शहरं
Join us  
Trending Stories
1
हैदराबादमध्ये अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं? जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
3
किराडपुऱ्यात आग, सिलिंडर, विजेच्या तारांमुळे सलग तीन स्फोट; चिमुकलीचा मृत्यू, ८ जण भाजले
4
"काय बोलावं सुचत नाहीये, काही प्रश्न..."; Mumbai Indians च्या लाजिरवाण्या पराभवानंतर Hardik Pandya काय म्हणाला, वाचा
5
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
6
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
7
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
8
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
9
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
10
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
11
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
12
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
13
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
14
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
15
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
16
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
17
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
18
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
19
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
20
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास

२०२८ पर्यंत ५०० गिगावॅट नवीकरणीय ऊर्जानिर्मितीचे लक्ष्य :भरत भार्गव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2019 11:27 PM

जीवाश्म इंधनाच्या उपयोगामुळे प्रदूषणाची वाढ होत आहे. त्यामुळे प्रदूषण कमी करण्यासाठी नवीकरणीय ऊर्जास्रोतांवर भर देण्याची गरज आहे. २०२८ पर्यंत देशात ५०० गिगावॅट नवीकरणीय ऊर्जानिर्मिती करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यातूनच २०३० पर्यंत गैरजीवाश्म इंधनातून ४० टक्के वीजनिर्मिती करणे शक्य होईल, असे प्रतिपादन ‘ओएनजीसी एनर्जी सेंटर’चे महासंचालक डॉ.भरत भार्गव यांनी व्यक्त केले. ‘सीएसआयआर-नीरी’तर्फे ‘ऊर्जा, वायुप्रदूषण व वातावरण बदल’ या विषयावर तज्ज्ञांच्या उपस्थितीत मंथन झाले. यावेळी ते बोलत होते.

ठळक मुद्दे ‘नीरी’त ऊर्जा, वायुप्रदूषण व वातावरण बदलांवर मंथन

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : जीवाश्म इंधनाच्या उपयोगामुळे प्रदूषणाची वाढ होत आहे. त्यामुळे प्रदूषण कमी करण्यासाठी नवीकरणीय ऊर्जास्रोतांवर भर देण्याची गरज आहे. २०२८ पर्यंत देशात ५०० गिगावॅट नवीकरणीय ऊर्जानिर्मिती करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यातूनच २०३० पर्यंत गैरजीवाश्म इंधनातून ४० टक्के वीजनिर्मिती करणे शक्य होईल, असे प्रतिपादन ‘ओएनजीसी एनर्जी सेंटर’चे महासंचालक डॉ.भरत भार्गव यांनी व्यक्त केले. ‘सीएसआयआर-नीरी’तर्फे ‘ऊर्जा, वायुप्रदूषण व वातावरण बदल’ या विषयावर तज्ज्ञांच्या उपस्थितीत मंथन झाले. यावेळी ते बोलत होते.‘नीरी’च्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला ‘नीरी’चे संचालक डॉ.राकेश कुमार, मुख्य वैज्ञानिक डॉ.जे.एस.पांडे, डॉ.नितीन लाभसेटवार, ‘स्कील कौन्सिल फॉर ग्रीन जॉब्स’च्या सल्लागार डॉ.परवीन धमीजा, ‘बीएआरसी’च्या पर्यावरण देखरेख विभागाचे प्रमुख डॉ.ए.विनोद कुमार, ‘आयआयटी-कानपूर’चे प्रा.अविनाश कुमार अग्रवाल प्रामुख्याने उपस्थित होते. नवीकरणीय ऊर्जानिर्मितीचे उद्दिष्ट गाठत असताना याचे समाजावर काय परिणाम होतील हेदेखील जाणून घेतले पाहिजे. एकावेळी दोन किंवा अधिक ऊर्जास्रोतांचा उपयोग भविष्यासाठी फायदेशीर ठरेल, असे मत डॉ.भार्गव यांनी व्यक्त केले. ‘बायोमास’ ऊर्जेचा एक स्वच्छ स्रोत ठरू शकतो. त्यावर लक्ष द्यायला हवे. ‘बायोमास’पासून ऊर्जानिर्मितीसाठी प्रभावी तंत्रज्ञान तसेच जनजागृती वाढविण्याची गरज आहे, असे डॉ.परवीन धमिजा यांनी सांगितले. भारतात सद्यस्थितीमध्ये केवळ ४ टक्के अणुउर्जेचा उपयोग होत आहे. अणुऊर्जेचा वापर वाढविण्यासाठी जास्त प्रयत्न करायला हवे, असे आवाहन डॉ.ए.विनोद कुमार यांनी केले. दळणवळण क्षेत्रात प्रदूषणविरहित इंधनाचा उपयोग झाला पाहिजे. सोबतच बॅटरीच्या कचऱ्याचेदेखील योग्य व्यवस्थापन झाले पाहिजे, असे प्रा.अविनाश कुमार यांनी सांगितले. यावेळी ‘द एनर्जी अ‍ॅन्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट’चे डॉ.अरिंदम दत्ता यांनी केंद्र शासनाच्या ‘कुसुम’ या योजनेबाबत माहिती दिली.डॉ.मिलिंद चित्तावार, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उपविभागीय अधिकारी हेमा देशपांडे, ‘आयआयटी-कानपूर’च्या प्रा.अनुभा गोयल, ‘एनआयटी-वारांगल’चे डॉ.सुमंथ चिंथला, डॉ.जे.एस.पांडे, ‘आयआयटी-दिल्ली’चे प्रा.एस.के.दास, डॉ.प्रियदर्शिनी कर्वे, डॉ.कार्थिक बालसुंदरम्, डॉ.सुनील पांडे यांनीदेखील यावेळी मार्गदर्शन केले.तत्पूर्वी स्वागत भाषणादरम्यान डॉ.राकेश कुमार यांनी ‘डाटा’च्या आधारावर जास्तीत जास्त ‘फिल्ड’मध्ये अंमलबजावणीवर भर देण्यात यावा, असे प्रतिपादन केले. असे करत असताना तंत्रज्ञान तसेच विविध मुद्यांवर ‘नीरी’तर्फे नक्कीच सहकार्य करण्यात येईल, असे ते म्हणाले. डॉ.लाभसेटवार यांनी प्रास्ताविक केले. हेमंत भेरवानी यांनी संचालन केले. डॉ.के.व्ही.जॉर्ज, अंकित गुप्ता, अनिल भनारकर, सुवहा लामा यांनी आयोजनासाठी परिश्रम घेतले.

टॅग्स :electricityवीजtechnologyतंत्रज्ञान