शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
4
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
5
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
6
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
7
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
8
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
9
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
10
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
11
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
12
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
13
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
14
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
15
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
16
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
17
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
18
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
19
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
20
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

एक लाख महिलांमागे ८७ मातामृत्यू

By admin | Updated: July 10, 2015 02:40 IST

राज्यात महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना सुरू आहेत. महिलाही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून विविध क्षेत्रात अग्रेसर होताहेत.

मंगेश व्यवहारे  नागपूरराज्यात महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना सुरू आहेत. महिलाही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून विविध क्षेत्रात अग्रेसर होताहेत. स्त्री-पुरुष समानतेचे पुरोगामी जग निर्माण करण्याची भाषा बोलली जात असताना, दुसरीकडे मात्र महिलांच्या आरोग्यासंदर्भात उदासिनता दिसते आहे. राज्यात एक लाख महिलांमागे ८७ मातामृत्यू होत असल्याची नोंद आरोग्य विभागाकडे आहे. महाराष्ट्राची ११.५२ कोटी लोकसंख्या लक्षात घेता, हे चित्र भयावह आहे. मातृत्व ही स्त्रीला मिळालेली एक देणगी आहे. प्रत्येक स्त्रीचे आई होणे एक स्वप्नच असते. गर्भधारणेपासून बाळ होईस्तव विशेष काळजी न घेतल्यास मातामृत्यूची संभावना जास्त असते. शहरी भागातील कार्यालयीन काम करणाऱ्या महिलांच्या बाबतीत गर्भधारणेनंतर काळजी घेण्याचे प्रमाण कमी आहे. खाजगी संस्थांमध्ये कार्यरत महिलांना गरोदरपणात आवश्यक असलेल्या सुट्या मिळत नाही. बैठकीचे काम करणाऱ्या, तासन्तास संगणकावर काम करणाऱ्या महिलांना प्रसूतिपूर्व त्रास सहन करावा लागतो. हे प्रमाण शहरात मोठ्या प्रमाणात दिसून येते. दरम्यान औषधोपचार, विश्रांती न घेतल्यास मातामृत्यूचा धोका संभावतो. तर ग्रामीण भागात माता मृत्यूला सामाजिक व कौटुंबिक अत्याचार ही कारणेही दिसून येतात. आरोग्य सुविधांचा अभाव, स्वत:ची काळजी न घेणे, जुन्या रुढी आणि परंपरेचा विळखा, अशिक्षितपणा, जनजागृतीचा अभाव ही कारणे ग्रामीण भागात मातामृत्यूच्या संदर्भात पुढे आली आहेत. आधुनिक जीवनशैलीचा परिणामआधुनिक जीवनशैलीही मातामृत्यूला मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरत आहे. जंकफुडचे वाढलेले प्रमाण, कुटुंब आणि नोकरीत गुरफटलेल्या महिलांमध्ये प्रसूतिपूर्व व प्रसूतिपश्चात रक्तस्राव, गर्भविषबाधा, गर्भाशय फाटणे, गंभीर स्वरुपाचा रक्तक्षय, अडलेली प्रसूती, प्रसूतिनंतर होणारा जंतुदोष या गोष्टीही मातामृत्यूला कारणीभूत आहे. असुरक्षित गर्भपात किशोरवयीन मुलामुलींमध्ये शरीरसुखाचे वाढते आकर्षण हे महत्त्त्वाचे कारण मातामृत्यूच्या बाबतीत आढळले आहे. यावयात मुलेमुली एकमेकांच्या प्रेमात पडून शरीरसंबंध प्रस्थापित करतात. गर्भनिरोधकाचा उपयोग करण्यात येत नसल्याने, गर्भधारणा होऊन जाते. अशावेळी समाजाकडून, कुटुंबीयांकडून होणाऱ्या त्रासामुळे कुठलाही वैद्यकीय सल्ला न घेता, गर्भ पाडणाऱ्या औषधांचे सेवन केले जाते. देशात गर्भपाताला कायदेशीर मान्यता मिळाल्यामुळे असुरक्षित गर्भपाताचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळेही मातामृत्यू वाढले आहेत.

जुन्या चालीरीतींचा पगडालग्न आणि पहिले बाळंतपण योग्य वयात होणे आवश्यक आहे. काही समाजामध्ये जुन्या चालीरीतींचा पगडा असल्याने बालवयात लग्न होतात. मुलींमध्ये प्रजनन आरोग्याविषयी अनभिज्ञता आढळते. जनजागृतीचा अभाव असल्याने, उपलब्ध कायदे, आवश्यक माहिती नसते. योग्य वयात लग्न मुलींच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकासाचे महत्त्व या बाबीकडे दुर्लक्ष होत असल्याने मातामृत्यू संभवतात.