शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना रुग्णामुळे तब्बल २८ दिवसापासून ५५ दुकाने बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2020 20:47 IST

गणेशपेठ बसस्टॅण्डसमोरील एका निवासी संकुलात कोरोना रुग्ण आढळून आल्यानंतर मनपाने संकुलासमोरील ५५ दुकानांचा परिसर सील केला आहे. रुग्ण सात दिवसातच बरा होऊन शहरात फिरत आहे, पण दुकाने अजूनही सील असल्याने सर्वांचा व्यवसाय ठप्प झाला आहे. दुकाने सुरू करण्याची मागणी व्यापाऱ्यांनी मनपाकडे केली आहे.

ठळक मुद्देव्यवसाय ठप्प : दुकाने उघडण्याची व्यापाऱ्यांची मनपाकडे मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गणेशपेठ बसस्टॅण्डसमोरील एका निवासी संकुलात कोरोना रुग्ण आढळून आल्यानंतर मनपाने संकुलासमोरील ५५ दुकानांचा परिसर सील केला आहे. रुग्ण सात दिवसातच बरा होऊन शहरात फिरत आहे, पण दुकाने अजूनही सील असल्याने सर्वांचा व्यवसाय ठप्प झाला आहे. दुकाने सुरू करण्याची मागणी व्यापाऱ्यांनी मनपाकडे केली आहे.निवासी संकुलात एका फ्लॅटमध्ये १८ जूनला एक कोरोना रुग्ण आढळून आला. या रुग्णाला मेयो रुग्णालयात भरती करण्यात आले. रुग्णावर उपचार करून सात दिवसात सुटी देण्यात आली. तो रूग्ण कामानिमित्त आता शहरात फिरत आहे. पण त्याची शिक्षा दुकानदारांना २८ दिवसांपासून भोगावी लागत आहे. रुग्ण आढल्यानंतर मनपाच्या अधिकाऱ्यांनी दुसऱ्याच दिवशी रस्त्यावरील व्यावसायिक संकुलातील दोन इमारतीचे प्रवेशद्वार कठडे लावून बंद केले. व्यापाऱ्यांना दुकाने उघडण्यास मनाई करण्यात आली. १९ जूनपासून १६ जुलैपर्यंत दुकाने उघडली नाहीत. या दरम्यान व्यापाऱ्यांनी धंतोली झोनच्या सहायक आयुक्त बागडे यांना निवेदन दिले. त्यांनी सात दिवसात दुकाने सुरू करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर १४ दिवसानंतर सुरू करू, असे सांगितले. पण आता २८ दिवस झाल्यानंतरही दुकाने सुरू झाली नाहीत.कोरोना रुग्णाची शिक्षा आम्हाला का?कोरोना रुग्ण बरा होऊन शहरात फिरत आहे, पण आमची दुकाने बंद आहेत. या रुग्णााची शिक्षा आम्हाला का? असा सवाल व्यापाऱ्यांनी उपस्थित केला आहे. नाव न सांगण्याच्या अटीवर एका दुकानदाराने सांगितले की, राज्य शासनाच्या १९ मार्चच्या लॉकडाऊननंतर दुकाने तब्बल अडीच महिने बंद होती. ४ जून महिन्यात दुकाने सुरू झाली, पण १९ जूनपासून मनपाने पुन्हा दुकाने बंद केली. या संकुलात ट्रॅव्हलची कार्यालये, प्रिटिंग प्रेस, हॉटेल, स्टेशनरी आणि अनेक आवश्यक वस्तूंची दुकाने आहेत. सर्वांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. दुकान खरेदीसाठी घेतलेल्या कर्जाचे व्याज भरावे लागत आहे. अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोना रुग्णाचे निवास आणि दुकानांमध्ये जवळपास ६० ते ७० मीटरचे अंतर आहे. अशावेळी मनपाने दुकाने उघडण्यास हवी होती. सहायक आयुक्त बागडे फाईल मनपाच्या मुख्य कार्यालयात पाठविल्याचे सांगत आहेत. पण त्यावर अजूनही निर्णय झालेला नाही. दुकाने सुरू होण्याची व्यापारी वाट पाहात आहेत.२८ दिवसानंतर परिसर खुला करूकोरोना रुग्ण आढळल्यानंतर परिसर २८ दिवसांसाठी सील करण्यात येतो. परिसर आणि घटनेची माहिती सहायक आयुक्तांकडून घेऊ. फाईल बघितल्यानंतर परिसर खुला करण्यावर निर्णय घेण्यात येईल.राम जोशी, अतिरिक्त आयुक्त, मनपा.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर