शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
2
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
3
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
4
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
5
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
6
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
7
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
8
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
9
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
10
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
11
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
12
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video
13
फक्त २ लाख गुंतवा आणि मिळवा १५ लाखांचा परतावा! आजच गुंतवणूक करण्यासाठी 'हे' सूत्र लागू करा
14
भारताच्या हाती खजिना लागला खजिना...! कोळशाच्या खाणीत दडलेला; लोकसभेत मोठी घोषणा...
15
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
16
वॉरेन बफेटही चुकले! ज्या कंपनीत हात घातला तीच बुडाली, सर्वात मोठं नुकसान! नेमकं काय घडलं?
17
वर्षभरापासून बेपत्ता होता नवरा, मोबाईलने उलगडलं गूढ; बायकोनेच रचलेला भयंकर कट
18
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; प्रज्ञा सिंह ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
19
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
20
ट्रम्प यांचा 'हा' निर्णय भारताला नव्हे तर अमेरिकेलाच महागात पडणार? अहवालातून मोठा खुलासा!

नागपुरात आरटीईचे ६८ टक्के प्रवेश : पुन्हा १५ दिवसाची मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 22:48 IST

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत(आरटीई) जिल्ह्यात ६८ टक्के प्रवेश झाले आहेत. शिक्षण विभागाने आरटीईच्या सोडतीत निवड झालेल्या बालकांचे ३१ ऑगस्टपर्यंत प्रवेश घेण्यास मुदत दिली होती. परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यात आणखी १५ दिवसाची शिथिलता दिली आहे.

ठळक मुद्दे पालकांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत(आरटीई) जिल्ह्यात ६८ टक्के प्रवेश झाले आहेत. शिक्षण विभागाने आरटीईच्या सोडतीत निवड झालेल्या बालकांचे ३१ ऑगस्टपर्यंत प्रवेश घेण्यास मुदत दिली होती. परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यात आणखी १५ दिवसाची शिथिलता दिली आहे. त्यामुळे निवड झालेल्या उर्वरित बालकांना १५ सप्टेंबरला प्रवेश निश्चित करायचे आहेत.राज्यभरात फेब्रुवारी महिन्यापासून आरटीईसाठी नोंदणीची प्रक्रिया राबविण्यात आली. नागपूरमधून ६ हजार ७८४ जागांसाठी ३१ हजार ४४ पालकांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी ६ हजार ६८५ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. १७ मार्चला सोडत निघाल्यावर २१ मार्चपासून देशभरात टाळेबंदी जाहीर झाली. तेव्हापासून आरटीईच्या प्रक्रियेबाबत सरकारकडून कुठलाच निर्णय झाला नाही. त्यामुळे सोडतीत नाव आलेल्या पालकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. दुसरीकडे सीबीएसई आणि काही नामवंत खासगी इंग्रजी शाळांमार्फत प्रवेश सुरू होते. दरम्यान, राज्य शासनाने त्यावर तोडगा काढून प्रवेश प्रक्रियेचा मार्ग मोकळा केला. १ जुलैपासून निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करून घ्यायचे होते. ३१ऑगस्ट ही शेवटची मुदत होती. ३१ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात ४ हजार ५४३ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. आता १५ दिवसाचा पुन्हा अवधी मिळाल्याने पालकांनी लवकरात लवकर पाल्यांचे प्रवेश निश्चित करावे, असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.उत्पन्नाचे प्रमाणपत्र अवैधआरटीईत प्रवेशित विद्यार्थ्यांच्या कागदपत्राच्या तपासणीसाठी कागदपत्र पडताळणी समिती गठित करण्यात आली आहे. या समितीचे सदस्य मो. शाहीद शरीफ यांनी सांगितले की, काही पालकांचे उत्पन्नाचे दाखले अवैध येत आहेत. त्याचबरोबर जात प्रमाणपत्रदेखील पालकांनी बोगस दिले आहे. या प्रमाणपत्राची संबंधित कार्यालयात नोंदणी नसल्याचे आढळले आहे.

टॅग्स :Right To Educationशिक्षण हक्क कायदाnagpurनागपूर