शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

नागपुरात ७० टक्के हॉटेल बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2020 00:28 IST

३३ टक्के क्षमतेसह हॉटेल सुरू करण्याचे आदेश राज्य शासनाने सोमवारी दिले. त्यानुसार बुधवार, ८ जुलैला हॉटेल सुरू झाले, पण पहिल्याच दिवशी नागपुरातील ७० टक्के हॉटेल बंद होते आणि मोजक्याच हॉटेलचे दार उघडले.

ठळक मुद्देमोजक्याच हॉटेलचे दार उघडले : कायदे शिथिल करावेत, ‘गेस्ट’ येण्यास वेळ लागणार

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : ३३ टक्के क्षमतेसह हॉटेल सुरू करण्याचे आदेश राज्य शासनाने सोमवारी दिले. त्यानुसार बुधवार, ८ जुलैला हॉटेल सुरू झाले, पण पहिल्याच दिवशी नागपुरातील ७० टक्के हॉटेल बंद होते आणि मोजक्याच हॉटेलचे दार उघडले. राज्य आणि जिल्ह्याच्या सीमा व पर्यटन बंद असल्याने आणि कार्यशाळा, चर्चासत्र व इतर कार्यक्रमाला परवानगी नसल्याने ग्राहक मोठ्या संख्येने हॉटेलमध्ये येण्यासाठी आम्हाला पुन्हा काही दिवस वाट पहावी लागेल, असा सूर हॉटेल मालकांनी लोकमतशी बोलताना काढला.पहिल्या दिवशी काहीच ग्राहकांनी हॉटेलमध्ये मुक्काम केल्याची माहिती आहे. पण ही संख्या फार थोडी आहे. कमी संख्येतील ग्राहकांमुळे हॉटेलचा खर्च निघणे कठीण आहे. पुढे शासनाने अन्य कार्यक्रमाच्या आयोजनाची परवानगी दिल्यास ग्राहकांची संख्या वाढेल. आवश्यक कामांसाठी नागपुरात येणारे लोक हॉटेलमध्ये थांबतील. हॉटेल संचालक आणि मालकांना व्यवसाय सुरळीत होण्यासाठी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.हॉटेल सेंटर पॉईंटचे व्यवस्थापकीय संचालक जसबीरसिंग अरोरा म्हणाले, सध्या आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत विमानसेवा आणि रेल्वे बंद असल्याने प्रवासी नागपुरात आवश्यक कामांसाठी येत आहेत. त्याचा परिणाम हॉटेल उद्योगावर झाला आहे. हॉटेल सुरू झाली, पण उद्योग रुळावर येण्यास उशीर लागेल.हॉटेल प्राईडचे महाव्यवस्थापक सुजीत सिंग म्हणाले, लोकांमध्ये उत्साह आहे. अनेकांनी माहिती जाणून घेतली. ग्राहकांचा हळूहळू प्रतिसाद मिळेल. अनेकांना नियम आणि अटींची माहिती नाही. निवासी हॉटेल लोकांची गरज आहे. पहिल्याच दिवशी कॉर्पोरेट क्षेत्राकडून खोल्यांसाठी मोठ्या प्रमाणात विचारणा करण्यात आली.नागपूर रेसिडेन्शियल हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष तेजिंदरसिंग रेणू म्हणाले, हॉटेल सुरू झाले आणि लोक येतील, असे पहिल्या दिवशी होणार नाही. प्रतिसाद मिळण्यासाठी एक वा दोन आठवडे वाट पहावी लागेल. बॅन्क्वेट हॉलवर बंधने आहेत. त्यामुळे कोणत्याही कार्यक्रमाचे आयोजन होणार नाही. स्थानिकांच्या प्रतिसादासाठी रेस्टॉरंट सुरू करणे आवश्यक आहेत. हॉटेल्सचे ऑनलाईन पोर्टल आजपासून सुरू झाले आहे. हॉटेलचा खर्च फिक्स आहे. त्यामुळे व्यवसाय वाढला पाहिजे. शासनाने कायदे शिथिल करावेत.

टॅग्स :hotelहॉटेलnagpurनागपूर