शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

Nagpur: घरून पळून जाणारी ७० हजार मुले-मुली रेल्वे स्थानकांवर सापडली, सहा वर्षांतील धक्कादायक वास्तव

By नरेश रहिले | Updated: July 18, 2024 19:54 IST

Nagpur News: रेल्वेची संपत्ती आणि प्रवाशांच्या ञानमालाची सुरक्षा करण्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) गेल्या सहा वर्षांत तब्बल ८४ हजारांवर मुला-मुलींना ताब्यात घेऊन त्यांना त्यांच्या पालकांच्या हवाली केले आहे.

- नरेश डोंगरे नागपूर - रेल्वेची संपत्ती आणि प्रवाशांच्या ञानमालाची सुरक्षा करण्याची जबाबदारी सांभाळणाऱ्या रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) गेल्या सहा वर्षांत तब्बल ८४ हजारांवर मुला-मुलींना ताब्यात घेऊन त्यांना त्यांच्या पालकांच्या हवाली केले आहे. 'ऑपरेशन नन्हे फरिश्ते' अंतर्गत बजावण्यात आलेल्या या कामगिरीमुळे या मुलांचे अंधकारमय होऊ पाहणारे भवितव्य सुरक्षित झाले आहे.

घरगुती भांडणं, पालकांचे रागावणे, अन्य मुला-मुलींचे चमकदमक युक्त जीवण, बाह्य जिवनातील ग्लॅमरस तसेच अल्पवयीन गटातील आकर्षण वजा प्रेमप्रकरण आदी कारणांवरून अल्पवयीन मुला-मुलींचे घरून पळून जाण्याचे प्रमाण सारखे वाढत असल्याचे लक्षात आल्याने रेल्वे सुरक्षा दलाने २०१८ मध्ये -अल्पवयीन मुला-मुलींना ताब्यात घेऊन त्यांच्या पालकांच्या स्वाधिन करण्यासंबंधी एक योजना सुरू केली. ऑपरेशन नन्हे फरिश्ते असे या मोहिमेला नाव देण्यात आले. त्यानुसार, आरपीएफच्या जवानांना प्रशिक्षित करण्यात आले. त्यासाठी जिल्हा बालकल्याण समितीच्या मदतीने 'चाईल्ड हेल्पलाईन' सुरू करण्यात आली. त्यानंतर २०१८ ला पहिल्याच वर्षांत १७११२ अल्पवयीन मुला-मुलींना विविध रेल्वे स्थानकांवर आरपीएफने ताब्यात घेतले. दुसऱ्या वर्षी अर्थात २०१९ ला १५, ९३२ मुले-मुली, २०२० ला ५,०११ मुले-मुली, २०२१ ला ११, ९०७ , २०२२-२३ ला ११,७९४ आणि २०२४ ला ४,६०७ मुला-मुलींना ताब्यात घेण्यात आरपीएफला यश आले. मानसिकतेचा अंदाज अन् समुपदेशनमुलांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांना चाईल्ड लाईनच्या ताब्यात देण्यात येते. त्यांच्या मानसिकतेचा अंदाज घेऊन त्यांचे समुपदेशन केले जाते. त्यानंतर त्यांच्या पालकांना बोलवून त्यांचेही समुपदेशन करून या मुला-मुलींना पालकांना सोपविले जाते.

टॅग्स :nagpurनागपूर