शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी मोदींवर थेट हल्ला, आता गाठणार गुजरात, राहुल गांधींची मोठी खेळी, मोदी-भाजपाच्या अडचणी वाढणार?
2
IND vs ENG 4th Test Day 3 Stumps: टीम इंडियानं ५ विकेट्स घेतल्या; पण अख्खा दिवस यजमानांनी गाजवला
3
विद्यार्थी म्हणाले, गुरुजी छप्पर कोसळतंय, पण शिक्षकांनी दरडावून बसवून ठेवले, शाळा दुर्घटनेत धक्कादायक माहिती समोर  
4
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
5
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
6
ना कोळसा, ना डिझेल, ना वीज, भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन या इंधनावर चालणार? चाचणी यशस्वी
7
जालन्यात भरधाव बसने दोन मित्रांना चिरडले; केदारखेडा-राजूर महामार्गावर रक्ताचा सडा
8
Joe Root Record With 38th Hundred : रुटची विक्रमी सेंच्युरी! क्रिकेटच्या मैदानातील 'डॉन'ला टाकले मागे
9
Ben Stokes Retires Hurt : स्टोक्सनं पहिली फिफ्टी ठोकली अन् मग मैदान सोडायची वेळ आली, कारण...
10
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
11
गाजलेल्या शिक्षक हत्येतील आरोपी कळंबा जेलमधून पसार, कावळेसादच्या दरीत सापडला होता मृतदेह
12
नवरत्न कंपनीला संरक्षण मंत्रालयाकडून मोठी ऑर्डर, 1060% वधारला आहे शेअर; गुंतवणूकदारांना केलंय मालामाल!
13
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
14
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
15
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
16
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
17
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
18
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
19
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
20
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'

९२ चे झालो तरी ‘नापास’ !

By admin | Updated: August 4, 2015 03:05 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा ९२ वा वर्धापनदिन सोहळा मंगळवारी आयोजित करण्यात आला आहे. ९२

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा ९२ वा वर्धापनदिन सोहळा मंगळवारी आयोजित करण्यात आला आहे. ९२ वर्षांची गौरवशाली परंपरा असलेल्या विद्यापीठाचा परीक्षा विभाग आज कोलमडला आहे. आॅगस्ट महिना उजाडल्यावर उन्हाळी परीक्षांचे सुमारे ४० टक्के निकाल प्रलंबित आहेत. यामुळे विद्यार्थ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. यामुळे निकालाची परीक्षेत आपण यंदा तरी उत्तीर्ण होऊ, असा संकल्प विद्यापीठ प्रशासनाने आज घ्यावा, अशी मागणी विविध स्तरावर होत आहे.नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना मार्च महिन्यात सुरुवात झाली होती. परंतु सुरुवातीपासूनच काही ना काही अडचणी येत गेल्या. परीक्षा भवनातील अधिकाऱ्यांमध्ये नियोजनाचा पूर्णत: अभाव होता. प्रशासनाला महाविद्यालये, मूल्यांकन करणारे प्राध्यापक यांच्यावर वचक ठेवता आला नाही व त्याचा फटका विद्यार्थ्यांना बसला. विविध अभ्यासक्रमांच्या ९५६ परीक्षांपैकी केवळ ४७० निकाल जाहीर झालेले आहेत. विद्यापीठाकडून कधी महाविद्यालये, कधी तांत्रिक बाजू सांभाळणारी कंपनीकडे बोट दाखविण्यात येत आहे. निकाल कधी लागणार अशी विद्यार्थी विचारणा करीत असताना विद्यापीठातर्फे निकाल कधी जाहीर होणार, यासंबंधात एक वेळापत्रकच जाहीर करण्यात आले. परंतु त्याचे पालनदेखील झालेले नाही. या यादीप्रमाणे अनेक निकाल तर दोन आठवड्यांअगोदरच लागायला हवे होते. आता परीक्षा यंत्रणा पूर्णपणे दीक्षांत समारंभाच्या कामात लावण्यात आली आहे. त्यामुळे निकालांना आणखी विलंब होण्याची चिन्हे आहेत. (प्रतिनिधी)अधिकाऱ्यांचे ठरलेले उत्तर४निकाल कधी लागेल अशी विचारणा केली असता अधिकाऱ्यांकडून ठरलेलेच उत्तर देण्यात येत आहे. निकाल लवकरच जाहीर होतील, विद्यार्थ्यांनी संयम राखावा, असे सांगण्यात येत आहे. शिवाय महाविद्यालयांकडेदेखील बोट दाखविण्यात येत आहे. अशास्थितीत विद्यार्थ्यांनी दाद कुणाकडे मागावी, असा प्रश्न निर्माण झाला आहे. कुलगुरूंचा अनुभव कुठे गेला?४नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे हे विद्यापीठाचे प्रभारी परीक्षा नियंत्रक असताना निकाल वेगाने लागत होते. निकालांचा हा ‘काणे पॅटर्न’ राज्यभरात कौतुकाचा विषय ठरला होता. आता डॉ.काणे हे स्वत:च कुलगुरू असल्याने परीक्षा प्रणालीला रुळावर आणण्यात त्यांची मौलिक भूमिका राहील असे अंदाज व्यक्त करण्यात येत होते. परंतु ही अपेक्षादेखील फोल ठरली आहे. प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी पदभार स्वीकारून काहीच दिवस झाले आहेत. त्यांनी जबाबदारी स्वीकारेपर्यंत निकालांना अगोदरच उशीर झाला होता. त्यामुळे ‘डॅमेज कंट्रोल’चे काम करण्यातच त्यांचा जास्त वेळ जात आहे.