शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

परदेशी शिष्यवृत्तीसाठी ८ लाख उत्पन्नाची मर्यादा जिव्हारी

By निशांत वानखेडे | Updated: May 9, 2024 13:07 IST

पूर्वी पहिल्या १०० विद्यापीठांसाठी नव्हता निकष : मागासवर्गीयांवर अन्याय

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सामाजिक न्याय विभागातर्फे देण्यात येणाऱ्या परदेशी शिष्यवृत्ती योजनेबाबत राज्य सरकारच्या नवे परिपत्रक वादाच्या भोवऱ्यात आहे. समान धोरण लागू करण्याच्या नावाखाली अनुसूचित जाती-जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी ७५ टक्के गुणांची अट लावल्यानंतर आता ८ लाख उत्पन्न मर्यादा असलेल्यांनाच योजनेचा लाभ घेता येईल, या अटीवर आक्षेप घेतला जात आहे. या अटीमुळे मध्यमवर्गीय कुटुंबातील अनुसूचित जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना फटका बसेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

महाराष्ट्र सरकारच्या छत्रपती शाहू महाराज परदेशी शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत दरवर्षी अनुसूचित जातीचे ७५ विद्यार्थी परदेशी विद्यापीठात प्रवेश घेतात. अशाच प्रकारे अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठीही परदेशी शिष्यवृत्तीची योजना आहे. सामाजिक न्याय विभागाची डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) व आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था (तार्टी) मार्फत योजना राबविली जाते. मात्र राज्य सरकारच्या ९ नोव्हेंबर २०२३ च्या शुद्धिपत्रकानुसार यापुढे बार्टी, तार्टी, महाज्योती, सारथी व अमृत या संस्थेमार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी 'सारथी' या संस्थेचे निकष ग्राह्य धरले जाणार आहेत.

त्यानुसार परदेशी शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी ७५ टक्के गुणांच्या अटीसह ८ लाखांच्या उत्पन्नाची मर्यादा ग्राह्य धरली जाणार आहे. सामाजिक न्याय विभागातर्फे परदेशी शिष्यवृत्ती योजनेबाबत अद्याप सूचना निघाली नाही. त्यात हे निकष लागू करण्यात आले तर न्यायालयात जाण्याचा इशारा सामाजिक संघटनांनी दिला आहे.

साधारण कर्मचाऱ्यांचे वार्षिक वेतन ८ लाखांवर...यापूर्वी अनुसूचित जाती-जमातीचे विद्यार्थी जगातील टॉप १०० विद्यापीठांत प्रवेशास पात्र ठरले तर उत्पन्नाचे निकष लागू नव्हते. मात्र यापुढे त्यांनाही उत्पन्नाची अट लागू राहणार आहे. या धोरणामुळे अनुसूचित जाती, जमातीच्या विद्यार्थी-पालकांमध्ये असंतोष पसरला आहे. शासकीय सेवेतील साधारण कर्मचाऱ्यांचे वार्षिक वेतन ८ लाख रुपयांच्या वर जाते. मात्र मुलाला परदेशी शिक्षणासाठी पाठविण्याची त्यांची कुवत नसते. त्यामुळे सरकारी मदतीने परदेशी विद्यापीठांत शिक्षण घेण्याचे त्यांचे स्वप्न धुळीस मिळणार आहे.

समान धोरण तत्त्वाचे निकस हे बार्टी, सारथी, तार्टी, महाज्योती या स्वायत्त संस्थांच्या योजनांसाठी आहेत. अनुसूचित जाति-जमातीची विदेश शिष्यवृत्ती योजनाही या स्वायत्त संस्थांमध्ये येत नाहीत. ती सामाजिक न्याय विभागाची स्वतंत्र योजना आहे. त्यामुळे समान धोरण तत्त्वाचे निकस या योजनेला लागू करता येत नाही. तसेच संविधानात या दोन वर्गासाठी विशेष प्रावधान आहेत. त्यामुळे इतर प्रवर्गाच्या योजनांच्या तुलनात्मक निकष लावणे हा राज्य सरकारचा निर्णय असंवैधानिक आणि अन्यायकारक आहे. त्यामुळे ८ लाखाची उत्पन्न मर्यादा काढून ही योजनापूर्ववत करावी, अन्यथा याविरोधात आम्ही न्यायालयात जाऊ. - अतुल खोब्रागडे, युवा ग्रॅज्युएट फोरम

 

टॅग्स :Scholarshipशिष्यवृत्तीnagpurनागपूर