शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

मनपात ८० टक्के पदे रिक्त; उद्दिष्ट मात्र पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2019 00:59 IST

उत्पन्नाचे उद्दिष्ट गाठण्यात महापालिकेचे बहुसंख्य विभाग नापास ठरले आहेत. मात्र अग्निशमन विभाग याला अपवाद ठरला. विशेष म्हणजे या विभागात ८० टक्क्यांहून अधिक पदे रिक्त असताना विभागाला २०१८-१९ या वर्षात १.९८ कोटीचे शुल्क वसुलीचे उद्दिष्ट दिले असताना गेल्या आर्थिक वर्षात २ कोटी ६९ लाख ९६ हजारांचे शुल्क वसूल केले आहे.

ठळक मुद्देअग्निशमन विभागाचे २.७० कोटींचे उत्पन्न

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : उत्पन्नाचे उद्दिष्ट गाठण्यात महापालिकेचे बहुसंख्य विभाग नापास ठरले आहेत. मात्र अग्निशमन विभाग याला अपवाद ठरला. विशेष म्हणजे या विभागात ८० टक्क्यांहून अधिक पदे रिक्त असताना विभागाला २०१८-१९ या वर्षात १.९८ कोटीचे शुल्क वसुलीचे उद्दिष्ट दिले असताना गेल्या आर्थिक वर्षात २ कोटी ६९ लाख ९६ हजारांचे शुल्क वसूल केले आहे.अग्निशमन विभागाच्या उत्पन्नात याहून अधिक वाढ झाली असती. परंतु ८ ऑक्टोबर २०१५ च्या उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार उंच इमारतींवर आकारण्यात येणारे शुल्क बंद करण्यात आले आहे. ही वसुली सुरू राहिली असती तर हा विभाग आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्याला मदत झाली असती. उंच इमारतींवर शुल्क आकारण्याचा सुधारित प्रस्ताव महापालिका सभागृहाच्या मंजुरीनंतर राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे. यावर अद्याप निर्णय झालेला नाही.अग्निशमन विभागाचे मुख्य काम नैसर्गिक आपत्ती वा आगीची घटना घडल्यास जीवित व मालमत्तेचे नुकसान रोखण्याचे आहे. आपली जबाबदारी पार पाडून विभागाने शुल्क वसुलीतही आघाडी घेतली आहे. रिक्त पदे भरून विभागाला बळ देण्याची गरज आहे. आस्थापनेनुसार विभागात ८७२ पदे मंजूर आहेत. परंतु सध्या १५८ कर्मचारी कार्यरत असून, ७१४ पदे रिक्त आहेत. असे असूनही या विभागातील कर्मचारी व अधिकारी सक्षमतेने काम करीत आहेत.विभागात सशक्त कर्मचाऱ्यांची गरज असते. या विभागातील बहुसंख्य कर्मचारी सेवानिवृत्तीच्या मार्गावर आले आहेत. मुख्य अग्निशमन अधिकारी, उपमुख्य अग्निशमन अधिकारी, विभागीय अग्निशमन अधिकाऱ्यांची महत्त्वाची पदे रिक्त आहेत.मिळालेल्या माहितीनुसार, अग्निशमन विभागाला शुल्क वसुलीतून ११ लाख ७८ हजार ९८२ रुपये, पाणीपुरवठा, विहीर सफाई, फटाके, पर्यावरण शुल्क यातून १ कोटी ५ लाख ९१ हजार ५८४ रुपये, उंच व लहान इमारत निरीक्षण शुल्क, अग्निशमन सेवा शुल्क यातून १ कोटी ५२ लाख २५ हजार ८१६ रुपये उत्पन्न झाले.बचाव कार्यासाठी कर्मचारी नाहीशहरात आठ अग्निशमन स्टेशन आहेत. प्रत्येक स्टेशनवर २४ तास कर्मचारी ड्युटीवर असतात. विभागातील पदे रिक्त होत असल्याने मनुष्यबळाची समस्या निर्माण झाली आहे. एखादी मोठी घटना घडल्यास बचावासाठी कर्मचारी व वाहन उपलब्ध करताना विभागाला चांगलीच कसरत करावी लागते. सध्या ९० फायरमन कार्यरत आहेत. त्रिमूर्तीनगर अग्निशमन केंद्र बांधून सज्ज आहे. परंतु मनुष्यबळ नसल्याने ते सुरू झालेले नाही. ५६ चालकांची निवड करण्यात आलेली आहे. त्यांच्याकडून फायरमनचे काम करून घेणे शक्य आहे.सर्वांच्या सहकार्याने उद्दिष्ट पूर्तीअग्निशमन विभागात मनुष्यबळ वाढविण्याची नितांत गरज आहे. नैसर्गिक आपत्ती वा आग आटोक्यात आणताना कुशल मनुष्यबळाची गरज असते. परंतु पदे रिक्त असल्याने अडचणी येतात. असे असूनही उपलब्ध मनुष्यबळाचा वापर करून प्रयत्न केले जातात. उद्दिष्टाच्या तुलनेत अधिक शुल्क वसुली झाली आहे. ही चांगली बाब आहे. क र्मचारी व अधिकारी या सर्वांच्या सहकार्यामुळे हे शक्य झाले.राजेंद्र उचके,अग्निशमन अधिकारी महापालिका

 

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाEmployeeकर्मचारी