शहरं
Join us  
Trending Stories
1
विद्यापीठांच्या क्यूएस रँकिंगमध्ये IIT मुंबईची घसरण; ४८ व्या स्थानावरून ७१ व्या स्थानी
2
आजचे राशीभविष्य,०६ नोव्हेंबर २०२५: मनःस्ताप टाळण्यासाठी वाणी संयमित ठेवा; प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
3
भाजपचे प्रभारी जाहीर; मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मुंबई, बीडमध्ये पंकजा मुंडेंना जबाबदारी
4
“७ वर्षे नाही, मग आताच एवढी घाई का झाली? सगळे घोळ दूर करून निवडणुका घ्या”: सुप्रिया सुळे
5
महाराष्ट्राच्या न्यायालयीन सुविधा देशात सर्वोत्तम; भूमिपूजन सोहळ्यात सरन्यायाधीश गवईंचे मत
6
गजकेसरी योगात गुरू वक्री: १० राशींची बरकत, बँक बॅलन्स वाढ; बक्कळ लाभ, पद-प्रतिष्ठा-भरभराट!
7
“बिहारमध्ये पुन्हा जंगलराज नको, विधानसभा निवडणुकीत NDA ला पाठिंबा द्या”: DCM एकनाथ शिंदे
8
पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा, ९ ताब्यात; बागा, हडफडे येथील प्रकार, पोलिसांकडून तपास सुरू
9
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
10
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
11
राज्यात पाच खाण ब्लॉक सुरू; दरवर्षी ५.३ दशलक्ष टन खनिज उत्खनन होणार 
12
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
13
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
14
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
15
उच्च न्यायालयाची नवी इमारत न्यायमंदिर व्हावे; सरन्यायाधीशांच्या हस्ते वास्तूचे भूमिपूजन
16
एशियाटिक अध्यक्षपदासाठी २ माजी खासदार आमनेसामने; लढतीबाबत उत्सुकता
17
इंडक्शन कुकिंग वापरणाऱ्यांना फूटपाथवर अन्न शिजवण्यास मनाईचे ते परिपत्रक गैरलागू: हायकाेर्ट
18
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
19
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
20
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान

६७ वर्षांत ३०२ उमेदवारांनी आजमावले भाग्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 13:43 IST

मागील ६७ वर्षांच्या कालावधीत लोकसभा निवडणुकांबाबत राजकीय पक्षांमध्ये दरवेळेलाच उत्साह दिसून आला. अनेकांनी निवडणुकांसाठी सर्वस्व पणाला लावले. १६ निवडणुकांत तीनशेहून अधिक उमेदवारांनी लोकसभेत प्रवेशासाठी भाग्य आजमावले.

ठळक मुद्दे९४ टक्के उमेदवारांच्या पदरी अपयश१९९६ मध्ये सर्वाधिक ६० उमेदवार रिंगणात

योगेश पांडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मागील ६७ वर्षांच्या कालावधीत लोकसभा निवडणुकांबाबत राजकीय पक्षांमध्ये दरवेळेलाच उत्साह दिसून आला. अनेकांनी निवडणुकांसाठी सर्वस्व पणाला लावले. १६ निवडणुकांत तीनशेहून अधिक उमेदवारांनी लोकसभेत प्रवेशासाठी भाग्य आजमावले. मात्र प्रत्यक्षात यापैकी सुमारे ५ टक्के उमेदवारांनाच यश आले.१९५२ पासूनची आकडेवारी लक्षात घेतली तर नागपूर लोकसभा मतदारसंघातून ३०२ उमेदवार उभे राहिले. यातील १६ उमेदवारांनाच यश मिळाले व ९४.७० उमेदवारांच्या पदरी अपयशच आले. पहिल्या निवडणुकीत केवळ पाच उमेदवार रिंगणात होते. त्यानंतर १९७१ पर्यंत स्पर्धेत असलेल्या उमेदवारांची संख्या ही १० च्या खालीच राहिली. १९७७ मध्ये पहिल्यांदा १० उमेदवार निवडणुकांत उभे होते. त्यानंतर सातत्याने हा आकडा वाढत गेला व १९९१ साली तर ४६ उमेदवारांमध्ये लोकसभेसाठी चढाओढ होती. मात्र १९९६ ची निवडणूक ही नागपूरसाठी ऐतिहासिक राहिली. यावेळी थोडेथोडके नव्हे तर तब्बल ६० उमेदवार रिंगणात होते व मतदारांमध्येदेखील बराच संभ्रम निर्माण झाला होता. उभे राहिलेल्या उमेदवारांमध्ये ४६ उमेदवार हे अपक्ष होते. त्यानंतर मात्र अचानक उमेदवारांची संख्या ८ वर आली. २००९ मध्ये २७ तर मागील निवडणुकीत ३३ उमेदवार एकमेकांविरोधात उभेझाले होते.२०१ उमेदवार अपक्षआश्चर्याची बाब म्हणजे १६ निवडणुकांमध्ये नागपुरातून २०१ उमेदवार हे अपक्ष म्हणून उभे राहिले. यातील केवळ बापूजी अणे यांनाच यश मिळाले होते. १९९६ साली सर्वाधिक ४६ उमेदवार रिंगणात होते. तर १९९१ साली ३६ उमेदवारांनी भाग्य आजमावले होते. १९८४ व १९८९ साली प्रत्येकी २२ उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरले होते. तर मागील निवडणूकांत २१ अपक्षांनी आव्हान दिले होते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक