शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
4
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
5
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
6
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
7
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
8
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
9
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
10
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
11
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
12
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
13
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
14
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
15
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
16
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
17
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
18
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
19
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
20
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
Daily Top 2Weekly Top 5

२०२८ पर्यंत ५०० गिगावॅट नवीकरणीय ऊर्जानिर्मितीचे लक्ष्य :भरत भार्गव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2019 23:30 IST

जीवाश्म इंधनाच्या उपयोगामुळे प्रदूषणाची वाढ होत आहे. त्यामुळे प्रदूषण कमी करण्यासाठी नवीकरणीय ऊर्जास्रोतांवर भर देण्याची गरज आहे. २०२८ पर्यंत देशात ५०० गिगावॅट नवीकरणीय ऊर्जानिर्मिती करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यातूनच २०३० पर्यंत गैरजीवाश्म इंधनातून ४० टक्के वीजनिर्मिती करणे शक्य होईल, असे प्रतिपादन ‘ओएनजीसी एनर्जी सेंटर’चे महासंचालक डॉ.भरत भार्गव यांनी व्यक्त केले. ‘सीएसआयआर-नीरी’तर्फे ‘ऊर्जा, वायुप्रदूषण व वातावरण बदल’ या विषयावर तज्ज्ञांच्या उपस्थितीत मंथन झाले. यावेळी ते बोलत होते.

ठळक मुद्दे ‘नीरी’त ऊर्जा, वायुप्रदूषण व वातावरण बदलांवर मंथन

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : जीवाश्म इंधनाच्या उपयोगामुळे प्रदूषणाची वाढ होत आहे. त्यामुळे प्रदूषण कमी करण्यासाठी नवीकरणीय ऊर्जास्रोतांवर भर देण्याची गरज आहे. २०२८ पर्यंत देशात ५०० गिगावॅट नवीकरणीय ऊर्जानिर्मिती करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यातूनच २०३० पर्यंत गैरजीवाश्म इंधनातून ४० टक्के वीजनिर्मिती करणे शक्य होईल, असे प्रतिपादन ‘ओएनजीसी एनर्जी सेंटर’चे महासंचालक डॉ.भरत भार्गव यांनी व्यक्त केले. ‘सीएसआयआर-नीरी’तर्फे ‘ऊर्जा, वायुप्रदूषण व वातावरण बदल’ या विषयावर तज्ज्ञांच्या उपस्थितीत मंथन झाले. यावेळी ते बोलत होते.‘नीरी’च्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला ‘नीरी’चे संचालक डॉ.राकेश कुमार, मुख्य वैज्ञानिक डॉ.जे.एस.पांडे, डॉ.नितीन लाभसेटवार, ‘स्कील कौन्सिल फॉर ग्रीन जॉब्स’च्या सल्लागार डॉ.परवीन धमीजा, ‘बीएआरसी’च्या पर्यावरण देखरेख विभागाचे प्रमुख डॉ.ए.विनोद कुमार, ‘आयआयटी-कानपूर’चे प्रा.अविनाश कुमार अग्रवाल प्रामुख्याने उपस्थित होते. नवीकरणीय ऊर्जानिर्मितीचे उद्दिष्ट गाठत असताना याचे समाजावर काय परिणाम होतील हेदेखील जाणून घेतले पाहिजे. एकावेळी दोन किंवा अधिक ऊर्जास्रोतांचा उपयोग भविष्यासाठी फायदेशीर ठरेल, असे मत डॉ.भार्गव यांनी व्यक्त केले. ‘बायोमास’ ऊर्जेचा एक स्वच्छ स्रोत ठरू शकतो. त्यावर लक्ष द्यायला हवे. ‘बायोमास’पासून ऊर्जानिर्मितीसाठी प्रभावी तंत्रज्ञान तसेच जनजागृती वाढविण्याची गरज आहे, असे डॉ.परवीन धमिजा यांनी सांगितले. भारतात सद्यस्थितीमध्ये केवळ ४ टक्के अणुउर्जेचा उपयोग होत आहे. अणुऊर्जेचा वापर वाढविण्यासाठी जास्त प्रयत्न करायला हवे, असे आवाहन डॉ.ए.विनोद कुमार यांनी केले. दळणवळण क्षेत्रात प्रदूषणविरहित इंधनाचा उपयोग झाला पाहिजे. सोबतच बॅटरीच्या कचऱ्याचेदेखील योग्य व्यवस्थापन झाले पाहिजे, असे प्रा.अविनाश कुमार यांनी सांगितले. यावेळी ‘द एनर्जी अ‍ॅन्ड रिसोर्सेस इन्स्टिट्यूट’चे डॉ.अरिंदम दत्ता यांनी केंद्र शासनाच्या ‘कुसुम’ या योजनेबाबत माहिती दिली.डॉ.मिलिंद चित्तावार, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उपविभागीय अधिकारी हेमा देशपांडे, ‘आयआयटी-कानपूर’च्या प्रा.अनुभा गोयल, ‘एनआयटी-वारांगल’चे डॉ.सुमंथ चिंथला, डॉ.जे.एस.पांडे, ‘आयआयटी-दिल्ली’चे प्रा.एस.के.दास, डॉ.प्रियदर्शिनी कर्वे, डॉ.कार्थिक बालसुंदरम्, डॉ.सुनील पांडे यांनीदेखील यावेळी मार्गदर्शन केले.तत्पूर्वी स्वागत भाषणादरम्यान डॉ.राकेश कुमार यांनी ‘डाटा’च्या आधारावर जास्तीत जास्त ‘फिल्ड’मध्ये अंमलबजावणीवर भर देण्यात यावा, असे प्रतिपादन केले. असे करत असताना तंत्रज्ञान तसेच विविध मुद्यांवर ‘नीरी’तर्फे नक्कीच सहकार्य करण्यात येईल, असे ते म्हणाले. डॉ.लाभसेटवार यांनी प्रास्ताविक केले. हेमंत भेरवानी यांनी संचालन केले. डॉ.के.व्ही.जॉर्ज, अंकित गुप्ता, अनिल भनारकर, सुवहा लामा यांनी आयोजनासाठी परिश्रम घेतले.

टॅग्स :electricityवीजtechnologyतंत्रज्ञान