शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
2
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
3
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
4
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
5
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल तीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
8
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
9
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
10
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
11
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
12
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
13
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
14
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
15
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
16
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
18
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
19
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
20
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी

पर्यावरण जागृतीसाठी ५१ व्या वर्षी ‘सायकल यात्रा’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2018 11:00 IST

साधारणत: वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतर अनेकांच्या हालचालींवर काहिशा मर्यादा येतात. मात्र एका जैनधर्मीय नागरिकाने ५१ व्या वर्षी एक अनोखा संकल्प घेतला आहे.

ठळक मुद्देपाच राज्य ओलांडून श्री सम्मेद शिखरजीपर्यंत जाणारजैन नागरिकाचा असाही पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : साधारणत: वयाची पन्नाशी ओलांडल्यानंतर अनेकांच्या हालचालींवर काहिशा मर्यादा येतात. मात्र एका जैनधर्मीय नागरिकाने ५१ व्या वर्षी एक अनोखा संकल्प घेतला आहे. पर्यावरणासंबंधात जनजागृती करण्यासाठी त्यांनी सायकल यात्रेला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे यादरम्यान ते पाच राज्यांची भूमी ओलांडणार असून झारखंडमधील जैन तीर्थक्षेत्र श्री सम्मेद शिखरजी येथे या यात्रेचा समारोप होईल. अरविंद आगरकर जैन असे त्यांचे नाव असून त्यांचा उत्साह भल्याभल्यांना थक्क करणारा आहे.मूळचे अकोला येथील असलेले अरविंद आगरकर जैन हे मागील अनेक वर्षांपासून पर्यावरण संवर्धनासाठी कार्य करत आहेत. सोबतच जनआरोग्यासंदर्भातदेखील त्यांनी अनेक उपक्रम राबविले आहेत. यासाठी त्यांनी अनेकदा सायकल यात्रादेखील आयोजित केल्या. यंदा मात्र त्यांनी जास्त मोठा पल्ला गाठण्याचा निर्धार केला व अकोल्यापासून ते थेट श्री सम्मेद शिखरजी गाठण्याचा संकल्प घेतला. या यात्रेदरम्यान ते पेट्रोल बचत तसेच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणार आहेत.११ नोव्हेंबर रोजी अकोला येथील श्री शांतिनाथ चैत्यालय जैन मंदिर येथून त्यांच्या या यात्रेला सुरुवात झाली.सायकल, आवश्यक ते सामान घेऊन ते तेथून निघाले. मंगळवारी रात्री ते नागपुरात आले व बुधवारी सकाळी लक्ष्मीनगर येथील भगवान शांतिनाथ दिगंबर जैन मंदिर येथून पुढील प्रवासाकडे निघाले.याअगोदरदेखील केल्या आहेत सायकलयात्राअरविंद आगरकर जैन यांनी याअगोदरदेखील अनेक सायकल यात्रा केल्या आहेत. नागपूर ते रामटेक, मुक्तागिरी, शिरपूर जैन सायकल यात्रा त्यांनी पूर्ण केली. आजच्या काळात आरोग्य व पर्यावरण दोघांकडेदेखील जास्त लक्ष देण्याची गरज आहे. मात्र लोक याच महत्त्वाच्या बाबींकडे दुर्लक्ष करतात. याबाबतच जनजागृती करण्यासाठी मी हा पुढाकार घेतला असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

१८ दिवसात हजार किलोमीटरचा प्रवासपर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारी ही सायकल यात्रा एकूण १८ दिवस चालणार आहे. यात ते जवळपास १७०० किलोमीटरचा प्रवास करतील. नागपूरहून आता ते रामटेक मध्य प्रदेशमधील शिवनी, लखनादौन, जबलपूर, खजुराहो, कटनी, सतना, रिवा, हनुमना, उत्तर प्रदेशमधील मिर्झापूर, वाराणसी, चंदौली, मुगलसराय, बिहारमधील सासाराम, औरंगाबाद ,मदनपूर ,शेरघाटी, डोभी, बाराचट्टी, झारखंड राज्यातील चौपारण, बरही, बरकठा , बागोदर, डुमरी, गिरिडिह, पारसनाथ या मार्गाने श्री सम्मेद शिखरजी येते पोहोचतील.

टॅग्स :environmentवातावरण