शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

९९ वे अ.भा. मराठी नाट्य संमेलन; मुंबई-पुण्याबाहेरही आहे रंगभूमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2019 11:27 IST

पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या विभागातसुध्दा कलाकार मोठ्या संख्येने पुढे येत असून अस्सल मातीतलं नाटक हे गावाकडून शहराकडे येत असल्याचं मत मुंबई पुण्याच्या बाहेरील रंगकर्मींनी नाट्य संमेलनात रविवारी झालेल्या परिसंवादात मांडले.

ठळक मुद्देमुंबईबाहेरील रंगकर्मींनी मांडले परिसंवादात जळजळीत वास्तव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नाटक स्वांत सुखाय या उक्तीप्रमाणे मुंबई-पुण्यातच फक्त व्यावसायिक किंवा धंदेवाईक नाटक नसून पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ या विभागातसुध्दा कलाकार मोठ्या संख्येने पुढे येत असून अस्सल मातीतलं नाटक हे गावाकडून शहराकडे येत असल्याचं मत मुंबई पुण्याच्या बाहेरील रंगकर्मींनी नाट्य संमेलनात रविवारी झालेल्या परिसंवादात मांडले. मराठी रंगभूमी उणे मुंबई पुणे या परिसंवादात जमलेल्या मान्यवरांनी मुंबई- पुण्याबाहेरील रंगकर्मींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी ज्येष्ठ कलाकारांनी सरकारशी बोलून ठोस पावलं उचलायला हवीत याबद्दल पुनरुच्चार केला.या परिसंवादात वामन पंडित, रजनीश जोशी, दत्ता पाटील, सलीम शेख, डॉ सतीश पावने, विवेक खेर, मुकुंद पटवर्धन ही मुंबई-पुण्याबाहेरील रंगकर्मी मंडळी सहभागी झाली होती. या गावाकडच्या सच्च्या रंगकर्मींना यावेळी बोलतं केलं पत्रकार राज काझी यांनी. मुकुंद पटवर्धन यांनी राज्यात होणाऱ्या राज्य नाट्य स्पर्धा, बालनाट्यस्पर्धा यांवर भाष्य केलं. जोपर्यंत एका विशिष्ट मर्यादेच्या बाहेर जाऊन या स्पर्धांना वेगळं रूप दिलं जाणार नाही तसेच दोन ते तीन सेंटरना एकत्र करून केल्या जाणाऱ्या स्पर्धांना जोपर्यंत वेगवेगळं केले जाणार नाही तोपर्यंत मुंबई-पुण्याबाहेरील कलाकाराला योग्य तो न्याय मिळणार नाही. ९० नाटकांमध्ये फक्त ३ नाटकं निवडणे हा कोणता न्याय, असा सवालही त्यांनी उपस्थितांना विचारला. बाकी मान्यवरांनी अडचणींबरोबरच घडत असलेल्या बदलाबाबतही विस्तृत भाष्य केले. मुळात रंगभूमी म्हटलं की मुंबई- पुणे आता जरा नाशिकपर्यंत तरी म्हटली जाते. मात्र सध्याचं चित्र उलटं आहे. विदर्भ, मराठवाड्यातील अस्सल कलाकारही मुख्य धारेत आपली चमक दाखवतायत. फक्त त्यांना त्यांच्या सुरुवातीच्या काळात लागणारी मोलाची मदत आणि योग्य साथ फार गरजेची आहे. शासन दरबारी राज्य नाट्य स्पर्धा आणि बालरंंगभूमीविषयी भयंकर उदासीनता आहे. त्याच त्याच पध्दतीने आणि नियमांनी आजही या स्पर्धा राबविल्या जात आहेत. त्यामुळे खरंच कलाकार हा मुंबई-पुण्याबाहेर पोहचेल का, असा प्रश्न पडतो. मुळात सध्या सोशल मीडियाच्या प्रसारामुळे जग जवळ आलेलं असल्याने मुंबई-पुण्याच्या बाहेरील रंगकर्मीही या उदासीन प्रवृत्तीला न बळी पडता बाहेर पडतायत आणि आपलं करिअर करतायत. मात्र ही अशी उदाहरणं हाताच्या बोटावर मोजता येणारी आहेत अशी खंत मान्यवरांनी यावेळी व्यक्त केली.

अनेक ठिकाणी नाट्यगृहच नाहीतप्रायोगिक, हौशी आणि बालरंगभूमीवर मुंबई पुण्याबाहेर काम करणारे रंगकर्मी हे रंगभूमीच्या प्रेमापोटी मिळेल त्या साधनात, अपुºया पैशात आपली नाटकाची आवड जपत असतात. मात्र वर्षानुवर्षे हे करणं एक तर शक्य नसतं किंवा ते त्यांच्या आवाक्याबाहेरचं होतं. त्यामुळे सरकारने अशा रंगकर्मींच्या पाठिशी ठामपणे उभं राहण्याची गरज आहे. मुंबई-पुण्याबाहेर नाट्यगृहांची अवस्थाही वाईट आहे. अनेक ठिकाणी नाट्यगृहच उपलब्ध नाहीत. मात्र तरीही जिद्दीने एका तडफेने हे रंगकर्मी नवनवीन कल्पना घेऊन दरवर्षी आपल्या नाटकांचे प्रयोग करत ़असतात. मात्र सरकारने गावातील या रंगकर्मींसाठी राज्य नाट्य स्पर्धा आणि इतर शासकीय स्पर्धांची बक्षिसाची रक्कमही दुपटीने वाढवण्याची गरज आहे. जेणेकरून या रंगकर्मींना पुढे जाऊन चांगलं नाटक करण्याची उर्मी मिळेल, असे मतही मान्यवरांनी यावेळी मांडलं. सुरेश भट सभागृहात झालेल्या या परिसंवादाला वामन केंद्रे, शफाअत खान अशा ज्येष्ठ नाट्यकर्मींचीही विशेष उपस्थिती होती.

टॅग्स :Natakनाटक