शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
4
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
5
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
6
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
7
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
8
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
9
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
10
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
11
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
12
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
13
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
14
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
15
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
16
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
17
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
18
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
19
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
20
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
Daily Top 2Weekly Top 5

पदवी परीक्षांना ‘६०:४०’ प्रणाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2016 03:17 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांचे ‘ड्रीम प्रोजेक्ट’ अखेर प्रत्यक्षात

नागपूर विद्यापीठ : विद्वत् परिषदेची मान्यता, पुढील सत्रापासून अंमलबजावणीनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांचे ‘ड्रीम प्रोजेक्ट’ अखेर प्रत्यक्षात येणार आहे. नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा पद्धतीत आमूलाग्र बदल होणार असून सर्व पदवी परीक्षा ६०:४० या ‘पॅटर्न’नुसार होणार आहेत. प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांनी यासंदर्भात पुढाकार घेतला व विद्वत्त परिषदेने याला मान्यता दिली. २०१६-१७ या शैक्षणिक सत्रापासून परीक्षेची ही प्रणाली राबविण्यात येणार आहे.आजच्या परीक्षा प्रणालीमुळे नागपूर विद्यापीठाच्या परीक्षा विभागावर प्रचंड ताण वाढला आहे. परीक्षा विभाग हा विद्यापीठाचा पाठीचा कणा असतो, परंतु तो कोलमडायला आला आहे. अशा स्थितीत विद्यापीठाला खरोखरच प्रगती करायची असेल तर नवीन परीक्षा प्रणालीची अंमलबजावणी करण्याची गरज असल्याचा मानस कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांनी पदग्रहण करताना बोलून दाखविला होता. त्यासंदर्भात पुढे विचार सुरू झाला व प्र-कुलगुरूंच्या अध्यक्षतेखाली सर्वच पदवी अभ्यासक्रमांना ६०:४० परीक्षा प्रणालीचा आराखडा तयार करण्यासाठी समिती बसविण्यात आली. या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांचा खरा कस लागणार आहे. शिवाय विद्यापीठावरील ताणदेखील कमी होईल. याची अंमलबजावणी पुढील सत्रापासूनच करण्यात येईल, असे प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांनी स्पष्ट केले.(प्रतिनिधी)अभियांत्रिकीच्या प्राचार्यांचा अगोदरच होकार४सुरुवातीला नागपूर विद्यापीठाकडून अभियांत्रिकीच्या परीक्षांमध्ये आमूलाग्र बदल करण्याची तयारी सुरू झाली होती. त्यानुसार पुढील सत्रापासून विद्यापीठाकडून केवळ ६० टक्के गुणांचीच वस्तुनिष्ठ परीक्षा घेतली जाईल, तर ४० टक्के परीक्षांचा भार महाविद्यालयांवर असेल असे ठरविण्यात आले होते. विद्यापीठात सर्व अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या प्राचार्यांचीदेखील या नव्या प्रणालीला लागू करण्यासंदर्भात होकार दिला होता.अशी आहे ‘६०:४०’ प्रणालीया ‘६०:४०’ प्रणालीनुसार विद्यार्थ्यांच्या दोन परीक्षा होतील. यातील ४० टक्के गुणांची परीक्षा ही महाविद्यालयाकडून घेण्यात येईल व त्यात विस्तारपूर्वक उत्तरे लिहिण्याची संधी असेल. विद्यापीठाकडून ६० टक्के गुणांची वस्तुनिष्ठ पद्धतीची परीक्षा घेण्यात येईल. विद्यार्थ्यांना यात केवळ अचूक उत्तरांना खूण करावी लागेल. विद्यापीठाच्या परीक्षेसाठी प्रश्नांची ‘बँक’ तयार करण्यात येतील व विद्यार्थ्यांना विविध प्रश्नपत्रिकांचे संच देण्यात येतील. याचे मूल्यांकन ‘आॅनलाईन’ पद्धतीनेच होईल व आठ दिवसात निकाल जाहीर होऊ शकतील. विद्यार्थ्यांच्या मनात शंका असेल तर त्यांना योग्य उत्तरांसोबतच ‘आॅनलाईन’ उत्तरपत्रिका पुरविण्यात येतील.विद्यार्थ्यांपुढील आव्हान वाढणारआताच्या परीक्षा प्रणालीनुसार ‘इंटर्नल’ गुणांच्या आधारावर विद्यार्थी सहजपणे उत्तीर्ण होऊन जातात. परंतु जर ‘६०:४०’ प्रणाली लागू झाली तर विद्यार्थ्यांसमोरील अडचणी वाढणार आहेत. दोन्ही परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांनी वेगवेगळे उत्तीर्ण होणे आवश्यक असेल. दरम्यान,नागपूर विद्यापीठात विविध विद्याशाखांमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी निरनिराळे नियम आहेत. कुठे उत्तीर्ण होण्यासाठी ५० टक्के गुण आवश्यक आहेत, तर काही अभ्यासक्रमांमध्ये ३५ टक्के गुण घेतलेला विद्यार्थी उत्तीर्ण होतो. विद्यापीठात उत्तीर्ण होण्यासाठी समान पद्धत लागू करण्याचा विद्यापीठाचा विचार आहे. यासंदर्भात प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांच्या अध्यक्षतेखाली ६ मे रोजी विशेष बैठक होणार आहे. यात संबंधित निर्णय घेण्यात येईल. पदव्युत्तर अभ्यासक्रमांमध्ये ५० टक्के तर पदवी अभ्यासक्रमांत उत्तीर्ण होण्यासाठी ४० टक्के गुण आवश्यक असल्याच्या प्रस्तावावर या बैठकीत निर्णय घेण्यात येईल.प्रणालीचे फायदे४परीक्षा विभागावरील ताण कमी होईल.४निकालांचा वेग वाढेल.४फेरमूल्यांकनाची प्रणालीच बंद होईल.४गैरप्रकार कमी होतील.४विद्यार्थी स्पर्धा परीक्षेसाठी तयार होतील.४प्राध्यापकांना देण्यात येणारा मानधनाचा खर्च वाचेल.