शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
3
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
4
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
5
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
6
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
7
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
8
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
9
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
10
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
11
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
12
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
13
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
14
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
15
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
16
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
17
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
18
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
19
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
20
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."

कोरोना रुग्णामुळे तब्बल २८ दिवसापासून ५५ दुकाने बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 20:47 IST

गणेशपेठ बसस्टॅण्डसमोरील एका निवासी संकुलात कोरोना रुग्ण आढळून आल्यानंतर मनपाने संकुलासमोरील ५५ दुकानांचा परिसर सील केला आहे. रुग्ण सात दिवसातच बरा होऊन शहरात फिरत आहे, पण दुकाने अजूनही सील असल्याने सर्वांचा व्यवसाय ठप्प झाला आहे. दुकाने सुरू करण्याची मागणी व्यापाऱ्यांनी मनपाकडे केली आहे.

ठळक मुद्देव्यवसाय ठप्प : दुकाने उघडण्याची व्यापाऱ्यांची मनपाकडे मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गणेशपेठ बसस्टॅण्डसमोरील एका निवासी संकुलात कोरोना रुग्ण आढळून आल्यानंतर मनपाने संकुलासमोरील ५५ दुकानांचा परिसर सील केला आहे. रुग्ण सात दिवसातच बरा होऊन शहरात फिरत आहे, पण दुकाने अजूनही सील असल्याने सर्वांचा व्यवसाय ठप्प झाला आहे. दुकाने सुरू करण्याची मागणी व्यापाऱ्यांनी मनपाकडे केली आहे.निवासी संकुलात एका फ्लॅटमध्ये १८ जूनला एक कोरोना रुग्ण आढळून आला. या रुग्णाला मेयो रुग्णालयात भरती करण्यात आले. रुग्णावर उपचार करून सात दिवसात सुटी देण्यात आली. तो रूग्ण कामानिमित्त आता शहरात फिरत आहे. पण त्याची शिक्षा दुकानदारांना २८ दिवसांपासून भोगावी लागत आहे. रुग्ण आढल्यानंतर मनपाच्या अधिकाऱ्यांनी दुसऱ्याच दिवशी रस्त्यावरील व्यावसायिक संकुलातील दोन इमारतीचे प्रवेशद्वार कठडे लावून बंद केले. व्यापाऱ्यांना दुकाने उघडण्यास मनाई करण्यात आली. १९ जूनपासून १६ जुलैपर्यंत दुकाने उघडली नाहीत. या दरम्यान व्यापाऱ्यांनी धंतोली झोनच्या सहायक आयुक्त बागडे यांना निवेदन दिले. त्यांनी सात दिवसात दुकाने सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर १४ दिवसानंतर सुरू करू, असे सांगितले. पण आता २८ दिवस झाल्यानंतरही दुकाने सुरू झाली नाहीत.कोरोना रुग्णाची शिक्षा आम्हाला का?कोरोना रुग्ण बरा होऊन शहरात फिरत आहे, पण आमची दुकाने बंद आहेत. या रुग्णााची शिक्षा आम्हाला का? असा सवाल व्यापाऱ्यांनी उपस्थित केला आहे. नाव न सांगण्याच्या अटीवर एका दुकानदाराने सांगितले की, राज्य शासनाच्या १९ मार्चच्या लॉकडाऊननंतर दुकाने तब्बल अडीच महिने बंद होती. ४ जून महिन्यात दुकाने सुरू झाली, पण १९ जूनपासून मनपाने पुन्हा दुकाने बंद केली. या संकुलात ट्रॅव्हलची कार्यालये, प्रिटिंग प्रेस, हॉटेल, स्टेशनरी आणि अनेक आवश्यक वस्तूंची दुकाने आहेत. सर्वांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. दुकान खरेदीसाठी घेतलेल्या कर्जाचे व्याज भरावे लागत आहे. अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोना रुग्णाचे निवास आणि दुकानांमध्ये जवळपास ६० ते ७० मीटरचे अंतर आहे. अशावेळी मनपाने दुकाने उघडण्यास हवी होती. सहायक आयुक्त बागडे फाईल मनपाच्या मुख्य कार्यालयात पाठविल्याचे सांगत आहेत. पण त्यावर अजूनही निर्णय झालेला नाही. दुकाने सुरू होण्याची व्यापारी वाट पाहात आहेत.२८ दिवसानंतर परिसर खुला करूकोरोना रुग्ण आढळल्यानंतर परिसर २८ दिवसांसाठी सील करण्यात येतो. परिसर आणि घटनेची माहिती सहायक आयुक्तांकडून घेऊ. फाईल बघितल्यानंतर परिसर खुला करण्यावर निर्णय घेण्यात येईल.राम जोशी, अतिरिक्त आयुक्त, मनपा.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर