शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
4
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
5
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
6
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
7
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
8
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
9
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
10
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
11
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
12
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
13
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
14
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
15
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
16
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
17
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
18
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
19
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
20
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर

नागपूर शहरात ९७ इमारती धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 20:50 IST

महापालिकेच्या झोन स्तरावर केलेल्या सर्वेक्षणात शहरातील ३२० इमारती असुरक्षित व जीर्ण झाल्याचे आढळून आले होते. यातील १०८ इमारती पाडण्यात आलेल्या आहेत. असुरक्षित १७३ इमारती अजूनही वापरात आहेत. यातील अतिधोकादायक असलेल्या ९७ इमारती १५ दिवसात पाडण्याचे निर्देश मनपा प्रशासनाने दिले आहेत.

ठळक मुद्देमनपाने पाडण्यासाठी बजावल्या नोटीस : १७३ असुरक्षित इमारतींचा वापर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेच्या झोन स्तरावर केलेल्या सर्वेक्षणात शहरातील ३२० इमारती असुरक्षित व जीर्ण झाल्याचे आढळून आले होते. यातील १०८ इमारती पाडण्यात आलेल्या आहेत. असुरक्षित १७३ इमारती अजूनही वापरात आहेत. यातील अतिधोकादायक असलेल्या ९७ इमारती १५ दिवसात पाडण्याचे निर्देश मनपा प्रशासनाने दिले आहेत.संबंधित इमारत मालकांना यापूर्वीही नोटीस बजावल्या असतानाही जीर्ण इमारती पाडण्यात आलेल्या नाहीत. अशा इमारत धारकाकडून प्रत्येकी २५ हजार रुपये दंड वसूल केला जाणार आहे. पावसाळा आला की दरवर्षी जीर्ण इमारतींचा मुद्दा ऐरणीवर येतो. जीर्ण इमारतीमुळे मोठा अनर्थ होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात महापालिका प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे. महाल, इतवारी व गांधीबाग यासारख्या भागात सर्वाधिक जीर्ण इमारती आहेत.३५ इमारतींना दुरुस्तीचे आदेशवापरात असलेल्या परंतु धोकादायक अशा २५ इमारती खाली करून दुरुस्ती तर ३५ इमारतींना दुरुस्ती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या इमारत मालकांना मागील वर्षीही नोटीस बजावण्यात आली होती. परंतु नोटीसनंतरही अनेकांनी दुरुस्ती केलेली नाही.पावसाळा आला की नोटीसमहानगरपालिका कायद्यानुसार राज्य शासनाच्या २०१५ च्या निर्देशानुसार मान्सूनपूर्व तयारीचा आढावा व तपासणी करून झोन अधिकाऱ्यांंना याबाबतचा अहवाल पाठवावयाचा आहे. त्यानुसार पावसाळा आला की, संबंधित जीर्ण इमारत मालकांना नोटीस बजावून खानापूर्ती करून अहवाल पाठविला जातो. त्यामुळे मागील अनेक वर्षांत धोकादायक इमारतींचा प्रश्न निकाली निघालेला नाही.मालक व भाडेकरू वादझोन कार्यालयांनी मालकांना इमारती पाडण्याचे निर्देश दिले आहेत. तथापि, मालक आणि भाडेकरू यांच्यातील वादांमुळे बहुतेक जीर्ण इमारती अद्याप वापरात असून काही प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत. त्यामुळे मनपालाही कारवाई करता येत नाही.२० हजार इमारती ३० वर्षांपूर्वीच्यानागपूर शहरात २० हजाराहून अधिक इमारती ३० वर्षापूर्वीच्या आहेत. महाराष्ट्र महानगरपालिका कायद्यानुसार ३० वर्षावरील इमारतींचे आॅडिट करावे लागते. मात्र नागपूर शहरात या कायद्याचे सर्रास उल्लघन होत आहे. शहरात ६० वर्षाहून अधिक वर्षापूर्वीच्या इमारतींची संख्या हजाराहून अधिक आहे. 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाBuilding Collapseइमारत दुर्घटना