शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

बारावीत ९५ टक्के मिळविणारा सलीम करतोय गवंडी काम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2019 00:05 IST

परीक्षेचा पॅटर्न बदलला, पेपर कठीण होता, पेपर बरोबर तपासले गेले नाही, अशा प्रकारच्या अनेक सबबी कमी गुण मिळालेल्या बारावीच्या विद्यार्थ्यांनी सांगुन पालकांचे समाधान केले. अशा प्रकराची बोंबाबोंब करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलीम महेबूब शेख या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांने यश केवळ परिश्रम आणि जिद्दीच्या बळावरच मिळू शकते हे दाखवून दिले. कुठलीही शिकवणी न लावता सलीमने बारावीच्या परीक्षेत ९५.४० टक्के गुण मिळविले. विशेष म्हणजे सलीम बांधकाम मजुराचा मुलगा आहे. भविष्यातील शिक्षणाचा मार्ग सुकर करण्यासाठी वडिलांसोबत गवंडी काम करतो आहे.

ठळक मुद्देपरिस्थितीमुळे शिक्षणाचा मार्ग खडतर : जिद्द मात्र आयएएस बनण्याची

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : परीक्षेचा पॅटर्न बदलला, पेपर कठीण होता, पेपर बरोबर तपासले गेले नाही, अशा प्रकारच्या अनेक सबबी कमी गुण मिळालेल्या बारावीच्या विद्यार्थ्यांनी सांगुन पालकांचे समाधान केले. अशा प्रकराची बोंबाबोंब करणाऱ्या विद्यार्थ्यांना सलीम महेबूब शेख या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांने यश केवळ परिश्रम आणि जिद्दीच्या बळावरच मिळू शकते हे दाखवून दिले. कुठलीही शिकवणी न लावता सलीमने बारावीच्या परीक्षेत ९५.४० टक्के गुण मिळविले. विशेष म्हणजे सलीम बांधकाम मजुराचा मुलगा आहे. भविष्यातील शिक्षणाचा मार्ग सुकर करण्यासाठी वडिलांसोबत गवंडी काम करतो आहे. परिस्थितीची आडकाठी त्याच्यासमोर असली तरी, आयएएस बनण्याची जिद्द त्याने बाळगली आहे.हिंगणा तालुक्यातील सुकळी बेलदार या गावचा सलीम शेख हा विद्यार्थी आहे. त्याचे प्राथमिक शिक्षण जि.प.च्या शाळेत झाले. सहाव्या वर्गात त्याची नवोदय विद्यालयात निवड झाली. तेथूनच त्याने बारावीची परीक्षा उत्तीर्ण केली. त्याचे वडील मेहबूब शेख हे बांधकामावर मजूर म्हणून काम करतात आणि घरात सहा जणांचे कुटुंब आहे. कमावणारे कुणीच नसल्याने एकट्यावर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आहे. शिक्षणात सलीमने गुणवत्ता मिळविली असली तरी, वडिलांच्या परिस्थितीची त्याला जाणीव आहे. केवळ शिक्षकांचे मार्गदर्शन व मनातील जिद्द व परिश्रम हेच त्याचे भांडवल. त्यामुळे प्रामाणिकपणे तो दररोज सहा तास अभ्यास करायचा. शिक्षणातील प्रगतीच आपली दशा बदलू शकते हा विचार आणि आईवडिलांचे कष्ट याबाबी त्याला प्रेरणा द्यायच्या. गुणवत्तेत आल्यानंतर सलीमच्या कुटुंबाला अत्यंत आनंद झाला. पण परिस्थितीमुळे बाप हतबल झाला. मुलात क्षमता, गुणवत्ता असतानाही उच्च शिक्षण देऊ शकत नाही, ही खंत त्यांना बोचते आहे.परिस्थितीमुळे व्यावसायिक शिक्षणाचा मार्ग निवडला नाहीसलीमला वडिलांच्या कष्टाची जाणीव आहे. त्याने घरच्यांना धीर देत एक दिवस नक्कीच बदल घडवेल असा आशावाद दिला. रिकामा असल्यामुळे वडिलांसोबत गवंडी कामही करायला लागला. शिक्षणासाठी आपण पैसे खर्च करू शकणार नाही या विचाराने त्याने इंजिनीयरिंग व मेडिकलचा मार्गच निवडला नाही. त्याने आता शहरातील शिवाजी विज्ञान महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे. परंतु आता गावावरून कॉलेजला दररोज येण्याकरिता लागणारा खर्च, पुस्तके व शैक्षणिक साहित्याकरिताचा खर्च पुढे कुठून करायचा हा प्रश्न त्याला अस्वस्थ करतोय.परिस्थिती आणि ध्येयाचा संघर्षयूपीएससीची परीक्षा देऊन भारतीय प्रशासन सेवेत (आयएएस) दाखल होण्याचे सलीमचे ध्येय आहे. परंतु गरिबीची परिस्थिती आपल्याला आपले ध्येय गाठण्यापासून दूर तर ठेवणार नाही ना याची चिंता त्याला सतावत आहे. त्याची परिस्थिती आणि ध्येयाचा संघर्ष सुरू आहे. या गुणवंत मुलाला त्याचे ध्येय गाठण्यासाठी हवी आहे, समाजाची मदत.

टॅग्स :nagpurनागपूरHSC Exam Resultबारावी निकाल