शहरं
Join us  
Trending Stories
1
यावेळी मोठा धमाका करायचा... PM मोदींनी पहलगाम हल्ल्याची बातमी मिळताच मनात आखलेला 'प्लॅन'
2
राजस्थानात पाकिस्तान सीमेपासून १५ किमी दूर कोसळलेला ड्रोन सापडला; बीएसएफकडून चौकशी सुरु
3
Sensex मध्ये १३०० तर Nifty मध्ये ४०० अंकांपेक्षा अधिक तेजी, काय आहे तेजीमागचं कारण?
4
समुद्राचे खारट पाणी गोड करता येणार; तटरक्षक दल, डीआरडीओच्या संशोधकांना मोठे यश
5
'पाकिस्तानची अवस्था घाबरलेल्या कुत्र्यासारखी', अमेरिकेतील माजी अधिकाऱ्याने पार इज्ज काढली
6
अवघ्या २३ वर्षांच्या मुलीने लावली पाकिस्तान-बांगलादेशच्या नात्यात आग! राजदूतांना काढावा लागला पळ
7
संकष्ट चतुर्थी २०२५: एकदंत संकष्ट चतुर्थी असणार खास, 'या' राशींची पूर्ण होणार धन-संपत्तीची आस!
8
अ‍ॅमेझॉन-फ्लिपकार्टवरही पाकिस्तान बॅन? भारताचे ई-कॉमर्स कंपन्यांना स्पष्ट आदेश, यापुढे..
9
"मित्रा, भारतात ॲपलचं उत्पादन करू नकोस"; डोनाल्ड ट्रम्प यांचा टीम कूकना सल्ला... काय आहे नेमका मुद्दा?
10
Mumbai: "युवराज आदित्य ठाकरे या टोलधाडीचे म्होरके होऊन..."; आशिष शेलार ठाकरेंवर भडकले, सगळा घटनाक्रम सांगितला
11
"अफगाणिस्तानचे लोक मनापासून भारतासोबत..." ; मरियम सोलेमानाखिल यांनी पाकिस्तासोबतच्या संबंधावर भाष्य केले
12
Purnam Kumar Shaw : "डोळ्यावर पट्टी बांधून नेलं, टॉर्चर केलं..."; पाकिस्तानातून परतलेल्या BSF जवानाची आपबीती
13
३५ चेंडूत शतक झळकवणारा वैभव सूर्यवंशी दहावीत नापास झाला?; व्हायरल दाव्याचं सत्य जाणून घ्या
14
'पाकिस्तानचा अणुबॉम्ब IAEA च्या देखरेखीखाली आणावा', संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची मागणी
15
तुर्कीनं फक्त मैत्रीसाठी केली नाही भारताविरोधात पाकिस्तानची मदत; खरा हेतू तर भलताच...
16
Gold Rate Today 15 May: एका झटक्यात सोनं २ हजार रुपयांपेक्षा अधिक झालं स्वस्त, चांदीतही मोठी घसरण; काय आहेत नवे दर?
17
पिता न तू वैरी! किन्नर म्हणत पोटच्या मुलीचा जीव घेतला, नंतर पत्नीच्या पायावर डोकं ठेवत म्हणाला...
18
पाकिस्तानशी यारी, तुर्की-अझरबैजानला पडणार भारी; भारतीयांनी अख्खा बाजार उठवला
19
ना गिल, ना पंत... सुनील गावसकर म्हणतात- 'हा' अनुभवी खेळाडू टीम इंडियाचा कसोटी कर्णधार हवा!
20
"आमचा पुरुषांवरचा विश्वास उडाला"; नवऱ्यांनी फसवलं, दोन मैत्रिणींनी एकमेकींशी लग्न केलं

पर्यावरण जागृतीसाठी ५१ व्या वर्षी ‘सायकल यात्रा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 11:00 IST

साधारणत: वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतर अनेकांच्या हालचालींवर काहिशा मर्यादा येतात. मात्र एका जैनधर्मीय नागरिकाने ५१ व्या वर्षी एक अनोखा संकल्प घेतला आहे.

ठळक मुद्देपाच राज्य ओलांडून श्री सम्मेद शिखरजीपर्यंत जाणारजैन नागरिकाचा असाही पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : साधारणत: वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतर अनेकांच्या हालचालींवर काहिशा मर्यादा येतात. मात्र एका जैनधर्मीय नागरिकाने ५१ व्या वर्षी एक अनोखा संकल्प घेतला आहे. पर्यावरणासंबंधात जनजागृती करण्यासाठी त्यांनी सायकल यात्रेला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे यादरम्यान ते पाच राज्यांची भूमी ओलांडणार असून झारखंडमधील जैन तीर्थक्षेत्र श्री सम्मेद शिखरजी येथे या यात्रेचा समारोप होईल. अरविंद आगरकर जैन असे त्यांचे नाव असून त्यांचा उत्साह भल्याभल्यांना थक्क करणारा आहे.मूळचे अकोला येथील असलेले अरविंद आगरकर जैन हे मागील अनेक वर्षांपासून पर्यावरण संवर्धनासाठी कार्य करत आहेत. सोबतच जनआरोग्यासंदर्भातदेखील त्यांनी अनेक उपक्रम राबविले आहेत. यासाठी त्यांनी अनेकदा सायकल यात्रादेखील आयोजित केल्या. यंदा मात्र त्यांनी जास्त मोठा पल्ला गाठण्याचा निर्धार केला व अकोल्यापासून ते थेट श्री सम्मेद शिखरजी गाठण्याचा संकल्प घेतला. या यात्रेदरम्यान ते पेट्रोल बचत तसेच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणार आहेत.११ नोव्हेंबर रोजी अकोला येथील श्री शांतिनाथ चैत्यालय जैन मंदिर येथून त्यांच्या या यात्रेला सुरुवात झाली.सायकल, आवश्यक ते सामान घेऊन ते तेथून निघाले. मंगळवारी रात्री ते नागपुरात आले व बुधवारी सकाळी लक्ष्मीनगर येथील भगवान शांतिनाथ दिगंबर जैन मंदिर येथून पुढील प्रवासाकडे निघाले.याअगोदरदेखील केल्या आहेत सायकलयात्राअरविंद आगरकर जैन यांनी याअगोदरदेखील अनेक सायकल यात्रा केल्या आहेत. नागपूर ते रामटेक, मुक्तागिरी, शिरपूर जैन सायकल यात्रा त्यांनी पूर्ण केली. आजच्या काळात आरोग्य व पर्यावरण दोघांकडेदेखील जास्त लक्ष देण्याची गरज आहे. मात्र लोक याच महत्त्वाच्या बाबींकडे दुर्लक्ष करतात. याबाबतच जनजागृती करण्यासाठी मी हा पुढाकार घेतला असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

१८ दिवसात हजार किलोमीटरचा प्रवासपर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी ही सायकल यात्रा एकूण १८ दिवस चालणार आहे. यात ते जवळपास १७०० किलोमीटरचा प्रवास करतील. नागपूरहून आता ते रामटेक मध्य प्रदेशमधील शिवनी, लखनादौन, जबलपूर, खजुराहो, कटनी, सतना, रिवा, हनुमना, उत्तर प्रदेशमधील मिर्झापूर, वाराणसी, चंदौली, मुगलसराय, बिहारमधील सासाराम, औरंगाबाद ,मदनपूर ,शेरघाटी, डोभी, बाराचट्टी, झारखंड राज्यातील चौपारण, बरही, बरकठा , बागोदर, डुमरी, गिरिडिह, पारसनाथ या मार्गाने श्री सम्मेद शिखरजी येते पोहोचतील.

टॅग्स :environmentवातावरण