शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

नागपूर शहरात ९७ इमारती धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 20:50 IST

महापालिकेच्या झोन स्तरावर केलेल्या सर्वेक्षणात शहरातील ३२० इमारती असुरक्षित व जीर्ण झाल्याचे आढळून आले होते. यातील १०८ इमारती पाडण्यात आलेल्या आहेत. असुरक्षित १७३ इमारती अजूनही वापरात आहेत. यातील अतिधोकादायक असलेल्या ९७ इमारती १५ दिवसात पाडण्याचे निर्देश मनपा प्रशासनाने दिले आहेत.

ठळक मुद्देमनपाने पाडण्यासाठी बजावल्या नोटीस : १७३ असुरक्षित इमारतींचा वापर

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महापालिकेच्या झोन स्तरावर केलेल्या सर्वेक्षणात शहरातील ३२० इमारती असुरक्षित व जीर्ण झाल्याचे आढळून आले होते. यातील १०८ इमारती पाडण्यात आलेल्या आहेत. असुरक्षित १७३ इमारती अजूनही वापरात आहेत. यातील अतिधोकादायक असलेल्या ९७ इमारती १५ दिवसात पाडण्याचे निर्देश मनपा प्रशासनाने दिले आहेत.संबंधित इमारत मालकांना यापूर्वीही नोटीस बजावल्या असतानाही जीर्ण इमारती पाडण्यात आलेल्या नाहीत. अशा इमारत धारकाकडून प्रत्येकी २५ हजार रुपये दंड वसूल केला जाणार आहे. पावसाळा आला की दरवर्षी जीर्ण इमारतींचा मुद्दा ऐरणीवर येतो. जीर्ण इमारतीमुळे मोठा अनर्थ होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात महापालिका प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे. महाल, इतवारी व गांधीबाग यासारख्या भागात सर्वाधिक जीर्ण इमारती आहेत.३५ इमारतींना दुरुस्तीचे आदेशवापरात असलेल्या परंतु धोकादायक अशा २५ इमारती खाली करून दुरुस्ती तर ३५ इमारतींना दुरुस्ती करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या इमारत मालकांना मागील वर्षीही नोटीस बजावण्यात आली होती. परंतु नोटीसनंतरही अनेकांनी दुरुस्ती केलेली नाही.पावसाळा आला की नोटीसमहानगरपालिका कायद्यानुसार राज्य शासनाच्या २०१५ च्या निर्देशानुसार मान्सूनपूर्व तयारीचा आढावा व तपासणी करून झोन अधिकाऱ्यांंना याबाबतचा अहवाल पाठवावयाचा आहे. त्यानुसार पावसाळा आला की, संबंधित जीर्ण इमारत मालकांना नोटीस बजावून खानापूर्ती करून अहवाल पाठविला जातो. त्यामुळे मागील अनेक वर्षांत धोकादायक इमारतींचा प्रश्न निकाली निघालेला नाही.मालक व भाडेकरू वादझोन कार्यालयांनी मालकांना इमारती पाडण्याचे निर्देश दिले आहेत. तथापि, मालक आणि भाडेकरू यांच्यातील वादांमुळे बहुतेक जीर्ण इमारती अद्याप वापरात असून काही प्रकरणे न्यायालयात प्रलंबित आहेत. त्यामुळे मनपालाही कारवाई करता येत नाही.२० हजार इमारती ३० वर्षांपूर्वीच्यानागपूर शहरात २० हजाराहून अधिक इमारती ३० वर्षापूर्वीच्या आहेत. महाराष्ट्र महानगरपालिका कायद्यानुसार ३० वर्षावरील इमारतींचे आॅडिट करावे लागते. मात्र नागपूर शहरात या कायद्याचे सर्रास उल्लघन होत आहे. शहरात ६० वर्षाहून अधिक वर्षापूर्वीच्या इमारतींची संख्या हजाराहून अधिक आहे. 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाBuilding Collapseइमारत दुर्घटना