटक