शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

७० वर्षाने सुरू झालेल्या शाळेला आता शिक्षकाची प्रतीक्षा; मलकापूरच्या शाळेत शिक्षकच नाहीत

By निशांत वानखेडे | Updated: July 19, 2023 18:54 IST

स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतर २०१६ साली काटाेल तालुक्यातील आदिवासी बहुल मलकापुरात शिक्षणाची ज्ञानगंगा सुरू झाली.

नागपूर : स्वातंत्र्याच्या ७० वर्षानंतर २०१६ साली काटाेल तालुक्यातील आदिवासी बहुल मलकापुरात शिक्षणाची ज्ञानगंगा सुरू झाली. मात्र आता या शाळेतील विद्यार्थ्यांना शिक्षकाची प्रतीक्षा आहे. सत्र सुरू झाल्यानंतरही या शाळेत शिक्षकाची नियुक्ती झाली नाही. शिक्षक मिळावा म्हणून ग्रामस्थांना आता अधिकाऱ्यांचे उंबरठे झिजवावे लागत आहेत.

उपराजधानीपासून ५० किलाेमीटरवर मालकापूर हे गाव आहे. गावात आदिवासी व भटक्या विमुक्तांची संख्या अधिक आहे. ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्ते यांच्या अनेक वर्षाच्या संघर्षानंतर २०१६ साली येथे इमारत बांधून शाळा सुरू करण्यात आली. तेव्हापासून ती नियमित सुरू आहे. मात्र यावर्षी मे महिन्यात शाळेचे पूर्वीचे शिक्षक निवृत्त झाले. तेव्हापासून दुसऱ्याची नियुक्ती न झाल्याने शाळा व विद्यार्थी शिक्षकाविना पाेरके झाले आहेत. या शाळेत सध्या १५ विद्यार्थी आहेत. बहुसंख्य आदिवासी व भारवाड समाजाचे आहेत.सामाजिक कार्यकर्ते रामदास काेडापे यांनी सांगितले, गावातील ५० पालकांच्या स्वाक्षऱ्या घेऊन आधी खंड विकास अधिकारी व नंतर गटशिक्षणाधिकारी यांना शिक्षकाच्या नियुक्तीसाठी निवेदन देण्यात आले. बुधवारी या पालकांच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी तसेच जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी यांची भेट घेतली व शिक्षक नियुक्तीची मागणी केली.

जंगल, डाेंगरातून कसा करावा चिमुकल्यांनी प्रवास?गट शिक्षणाधिकारी यांनी जवळच्या मिनेवाडा गावातील शाळेत मुलांना पाठविण्याची सुचना करीत त्यासाठी प्रवास भत्ता देण्याची हमी दिली. मिनेवाडा हे गाव मलकापूरपासून ६ किमी अंतरावर आहे. हा रस्ता जंगल, डाेंगरातून जाताे. ओढे-नाले ओलांडावे लागतात व वन्यप्राण्यांचाही वावर असताे. अशा रस्त्याने पहिली ते पाचवीपर्यंतच्या चिमुकल्यांनी कसा प्रवास करावा, हा प्रश्न ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे.

शाळा नाही की अद्याप गणवेश नाहीशिक्षक नसल्याने मलकापूरची शाळा बंद पडली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना गणवेशही मिळाले नाही. दरम्यान मिनेवाडा शाळेच्या मुख्याध्यापकांनी मुलांसह पालकांना त्यांच्या शाळेत बाेलावून पुस्तके वितरित केली पण गणवेश मिळाले नाही. दरराेज शाळेत जाण्यास अडचणी असल्याने या मुलांचे शैक्षणिक नुकसान हाेण्याची शक्यता आहे. माेलमजुरी करणाऱ्या पालकांची वाहन व्यवस्था करण्याचीही स्थिती नाही.

आम्ही माेठ्या कष्टाने ही शाळा सुरू केली हाेती. आता पुन्हा ती बंद पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ही लहान मुले दूरच्या शाळेत जंगलातून कसा प्रवास करतील? आदिवासी, भटक्यांना शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर करण्याचाच हा प्रकार आहे. शिक्षक नियुक्त करून मुलांचे शिक्षण सुरू करावे, ही विनंती. - रामदास काेडापे, सामाजिक कार्यकर्ता 

टॅग्स :nagpurनागपूरMalkapurमलकापूर