शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
4
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
5
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
6
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
7
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
8
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय
9
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
10
Bengaluru Stampede : हृदयद्रावक! "मलाही इथेच राहायचंय..."; मुलाच्या कबरीला मिठी मारून ढसाढसा रडले वडील
11
Vat Purnima Vrat 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
12
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
13
मुंब्रा ट्रेन अपघातावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले- "रोज सकाळी हजारो प्रवासी..."
14
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
15
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
16
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
17
ज्योतिष्याची 'ती' भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
18
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
19
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
20
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश

७० वर्षाने सुरू झालेल्या शाळेला आता शिक्षकाची प्रतीक्षा; मलकापूरच्या शाळेत शिक्षकच नाहीत

By निशांत वानखेडे | Updated: July 19, 2023 18:54 IST

स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतर २०१६ साली काटाेल तालुक्यातील आदिवासी बहुल मलकापुरात शिक्षणाची ज्ञानगंगा सुरू झाली.

नागपूर : स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतर २०१६ साली काटाेल तालुक्यातील आदिवासी बहुल मलकापुरात शिक्षणाची ज्ञानगंगा सुरू झाली. मात्र आता या शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षकाची प्रतीक्षा आहे. सत्र सुरू झाल्यानंतरही या शाळेत शिक्षकाची नियुक्ती झाली नाही. शिक्षक मिळावा म्हणून ग्रामस्थांना आता अधिकाऱ्यांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.

उपराजधानीपासून ५० किलाेमीटरवर मालकापूर हे गाव आहे. गावात आदिवासी व भटक्या विमुक्तांची संख्या अधिक आहे. ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्या अनेक वर्षाच्या संघर्षानंतर २०१६ साली येथे इमारत बांधून शाळा सुरू करण्यात आली. तेव्हापासून ती नियमित सुरू आहे. मात्र यावर्षी मे महिन्यात शाळेचे पूर्वीचे शिक्षक निवृत्त झाले. तेव्हापासून दुसऱ्याची नियुक्ती न झाल्याने शाळा व विद्यार्थी शिक्षकाविना पाेरके झाले आहेत. या शाळेत सध्या १५ विद्यार्थी आहेत. बहुसंख्य आदिवासी व भारवाड समाजाचे आहेत.सामाजिक कार्यकर्ते रामदास काेडापे यांनी सांगितले, गावातील ५० पालकांच्या स्वाक्षऱ्या घेऊन आधी खंड विकास अधिकारी व नंतर गटशिक्षणाधिकारी यांना शिक्षकाच्या नियुक्तीसाठी निवेदन देण्यात आले. बुधवारी या पालकांच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी यांची भेट घेतली व शिक्षक नियुक्तीची मागणी केली.

जंगल, डाेंगरातून कसा करावा चिमुकल्यांनी प्रवास?गट शिक्षणाधिकारी यांनी जवळच्या मिनेवाडा गावातील शाळेत मुलांना पाठविण्याची सुचना करीत त्यासाठी प्रवास भत्ता देण्याची हमी दिली. मिनेवाडा हे गाव मलकापूरपासून ६ किमी अंतरावर आहे. हा रस्ता जंगल, डाेंगरातून जाताे. ओढे-नाले ओलांडावे लागतात व वन्यप्राण्यांचाही वावर असताे. अशा रस्त्याने पहिली ते पाचवीपर्यंतच्या चिमुकल्यांनी कसा प्रवास करावा, हा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

शाळा नाही की अद्याप गणवेश नाहीशिक्षक नसल्याने मलकापूरची शाळा बंद पडली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना गणवेशही मिळाले नाही. दरम्यान मिनेवाडा शाळेच्या मुख्याध्यापकांनी मुलांसह पालकांना त्यांच्या शाळेत बाेलावून पुस्तके वितरित केली पण गणवेश मिळाले नाही. दरराेज शाळेत जाण्यास अडचणी असल्याने या मुलांचे शैक्षणिक नुकसान हाेण्याची शक्यता आहे. माेलमजुरी करणाऱ्या पालकांची वाहन व्यवस्था करण्याचीही स्थिती नाही.

आम्ही माेठ्या कष्टाने ही शाळा सुरू केली हाेती. आता पुन्हा ती बंद पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही लहान मुले दूरच्या शाळेत जंगलातून कसा प्रवास करतील? आदिवासी, भटक्यांना शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर करण्याचाच हा प्रकार आहे. शिक्षक नियुक्त करून मुलांचे शिक्षण सुरू करावे, ही विनंती. - रामदास काेडापे, सामाजिक कार्यकर्ता 

टॅग्स :nagpurनागपूरMalkapurमलकापूर