शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धकाळात भारताचा 'मास्टरस्ट्रोक'; PM मोदींच्या युएई दौऱ्यात LPG आणि पेट्रोलचा मोठा करार...
2
मोदीजी जे सांगत आहेत ते देशहितासाठीच, देशभक्ती सिद्ध करण्याची हीच वेळ- मुख्यमंत्री फडणवीस
3
Top Marathi News LIVE: बोरीवलीतील अॅनेक्स मॉलमध्ये भीषण आग, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी
4
"एकतर तहासाठी तयार व्हा अथवा विनाशाचा सामना करा, ५ मिनिटांत..."; चीन दौऱ्यावरून परतताना ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
विमान कंपन्यांना दिलासा, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय; एटीएफवरील व्हॅट १८% वरून थेट ७% वर!
6
Adhik Maas 2026: अधिक मासाला 'धोंड्याचा' मास म्हणण्यामागे काय आहे नेमके कारण?
7
शनि नक्षत्र गोचर २०२६: ५ राशींनी ५ उपाय अवश्य करा, शनि देईल लाभच लाभ; अधिक मास ठरेल खास!
8
सूर्य वृषभ संक्रांती २०२६: ७ राशींना यश-प्रगती, नफा-फायदा; १ उपाय करा, १ महिना चांगला लाभ!
9
इंधनाच्या किमती गगनाला भिडल्या, पण 'या' ५ बाईक महागाईच्या काळातही ठरतील संकटमोचक!
10
इन्स्टाग्रामचं नवीन 'Instants' फीचर डोकेदुखी ठरतंय? 'या' सोप्या स्टेप्स फॉलो करून लगेच करा बंद!
11
तुमच्या लोकांना कोर्टाबाबत बेजबाबदार विधान करण्यापासून थांबवा; न्यायाधीशांनी ठाकरेंच्या वकिलांना सुनावलं
12
Zerodha च्या निखिल कामथ यांनी 'या' कंपनीत वाढवली गुंतवणूक, वृत्तानंतर स्टॉकमध्ये १८ टक्के तेजी
13
मुंबई महानगर क्षेत्रात ५०० MW क्षमतेचा 'ग्रीन एआय कॉम्प्युट हब'; १.१४ लाख कोटींची गुंतवणूक
14
Astro Tips: पैसे आणि समृद्धीसाठी पर्समध्ये ठेवा 'या' ५ शुभ गोष्टी; लाभेल लक्ष्मीचा वरदहस्त!
15
हवाई दलाची अधिकारी कशी झाली इराणची गुप्तहेर? मोनिका विटच्या 'ब्लॅक मिस्ट्री'चा थरारक खुलासा
16
उकाड्याने विजेची मागणी वाढली, वीज कंपन्यांवर ताण, अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित!
17
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चेनंतरच आनंद परांजपेंचा पक्षप्रवेश; उदय सामंत यांचे स्पष्टीकरण
18
भारतीय जहाज दुर्घटनेनंतर जयशंकर यांचा परराष्ट्र मंत्र्यांशी थेट संवाद; दिला महत्त्वाचा सल्ला
19
मुलांच्या भविष्याची चिंता मिटली! 'PPF'च्या माध्यमातून शिक्षण आणि लग्नासाठी उभा करू शकता लाखोंचा फंड; जाणून घ्या नियम
20
भारताच्या शेजारील देशात नेमकी काय परिस्थिती? पेट्रोल-डिझेलचे दर पाहून चक्रावून जाल...
Daily Top 2Weekly Top 5

७,५०० लाभार्थ्यांना मानधनाची प्रतीक्षा

By admin | Updated: June 11, 2014 01:20 IST

वृद्धापकाळात सन्मानाने जगता यावे, यासाठी केंद्र व राज्य शासनाने ६५ वर्षांवरील नागरिकांसाठी संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना आणली;

संजय गांधी निराधार योजना : २ कोटी १६ लाख पडून
अमोल सोटे - आष्टी (श़)(वर्धा)
वृद्धापकाळात सन्मानाने जगता यावे, यासाठी केंद्र व राज्य शासनाने ६५ वर्षांवरील नागरिकांसाठी संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ वृद्धापकाळ निवृत्तीवेतन योजना आणली; मात्र सदर योजना राबविणारी यंत्रणाच कुचकामी असल्याने वर्धा जिल्ह्यात योजनेची पुरती वाट लागली आहे़ एकट्या आष्टी तालुक्यात सुमारे ७ हजार ५०० लाभार्थ्यांना मानधनाची प्रतीक्षा आहे़
या योजनेत ६ हजार नियमित लाभार्थी आहेत. त्यांना प्रति महिना ६०० रुपये प्रमाणे तीन महिन्याचे मानधन मिळाले नाही़ त्यापोटी शासनाकडून १ कोटी ८ लाख रुपये येणे आहे, असे तहसील कार्यालयाकडून सांगितले जाते; पण शासनाने लाभार्थ्यांचा पैसा केव्हाच पाठविला आहे़ त्याचे वाटप करणारी यंत्रणा चालढकल करीत आहे़ यामुळे शासनाचे काम अन् बारा महिने थांब, असे म्हणण्याची वेळ निराधारांवर आली आहे़ तहसीलदारांनी यादीतील १ हजार ५०० जुने लाभार्थी बाद केले होते़ त्यांचे १२ महिन्यांचे प्रति महिना ६०० रुपये प्रमाणे १ कोटी ८ लाख रुपयांचे अनुदान वाटप थांबले आहे़ दोन्ही मिळून २ कोटी १६ लाख रुपये होतात़ एवढा मोठा निधी अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षित धोरणामुळे वितरित झाला नाही़ लाभार्थी तहसील कार्यालयाच्या चकरा मारून थकलेत़ जिल्ह्यात इतर ठिकाणी या योजनेचे अनुदान वाटप करण्यात आले असले तरी काही लाभार्थ्यांना अद्यापही भटकंती करावी लागत असल्याचे दिसते़ आष्टी तालुक्यातील लाभार्थ्यांनाही प्रतीक्षाच करावी लागत आहे़