शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

समृद्धी महामार्गासाठी नागपूर जिल्ह्यातील ९० टक्के जमीन उपलब्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2018 11:47 IST

नागपूर-मुंबई या राज्य शासनाच्या प्राधान्यक्रम असलेल्या समृद्धी महामार्ग प्रकल्पासाठी नागपूर व वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे ९०.१५ टक्के जमीन उपलब्ध झाली आहे.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना ६१४ कोटी ३० लाख रुपये मोबदला विभागातील ७०० हेक्टर आर जमिनीच्या खरेदीची प्रक्रिया पूर्ण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर-मुंबई या राज्य शासनाच्या प्राधान्यक्रम असलेल्या समृद्धी महामार्ग प्रकल्पासाठी नागपूर व वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी दिलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे ९०.१५ टक्के जमीन उपलब्ध झाली आहे. यामध्ये नागपुरातील ९५.२३ टक्के तर वर्धा जिल्ह्यातील ८७.९४ टक्के जमीन उपलब्ध झाली आहे.समृद्धी महामार्गासाठी नागपूर व वर्धा जिल्ह्यातील एकूण १ हजार ४३ हेक्टर जमिनीची आवश्यकता असून यामध्ये खासगी वाटाघाटीने ८०२.८५ हेक्टर जमीन खरेदी करावयाची आहे. तर १८७.६७ हेक्टर शासकीय जमीन या प्रकल्पासाठी निश्चित करण्यात आली आहे. विभागातील १ हजार १६० गटातील शेतकऱ्यांकडून जमीन खरेदी करावयाची असून त्यापैकी १ हजार ००६ गटातील शेतकऱ्यांकडून ७००.२८ हेक्टर आर जमीन प्रत्यक्ष खरेदी करण्यात आली आहे.जमीन खरेदीसाठी शेतकरी सभासदांना ६१४ कोटी ३० लाख ३३ हजार ८३१ रुपये अदा करण्यात आले आहे. नागपूर जिल्ह्यातील २१ गावातील २८.४२ किलोमीटर जमिनीच्या खरेदीला सुरुवात झाली. यामध्ये २७९ गट क्रमांकातील २०२.१९ हेक्टर आर जमिनीच्या खरेदीची प्रक्रिया सुरू झाली. त्यापैकी २४९ गट क्रमांकातील शेतकऱ्यांनी १८७.१५ हेक्टर आर जमीन उपलब्ध करून दिली आहे. यासाठी शेतकऱ्यांना २४५ कोटी ९२ लाख रुपये मोबदला देण्यात आला आहे. जिल्ह्यात सरासरी ९५.२३ टक्के शेतकऱ्यांनी या प्रकल्पाला जमीन उपलब्ध करून दिली आहे. तसेच ९७.५२ हेक्टर आर ही शासकीय जमीन असून १५.८३ हेक्टर आर हे वनजमिनीचे क्षेत्र आहे. त्यामुळे या प्रकल्पासाठी जिल्ह्यातील एकूण २८४.६७ हेक्टर आर जमीन उपलब्ध झाली आहे. वर्धा जिल्ह्यातील सेलू, वर्धा आणि आर्वी या तालुक्यातील ३४ गावातील ६०.७३ किलोमीटर लांबीसाठी जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया सुरू असून यामध्ये ९०.१५ हेक्टर आर जमीन शासकीय तर ३४.७७ हेक्टर आर जमीन आहे. तसेच ६००.६६ हेक्टर आर जमीन खरेदी करण्यात येत आहे. ८८१ गट क्रमांकातील शेतकऱ्यांकडून खरेदीची प्रक्रिया करण्यात आली असून त्यापैकी ५१३.१३ हेक्टर जमीन उपलब्ध झाली आहे. या जमिनीचा मोबदला म्हणून ३६८ कोटी ३७ लक्ष ४६ हजार २९८ रुपये शेतकऱ्यांना देण्यात आले आहे. जिल्ह्यात ८७.९३ टक्के जमीन अधिग्रहणाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग सेलू तालुक्यातील १६ गावातील २५.१६ किलोमीटर, वर्धा तालुक्यातील १० गावातील २३.०९ किलोमीटर तर आर्वी तालुक्यातील ८ गावातील ११.६७ किलोमीटर महामार्गाच्या लांबीसाठी जमीन खरेदी करण्यात येत आहे. त्यापैकी आर्वी तालुक्यात ९०.१० टक्के, वर्धा तालुक्यात ९१.१४ टक्के तर सेलू तालुक्यात ८३.९८ टक्के जमीन उपलब्ध झाली आहे.

टॅग्स :highwayमहामार्ग