शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

नागपुरात आरटीईचे ६८ टक्के प्रवेश : पुन्हा १५ दिवसाची मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2020 22:48 IST

शिक्षण हक्क कायद्यांतर्गत(आरटीई) जिल्ह्यात ६८ टक्के प्रवेश झाले आहेत. शिक्षण विभागाने आरटीईच्या सोडतीत निवड झालेल्या बालकांचे ३१ ऑगस्टपर्यंत प्रवेश घेण्यास मुदत दिली होती. परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यात आणखी १५ दिवसाची शिथिलता दिली आहे.

ठळक मुद्दे पालकांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत(आरटीई) जिल्ह्यात ६८ टक्के प्रवेश झाले आहेत. शिक्षण विभागाने आरटीईच्या सोडतीत निवड झालेल्या बालकांचे ३१ ऑगस्टपर्यंत प्रवेश घेण्यास मुदत दिली होती. परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यात आणखी १५ दिवसाची शिथिलता दिली आहे. त्यामुळे निवड झालेल्या उर्वरित बालकांना १५ सप्टेंबरला प्रवेश निश्चित करायचे आहेत.राज्यभरात फेब्रुवारी महिन्यापासून आरटीईसाठी नोंदणीची प्रक्रिया राबविण्यात आली. नागपूरमधून ६ हजार ७८४ जागांसाठी ३१ हजार ४४ पालकांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी ६ हजार ६८५ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. १७ मार्चला सोडत निघाल्यावर २१ मार्चपासून देशभरात टाळेबंदी जाहीर झाली. तेव्हापासून आरटीईच्या प्रक्रियेबाबत सरकारकडून कुठलाच निर्णय झाला नाही. त्यामुळे सोडतीत नाव आलेल्या पालकांमध्ये चिंतेचे वातावरण होते. दुसरीकडे सीबीएसई आणि काही नामवंत खासगी इंग्रजी शाळांमार्फत प्रवेश सुरू होते. दरम्यान, राज्य शासनाने त्यावर तोडगा काढून प्रवेश प्रक्रियेचा मार्ग मोकळा केला. १ जुलैपासून निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करून घ्यायचे होते. ३१ऑगस्ट ही शेवटची मुदत होती. ३१ ऑगस्टपर्यंत जिल्ह्यात ४ हजार ५४३ विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले आहेत. आता १५ दिवसाचा पुन्हा अवधी मिळाल्याने पालकांनी लवकरात लवकर पाल्यांचे प्रवेश निश्चित करावे, असे आवाहन शिक्षण विभागाकडून करण्यात आले आहे.उत्पन्नाचे प्रमाणपत्र अवैधआरटीईत प्रवेशित विद्यार्थ्यांच्या कागदपत्राच्या तपासणीसाठी कागदपत्र पडताळणी समिती गठित करण्यात आली आहे. या समितीचे सदस्य मो. शाहीद शरीफ यांनी सांगितले की, काही पालकांचे उत्पन्नाचे दाखले अवैध येत आहेत. त्याचबरोबर जात प्रमाणपत्रदेखील पालकांनी बोगस दिले आहे. या प्रमाणपत्राची संबंधित कार्यालयात नोंदणी नसल्याचे आढळले आहे.

टॅग्स :Right To Educationशिक्षण हक्क कायदाnagpurनागपूर