शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

६७ वर्षांत ३०२ उमेदवारांनी आजमावले भाग्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2019 13:43 IST

मागील ६७ वर्षांच्या कालावधीत लोकसभा निवडणुकांबाबत राजकीय पक्षांमध्ये दरवेळेलाच उत्साह दिसून आला. अनेकांनी निवडणुकांसाठी सर्वस्व पणाला लावले. १६ निवडणुकांत तीनशेहून अधिक उमेदवारांनी लोकसभेत प्रवेशासाठी भाग्य आजमावले.

ठळक मुद्दे९४ टक्के उमेदवारांच्या पदरी अपयश१९९६ मध्ये सर्वाधिक ६० उमेदवार रिंगणात

योगेश पांडे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मागील ६७ वर्षांच्या कालावधीत लोकसभा निवडणुकांबाबत राजकीय पक्षांमध्ये दरवेळेलाच उत्साह दिसून आला. अनेकांनी निवडणुकांसाठी सर्वस्व पणाला लावले. १६ निवडणुकांत तीनशेहून अधिक उमेदवारांनी लोकसभेत प्रवेशासाठी भाग्य आजमावले. मात्र प्रत्यक्षात यापैकी सुमारे ५ टक्के उमेदवारांनाच यश आले.१९५२ पासूनची आकडेवारी लक्षात घेतली तर नागपूर लोकसभा मतदारसंघातून ३०२ उमेदवार उभे राहिले. यातील १६ उमेदवारांनाच यश मिळाले व ९४.७० उमेदवारांच्या पदरी अपयशच आले. पहिल्या निवडणुकीत केवळ पाच उमेदवार रिंगणात होते. त्यानंतर १९७१ पर्यंत स्पर्धेत असलेल्या उमेदवारांची संख्या ही १० च्या खालीच राहिली. १९७७ मध्ये पहिल्यांदा १० उमेदवार निवडणुकांत उभे होते. त्यानंतर सातत्याने हा आकडा वाढत गेला व १९९१ साली तर ४६ उमेदवारांमध्ये लोकसभेसाठी चढाओढ होती. मात्र १९९६ ची निवडणूक ही नागपूरसाठी ऐतिहासिक राहिली. यावेळी थोडेथोडके नव्हे तर तब्बल ६० उमेदवार रिंगणात होते व मतदारांमध्येदेखील बराच संभ्रम निर्माण झाला होता. उभे राहिलेल्या उमेदवारांमध्ये ४६ उमेदवार हे अपक्ष होते. त्यानंतर मात्र अचानक उमेदवारांची संख्या ८ वर आली. २००९ मध्ये २७ तर मागील निवडणुकीत ३३ उमेदवार एकमेकांविरोधात उभेझाले होते.२०१ उमेदवार अपक्षआश्चर्याची बाब म्हणजे १६ निवडणुकांमध्ये नागपुरातून २०१ उमेदवार हे अपक्ष म्हणून उभे राहिले. यातील केवळ बापूजी अणे यांनाच यश मिळाले होते. १९९६ साली सर्वाधिक ४६ उमेदवार रिंगणात होते. तर १९९१ साली ३६ उमेदवारांनी भाग्य आजमावले होते. १९८४ व १९८९ साली प्रत्येकी २२ उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरले होते. तर मागील निवडणूकांत २१ अपक्षांनी आव्हान दिले होते.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक