शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

५८२५ शेतकरी सावकारी कर्जातून मुक्त

By admin | Updated: December 30, 2015 03:24 IST

सावकारी कर्जमाफी योजनेंतर्गत आतापर्यंत आठ जिल्हास्तरीय बैठका घेण्यात आल्या असून आतापर्यंत ५८२५ शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ झाला आहे.

नागपूर : सावकारी कर्जमाफी योजनेंतर्गत आतापर्यंत आठ जिल्हास्तरीय बैठका घेण्यात आल्या असून आतापर्यंत ५८२५ शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ झाला आहे. या शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकाराकडून घेतलेल्या ९.९४ कोटी रुपयांची कर्ज मंजुरी घेतली आहे.याचा जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी आढावा घेतला. त्याअनुषंगाने कर्ज माफीची रक्कम ही संबंधित परवानाधारक सावकारांनी शेतकऱ्यांनी गहाण ठेवलेली तारण वस्तू परत करावी. त्यांच्या पोचपावतीसह माफीची रक्कम प्राप्त करुन घेण्याकरिता प्रस्ताव तालुका सहायक निबंधकाकडे विनाविलंब सादर करावेत, असे निर्देश सुद्धा जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी दिले.परवानाधारक सावकार काही कर्जदारांचीच गहाण वस्तू परत करतात आणि काही लोकांचे गहाण बरेच दिवसापासून परत केलेले नाही. त्यामुळे माफीची रक्कम वितरित करण्यात अडचणी येत आहे. ज्या शेतकरी कर्जदाराला सावकारी कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे त्यांनी देखील स्वत:ची रुजवात तालुका सहायक निबंधकाकडे करून त्यांच्या गहाणवस्तू सावकराकडून स्वत:च्या ताब्यात घेऊन सदर योजनेचा लाभ घ्यावा. बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांना निरोप देऊनसुद्धा ते वेळीच गहाणवस्तू परत नेत नाहीत. त्यामुळे देखील सावकारांच्या खात्यात माफीची रक्कम जमा करण्यात विलंब होत आहे.सर्व तालुका सहायक निबंधकांनी ज्या शेतकरी कर्जदाराला सावकारी कर्जमाफीची रक्कम मंजूर झाली आहे त्या सर्व शेतकरी कर्जदाराला लेखी पत्र द्यावे आणि गहाण वस्तू परत केल्याची पोच पावती व रुजवातीसह प्रस्ताव तालुका सहायक निबंधकांनी विनाविलंब जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नागपूरकडे सादर करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी दिले आहेत. (प्रतिनिधी)