शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

८० हजारांच्या विम्यासाठी चक्क ६० हजार रुपये हप्ता

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2022 05:45 IST

पंतप्रधान पीकविमा याेजना : अंबिया बहार संत्र्यासाठी सर्वाधिक हप्ता नागपूरच्या माथी

- सुनील चरपेलाेकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पंतप्रधान पीकविमा याेजनेंतर्गत अंबिया बहार संत्र्याचा फळ पीकविमा काढायचा झाल्यास राज्यातील १३ जिल्ह्यांपैकी सर्वाधिक म्हणजे २० हजार रुपये प्रतिहेक्टर विमा हप्ता हा नागपूर जिल्ह्याच्या माथी मारण्यात आला असून, सर्वांत कमी (चार हजार रुपये) हप्ता बीड, हिंगाेली व पुणे जिल्ह्यांच्या वाट्याला गेला आहे. विशेष म्हणजे, नागपूर जिल्ह्यासाठी विमा कंपनीला प्रतिहेक्टरी ६० हजार रुपये मिळत असून, नुकसानभरपाईपाेटी परतावा मात्र ८० हजार रुपयांचा मिळताे. ताे मिळविण्यासाठी बराच मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे संत्रा उत्पादकांनी सांगितले. 

अंबिया बहार संत्रा विम्यासाठी राज्यात शेतकऱ्यांचा वाटा प्रतिहेक्टरी ४ ते २० हजार रुपये ठरविण्यात आला असून, राज्य सरकारचा वाटा हा १३,२०० ते ३१,५०० रुपये आणि केंद्राचा वाटा १० हजार रुपयांचा आहे. २०२०-२१ पर्यंत अंबिया बहार संत्रा विमा काढण्यासाठी विदर्भातील शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी चार हजार रुपयांचा हप्ता द्यावा लागायचा. सन २०२१-२२ मध्ये याचे ट्रिगर बदलले. शिवाय, विमा कंपनी आणि हप्त्यांची रक्कम ही तीन वर्षांसाठी अनिवार्य केली. नागपूर जिल्ह्याचा हप्ता पाच पटीने वाढवून २० हजार रुपये प्रतिहेक्टरी केला. विमा कंपनीला राज्य सरकार प्रतिहेक्टरी ३० हजार, तर केंद्र १० हजार रुपये देते. त्यामुळे कंपनीकडे प्रतिहेक्टरी ६० हजार रुपये जमा केले जात असून, नुकसानभरपाईपाेटी कंपनी प्रतिहेक्टरी ८० हजार रुपये देते. 

नुकसानभरपाईचे ट्रिगर कंपनीच्या फायद्याचे प्रतिहेक्टरी ८० हजार रुपयांची नुकसानभरपाई मिळण्यासाठी ६० हजार रुपयांचा हप्ता देण्याचा व त्यात शेतकऱ्यांच्या वाट्याला आलेला २० हजार रुपयांचा हप्ता काेणत्याही पीक व फळ पीकविम्यासाठी नाही. विमा कंपन्यांचे उखळ पांढरे व्हावे, यासाठी सन २०२०-२१ मध्ये ट्रिगर बदलण्यात आल्याचा आराेप उत्पादकांनी केला आहे. विदर्भात आधी किमान ५० टक्के शेतकरी अंबिया बहार संत्र्याचा विमा काढायचे. ते प्रमाण आता १५ ते १८ टक्क्यांवर आले आहे. 

टॅग्स :Farmerशेतकरी