शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

RTMNU : 'सिनेट' निवडणुकीत ८३.६८ टक्के मतदान; मंगळवारी मतमाेजणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 21, 2022 15:20 IST

प्राचार्य निर्वाचन क्षेत्राचे ९६.७१ टक्के मतदान

 नागपूर : राष्ट्रसंत तुकडाेजी महाराज नागपूरविद्यापीठाच्या पदवीधर मतदारसंघ वगळता विद्वत परिषद, अध्ययन मंडळ (बीओएस) सिनेटच्या रविवारी निवडणुका शांततापूर्ण पार पडल्या. निवडणुकीत शिक्षक, प्राचार्य व व्यवस्थापन प्रतिनिधी मतदारांपैकी ८३.६८ टक्के मतदारांनी मतदान केले.

बातमी लिहिस्तोवर मिळालेल्या माहितीनुसार, सिनेटच्या प्राचार्य निर्वाचन क्षेत्राचे सर्वाधिक ९६.७१ टक्के मतदान झाले. याशिवाय विद्वत परिषदेच्या व्यवस्थापन प्रतिनिधी निर्वाचन क्षेत्राचे ९४ टक्के मतदान झाले. विद्वत परिषदेच्या शिक्षक निर्वाचन क्षेत्रासाठी ८२.२९ टक्के आणि प्राचार्य निर्वाचन क्षेत्रात ८२.२४ टक्के मतदान झाले. सिनेटच्या शिक्षक निर्वाचन क्षेत्राचे ८१.७३ टक्के मतदान झाले. यासह १७ अध्ययन मंडळ निर्वाचन क्षेत्रात ९४.६५ टक्के मतदान झाले. विद्यापीठाचे कुलसचिव व निवडणूक निर्णय अधिकारी डाॅ. राजू हिवसे यांनी मतदान शांततापूर्ण झाल्याचे सांगितले. काेणत्याही मतदान केंद्रावर गडबड झाल्याची तक्रार नाही. मतदानासाठी विद्यापीठाच्या अधिकार क्षेत्रात येणाऱ्या सर्व क्षेत्रांत एकूण ९५ मतदान केंद्र तयार केले हाेते. रविवारी दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान चालले. त्यामुळे साेमवारी सकाळपर्यंत मतपेट्या पाेहोचतील. मंगळवारी सकाळी १० वाजेपासून मतमाेजणी सुरू हाेईल.

निवडणुकीसाठी रविवारी सकाळपासून उमेदवार आणि संघटनांचे पदाधिकारी सक्रिय हाेते. मात्र, सिनेट व विद्वत परिषदेच्या शिक्षक निर्वाचन क्षेत्रात गेल्या वेळीपेक्षा यावेळी कमी मतदान झाले. गेल्या निवडणुकीत सिनेट व विद्वत परिषद निवडणुकीत ९० टक्के मतदान झाले हाेते. यावेळी मतदान कमी झाल्याने उमेदवारांमध्ये धाकधूक वाढली आहे. कमी मतदान झाल्याने पराजय सहन करावी लागण्याची भीती उमेदवारांमध्ये आहे. कालपर्यंत आपला विजय निश्चित मानणाऱ्या उमेदवारांचीही चिंता वाढली आहे.

समाेर आली नाराजी

शिक्षक मतदारसंघात मतदान करताना शिक्षकांची नाराजी समाेर आली. सकाळपासून उमेदवार आणि संघटनांच्या पदाधिकारी शिक्षकांना मतदानासाठी संपर्क करीत हाेते. अनेक प्रतिनिधींनी गेल्या पाच वर्षांत शिक्षकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आराेप करीत शिक्षकांनी मतदान करण्यास नकार दिला.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठnagpurनागपूरuniversityविद्यापीठ