शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
2
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
3
‘गोल्डन डक’मुळं गिलच्या निवडीवर प्रश्नचिन्ह; संजूसह टीम इंडियातील ‘वशीलेबाजी’चा मुद्दा पुन्हा चर्चेत
4
धोकादायक सेस इमारतींचा तिढा सुटला; मुंबई 'पागडीमुक्त' होणार, पुनर्विकाच्या नव्या नियमावलीची शिंदेंकडून घोषणा
5
IND vs SA : दक्षिण आफ्रिकेचा पलटवार; घरच्या मैदानात टीम इंडियावर ओढावली T20I मधील सर्वात मोठ्या पराभवाची नामुष्की
6
वसंत मोरे थोडक्यात बचावले; नवले पुलावरील अपघातांवर बोलत असतानाच भरधाव टेम्पो आला अन्..
7
VIDEO : अर्शदीपची ओव्हर संपता संपेना; लाजिरवाण्या रेकॉर्डनंतर डगआउटमध्ये बसलेला गंभीर चिडला!
8
नीलेश घायवळ न्यायालयाकडून फरार घोषित; संपूर्ण मालमत्ता जप्त होण्याची शक्यता
9
FIH Hockey Men’s Junior World Cup 2025 : भारताच्या युवा हॉकी संघाचे PM मोदींकडून खास शब्दांत कौतुक, म्हणाले...
10
"एकदा भावाचा टी-शर्ट घालून मॅच खेळायला गेले अन्..."; महिला क्रिकेटर शेफालीचा धमाल किस्सा
11
IND vs SA : विकेटमागे जितेशची चपळाई! क्विंटन डी कॉकवर ओढावली 'नर्व्हस नाइंटी'ची नामुष्की (VIDEO)
12
"ते पार्ट टाइम पॉलिटिशियन, त्यांना गोपनीय परदेश दौऱ्यांचा छंद..."; मुस्लीम महिला नेत्या राहुल गांधींवर स्पष्टच बोलल्या
13
Indigo ला साडेसाती भोवली? दोन शत्रू ग्रहांमुळे अशी ‘दशा’ झाली; २०२७ पर्यंत आव्हान कायम अन्…
14
लुथरा बंधूंची अटकपूर्व जामीन याचिका फेटाळली; HC म्हणाले, “जिवाला धोका असल्याचा पुरावा...”
15
"मी स्वतःच फॉर्म भरला नाही, आता दंगलखोरांच्या पक्षासमोर...!" SIR वरून ममतांचा हल्लाबोल
16
इम्रान खानच्या तुरुंगात अडचणी आणखी वाढणार! पाकिस्तानने २४ तासात घेतले ५ मोठे निर्णय
17
"'मी गोमांस खातो, कोण मला अडवतं?', म्हणणाऱ्या मंत्र्यासोबत अमित शाह जेवताहेत, हिम्मत असेल तर...!"; उद्धव ठाकरे यांचं थेट आव्हान
18
T20 World Cup 2026 Tickets Live: ICC चा ऐतिहासिक निर्णय! फक्त १०० रुपयांत बूक करा वर्ल्ड कपचं तिकीट
19
"खुर्चीसाठी स्वत:चं पायपुसणं करून घेणाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांवर बोलू नये"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
20
IND vs SA 2nd T20I : अखेर सूर्या भाऊनं डाव साधला! टॉसचा बॉस होण्यासाठी यावेळी आजमावला हा फंडा
Daily Top 2Weekly Top 5

उष्माघाताच्या रुग्णात ७३ टक्क्याने वाढ! नागपुरात ४ मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2022 11:08 IST

एप्रिलअखेर व मे महिन्यातील तापमानाची तीव्रता यावर्षी मार्च महिन्यापासूनच जाणवायला लागली. याचा परिणाम आरोग्यावर होऊ लागला आहे.

ठळक मुद्देपूर्व विदर्भात ११४ रुग्ण, नागपुरात मृत्यूचे प्रमाण अधिक

सुमेध वाघमारे

नागपूर : तापमानात सातत्याने वाढ हात आहे. परिणामी, उष्माघाताचा धोका वाढत चालला आहे. पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यात उष्माघाताचे ४ एप्रिलपर्यंत ३१ रुग्ण असताना, १३ दिवसातच ७२.८० टक्क्याने रुग्णात वाढ झाली. सध्या ११४ रुग्ण व ४ मृत्यूची नोंद झाली आहे. उष्माघाताचे सर्वाधिक रुग्ण चंद्रपूर जिल्ह्यात असून नागपुरात मृत्यूचे प्रमाण अधिक आहे.

एप्रिलअखेर व मे महिन्यातील तापमानाची तीव्रता यावर्षी मार्च महिन्यापासूनच जाणवायला लागली. याचा परिणाम आरोग्यावर होऊ लागला आहे. तीव्र उष्णतेच्या संपर्कात आल्यामुळे शरीरातील तापमान नियंत्रित करणारी यंत्रणा कोलमडून पडत आहे. यामुळे उष्माघाताचे रुग्ण वाढत आहेत. या आजाराच्या नोंदी कमी होत असल्यातरी मार्च ते ४ एप्रिल २०२२ पर्यंत पूर्व विदर्भातील नागपूरसह चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, वर्धा व गडचिरोली हे सहा जिल्हे मिळून ३१ रुग्ण व २ मृत्यूची नोंद होती. मात्र, मागील १३ दिवसांतच ८३ रुग्ण व आणखी २ मृत्यूची भर पडली. एप्रिल महिन्याच्या अर्ध्यावरच उष्माघाताच्या रुग्णाने शतक पार केल्याने मे महिन्यात हा आकडा उच्चांक गाठण्याची शक्यता आहे.

नागपूरसह चंद्रपूर, गोंदियात वाढतेय रुग्ण

१ मार्च ते ४ एप्रिल २०२२ या दरम्यान नागपूर शहरात २६ रुग्ण होते, आता ते वाढून ३४ झाले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात ५ रुग्ण होते, आता ४२ झाले आहेत. गोंदिया जिल्ह्यात एकाही रुग्णाची नोंद नसताना आता ३१ रुग्ण झाले आहेत. गडचिरोली जिल्ह्यात ५, तर वर्धा जिल्ह्यात २ रुग्णांची नोंद आहे. नागपूर ग्रामीण व भंडारा जिल्ह्यात तूर्तास एकही उष्माघाताचा रुग्ण आढळून आलेला नाही.

मृत्यूची नोंद संशयित

पूर्व विदर्भातील इतर जिल्ह्यांमध्ये उष्माघाताचे रुग्ण वाढत असले तरी १६ एप्रिलपर्यंत केवळ नागपूर शहरातच ४ मृत्यूची नोंद होती. उपसंचालक आरोग्य विभागाने या मृत्यूची नोंद संशयित म्हणून घेतली आहे. शवविच्छेदनचा अहवाल आणि समितीने अंतिम निर्णय घेतल्यावरच उष्माघाताच्या मृत्यूची नोंद होणार आहे.

याकडे दुर्लक्ष केल्यास जिवाला धोका!

चक्कर येणे, डोके दुखणे, मळमळणे किंवा उलटी होणे, पोट दुखणे, गोंधळलेली अवस्था होणे ही उष्माघाताची लक्षणे आहेत. याकडे दुर्लक्ष केल्यास जिवाला धोका होण्याची शक्यता डॉक्टरांनी वर्तविली आहे. यामुळे गरज असेल तरच उन्हात जा, उन्हात पडताना सैल कपडे घाला, संपूर्ण डोके झाकेल अशी टोपी किंवा छत्रीचा वापर करा. द्रव्य पदार्थांचे सेवन अधिक प्रमाणात करा. चांगल्या पद्धतीने ‘हाइड्रेटेड’ राहिल्याने शरीरातून घाम येणे आणि शरीराचे तापमान सामान्य ठेवण्यास मदत होते. उन्हात असलेल्या वाहनामध्ये कुणाला ठेवू नका. लक्षणे दिसताच डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे.

रुग्णांची वाढती संख्या

जिल्हा  :  ४ एप्रिल २०२२  :  १६ एप्रिल २०२२

चंद्रपूर : ०५ : ४२

नागपूर शहर : २६ : ३४

नागपूर ग्रामीण : ०० : ००

गोंदिया : ०० : ३१

गडचिरोली : ०० : ०५

वर्धा : ०० : ०२

भंडारा : ०० : ००

टॅग्स :weatherहवामानTemperatureतापमान