शहरं
Join us  
Trending Stories
1
Mira-Bhayandar: मीरा भाईंदरमध्ये ९५ जागांसाठी ४३५ उमेदवारांत चुरस; भाजपात नाराजीचा सूर कायम!
2
Nagpur: काँग्रेसमध्ये 'ऑल वेल', पण भाजपची डोकेदुखी वाढली; ६ बंडखोरांचा माघार घेण्यास नकार!
3
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
4
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
5
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
6
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
7
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
8
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
9
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
10
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
11
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
12
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
13
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
14
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
15
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
16
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
17
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
18
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
19
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
20
स्विगी, झोमॅटो सारख्या कंपन्यांच्या डिलिव्हरी बॉईजना सुरक्षा मिळणार! 'या' अटी पूर्ण कराव्या लागतील; नवीन नियम जारी
Daily Top 2Weekly Top 5

७० टक्के विद्यार्थी अजूनही ऑनलाईन शिक्षणापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 22:23 IST

कोरोनामुळे सर्वात जास्त फटका शिक्षणाला बसला आहे. मार्च महिन्यापासून बंद पडलेल्या शाळा अजूनही सुरू झाल्या नाहीत. त्यामुळे शासनाने ऑनलाईनचा पर्याय आणला. परंतु ऑनलाईन शिक्षणापासून जिल्ह्यातील ७० टक्के विद्यार्थी दूरच आहेत.

ठळक मुद्दे नामांकित शाळांत फी भरल्यानंतर ऑनलाईन शिक्षणस्थानिक स्वराज्य संस्था व सरकारी शाळांचे ‘वेट अ‍ॅण्ड वॉच’

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनामुळे सर्वात जास्त फटका शिक्षणाला बसला आहे. मार्च महिन्यापासून बंद पडलेल्या शाळा अजूनही सुरू झाल्या नाहीत. त्यामुळे शासनाने ऑनलाईनचा पर्याय आणला. परंतु ऑनलाईन शिक्षणापासून जिल्ह्यातील ७० टक्के विद्यार्थी दूरच आहेत.जिल्ह्यातील स्वयंअर्थसाहाय्यित काही नामांकित शाळांमध्ये ऑनलाईन शिक्षणाचे प्रयोग सुरू झाले आहेत. केजीच्या विद्यार्थ्यांनासुद्धा या शाळा ऑनलाईन धडे देत आहेत. परंतु या शाळांचा या मागचा उद्देश पालकांकडून फी वसूल करण्याचा आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थांनी फी भरली त्या विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण सुरू आहे. परंतु ऑनलाईन शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या अवघी १० ते १५ टक्के आहे. नागपूर शहरात काही पालक समिती निर्माण झाल्या आहेत. त्या माध्यमातून शाळांकडून आकारण्यात येत असलेल्या फी विरोधात आंदोलन सुरू झाले आहे. त्यामुळे अनेक पालक या समितीच्या समर्थनात असल्याने आणि कोरोनामुळे रोजगाराचे प्रश्न निर्माण झाल्याने पालकांनी फी न भरल्यामुळे विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण बंद आहे.दरम्यान सरकारी आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेत ऑनलाईनबाबत उदासीनता आहे. सरकारी आकडेवारीनुसार शासनाने ऑनलाईन शिक्षणासंदर्भात काढलेल्या अ‍ॅपद्वारे विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवित आहेत. परंतु ही संख्याही पाच टक्केच्या वर नाही. विशेष म्हणजे ग्रामीण भागात तर ऑनलाईन शिक्षण बंदच असल्यासारखे आहे. शाळा सुरू झाल्यानंतरच येथील विद्यार्थ्यांना शिक्षण मिळणार आहे.- ऑनलाईन क्लासेस ही शाळा आणि पालकांच्या मूक संमतीने कोरोनाच्या काळात शिक्षक आणि विद्यार्थ्यांना व्यस्त ठेवण्याचा एक अपयशी प्रयत्न आहे. ज्या विद्यार्थ्यांनी फी चा पहिला हप्ता भरला नाही. त्यांचे ऑनलाईन क्लासेस शाळांनी बंद केले आहेत.गिरीश पांडे, अध्यक्ष, जागरुक पालक समितीमुळात शिक्षण हे सर्वसमावेशक असले पाहिजे. काही शाळा फी वसुलीसाठी ऑनलाईन शिक्षणावर जोर देत आहे. दुसरीकडे ग्रामीण भागातील विद्यार्थी, सरकारी अथवा स्थानिक स्वराज्य संस्थेचा विद्यार्थी ऑनलाईन शिक्षणापासून दूर आहे. त्यामुळे शिक्षणाची सर्व समावेशकता राहिली नाही. याकडे शिक्षण विभागानेच लक्ष वेधले पाहिजे.योगेश पाथरे, राष्ट्रीय संयोजकराष्ट्रीय शिक्षक पालक संघटन

टॅग्स :onlineऑनलाइनEducationशिक्षण