शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी! पाकसमोर टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
8
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
9
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
12
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
13
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
14
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
15
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
16
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
17
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
18
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
19
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
20
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?

उष्माघाताच्या रुग्णात ७३ टक्क्याने वाढ! नागपुरात ४ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2022 11:08 IST

एप्रिलअखेर व मे महिन्यातील तापमानाची तीव्रता यावर्षी मार्च महिन्यापासूनच जाणवायला लागली. याचा परिणाम आरोग्यावर होऊ लागला आहे.

ठळक मुद्देपूर्व विदर्भात ११४ रुग्ण, नागपुरात मृत्यूचे प्रमाण अधिक

सुमेध वाघमारे

नागपूर : तापमानात सातत्याने वाढ हात आहे. परिणामी, उष्माघाताचा धोका वाढत चालला आहे. पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यात उष्माघाताचे ४ एप्रिलपर्यंत ३१ रुग्ण असताना, १३ दिवसातच ७२.८० टक्क्याने रुग्णात वाढ झाली. सध्या ११४ रुग्ण व ४ मृत्यूची नोंद झाली आहे. उष्माघाताचे सर्वाधिक रुग्ण चंद्रपूर जिल्ह्यात असून नागपुरात मृत्यूचे प्रमाण अधिक आहे.

एप्रिलअखेर व मे महिन्यातील तापमानाची तीव्रता यावर्षी मार्च महिन्यापासूनच जाणवायला लागली. याचा परिणाम आरोग्यावर होऊ लागला आहे. तीव्र उष्णतेच्या संपर्कात आल्यामुळे शरीरातील तापमान नियंत्रित करणारी यंत्रणा कोलमडून पडत आहे. यामुळे उष्माघाताचे रुग्ण वाढत आहेत. या आजाराच्या नोंदी कमी होत असल्यातरी मार्च ते ४ एप्रिल २०२२ पर्यंत पूर्व विदर्भातील नागपूरसह चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, वर्धा व गडचिरोली हे सहा जिल्हे मिळून ३१ रुग्ण व २ मृत्यूची नोंद होती. मात्र, मागील १३ दिवसांतच ८३ रुग्ण व आणखी २ मृत्यूची भर पडली. एप्रिल महिन्याच्या अर्ध्यावरच उष्माघाताच्या रुग्णाने शतक पार केल्याने मे महिन्यात हा आकडा उच्चांक गाठण्याची शक्यता आहे.

नागपूरसह चंद्रपूर, गोंदियात वाढतेय रुग्ण

१ मार्च ते ४ एप्रिल २०२२ या दरम्यान नागपूर शहरात २६ रुग्ण होते, आता ते वाढून ३४ झाले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात ५ रुग्ण होते, आता ४२ झाले आहेत. गोंदिया जिल्ह्यात एकाही रुग्णाची नोंद नसताना आता ३१ रुग्ण झाले आहेत. गडचिरोली जिल्ह्यात ५, तर वर्धा जिल्ह्यात २ रुग्णांची नोंद आहे. नागपूर ग्रामीण व भंडारा जिल्ह्यात तूर्तास एकही उष्माघाताचा रुग्ण आढळून आलेला नाही.

मृत्यूची नोंद संशयित

पूर्व विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्ये उष्माघाताचे रुग्ण वाढत असले तरी १६ एप्रिलपर्यंत केवळ नागपूर शहरातच ४ मृत्यूची नोंद होती. उपसंचालक आरोग्य विभागाने या मृत्यूची नोंद संशयित म्हणून घेतली आहे. शवविच्छेदनचा अहवाल आणि समितीने अंतिम निर्णय घेतल्यावरच उष्माघाताच्या मृत्यूची नोंद होणार आहे.

याकडे दुर्लक्ष केल्यास जिवाला धोका!

चक्कर येणे, डोके दुखणे, मळमळणे किंवा उलटी होणे, पोट दुखणे, गोंधळलेली अवस्था होणे ही उष्माघाताची लक्षणे आहेत. याकडे दुर्लक्ष केल्यास जिवाला धोका होण्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तविली आहे. यामुळे गरज असेल तरच उन्हात जा, उन्हात पडताना सैल कपडे घाला, संपूर्ण डोके झाकेल अशी टोपी किंवा छत्रीचा वापर करा. द्रव्य पदार्थांचे सेवन अधिक प्रमाणात करा. चांगल्या पद्धतीने ‘हाइड्रेटेड’ राहिल्याने शरीरातून घाम येणे आणि शरीराचे तापमान सामान्य ठेवण्यास मदत होते. उन्हात असलेल्या वाहनामध्ये कुणाला ठेवू नका. लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.

रुग्णांची वाढती संख्या

जिल्हा  :  ४ एप्रिल २०२२  :  १६ एप्रिल २०२२

चंद्रपूर : ०५ : ४२

नागपूर शहर : २६ : ३४

नागपूर ग्रामीण : ०० : ००

गोंदिया : ०० : ३१

गडचिरोली : ०० : ०५

वर्धा : ०० : ०२

भंडारा : ०० : ००

टॅग्स :weatherहवामानTemperatureतापमान