शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
3
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
4
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
5
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
6
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
7
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
8
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
9
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
10
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
11
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
12
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
13
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
14
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
15
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
16
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
17
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
18
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
19
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
20
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO

एक लाख महिलांमागे ८७ मातामृत्यू

By admin | Updated: July 10, 2015 02:40 IST

राज्यात महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना सुरू आहेत. महिलाही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून विविध क्षेत्रात अग्रेसर होताहेत.

मंगेश व्यवहारे  नागपूरराज्यात महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना सुरू आहेत. महिलाही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून विविध क्षेत्रात अग्रेसर होताहेत. स्त्री-पुरुष समानतेचे पुरोगामी जग निर्माण करण्याची भाषा बोलली जात असताना, दुसरीकडे मात्र महिलांच्या आरोग्यासंदर्भात उदासिनता दिसते आहे. राज्यात एक लाख महिलांमागे ८७ मातामृत्यू होत असल्याची नोंद आरोग्य विभागाकडे आहे. महाराष्ट्राची ११.५२ कोटी लोकसंख्या लक्षात घेता, हे चित्र भयावह आहे. मातृत्व ही स्त्रीला मिळालेली एक देणगी आहे. प्रत्येक स्त्रीचे आई होणे एक स्वप्नच असते. गर्भधारणेपासून बाळ होईस्तव विशेष काळजी न घेतल्यास मातामृत्यूची संभावना जास्त असते. शहरी भागातील कार्यालयीन काम करणाऱ्या महिलांच्या बाबतीत गर्भधारणेनंतर काळजी घेण्याचे प्रमाण कमी आहे. खाजगी संस्थांमध्ये कार्यरत महिलांना गरोदरपणात आवश्यक असलेल्या सुट्या मिळत नाही. बैठकीचे काम करणाऱ्या, तासन्तास संगणकावर काम करणाऱ्या महिलांना प्रसूतिपूर्व त्रास सहन करावा लागतो. हे प्रमाण शहरात मोठ्या प्रमाणात दिसून येते. दरम्यान औषधोपचार, विश्रांती न घेतल्यास मातामृत्यूचा धोका संभावतो. तर ग्रामीण भागात माता मृत्यूला सामाजिक व कौटुंबिक अत्याचार ही कारणेही दिसून येतात. आरोग्य सुविधांचा अभाव, स्वत:ची काळजी न घेणे, जुन्या रुढी आणि परंपरेचा विळखा, अशिक्षितपणा, जनजागृतीचा अभाव ही कारणे ग्रामीण भागात मातामृत्यूच्या संदर्भात पुढे आली आहेत. आधुनिक जीवनशैलीचा परिणामआधुनिक जीवनशैलीही मातामृत्यूला मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरत आहे. जंकफुडचे वाढलेले प्रमाण, कुटुंब आणि नोकरीत गुरफटलेल्या महिलांमध्ये प्रसूतिपूर्व व प्रसूतिपश्चात रक्तस्राव, गर्भविषबाधा, गर्भाशय फाटणे, गंभीर स्वरुपाचा रक्तक्षय, अडलेली प्रसूती, प्रसूतिनंतर होणारा जंतुदोष या गोष्टीही मातामृत्यूला कारणीभूत आहे. असुरक्षित गर्भपात किशोरवयीन मुलामुलींमध्ये शरीरसुखाचे वाढते आकर्षण हे महत्त्त्वाचे कारण मातामृत्यूच्या बाबतीत आढळले आहे. यावयात मुलेमुली एकमेकांच्या प्रेमात पडून शरीरसंबंध प्रस्थापित करतात. गर्भनिरोधकाचा उपयोग करण्यात येत नसल्याने, गर्भधारणा होऊन जाते. अशावेळी समाजाकडून, कुटुंबीयांकडून होणाऱ्या त्रासामुळे कुठलाही वैद्यकीय सल्ला न घेता, गर्भ पाडणाऱ्या औषधांचे सेवन केले जाते. देशात गर्भपाताला कायदेशीर मान्यता मिळाल्यामुळे असुरक्षित गर्भपाताचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळेही मातामृत्यू वाढले आहेत.

जुन्या चालीरीतींचा पगडालग्न आणि पहिले बाळंतपण योग्य वयात होणे आवश्यक आहे. काही समाजामध्ये जुन्या चालीरीतींचा पगडा असल्याने बालवयात लग्न होतात. मुलींमध्ये प्रजनन आरोग्याविषयी अनभिज्ञता आढळते. जनजागृतीचा अभाव असल्याने, उपलब्ध कायदे, आवश्यक माहिती नसते. योग्य वयात लग्न मुलींच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक विकासाचे महत्त्व या बाबीकडे दुर्लक्ष होत असल्याने मातामृत्यू संभवतात.