शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
2
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
3
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
4
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
5
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
6
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
7
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
8
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
9
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
10
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
11
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
12
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
13
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
14
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
15
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
16
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
17
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
18
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
19
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
20
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम

राज्यातील ५ औष्णिक वीज केंद्रे रविवारी राहिली बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 11:34 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार रविवारी रात्री ९ वाजता नागरिकांनी आपापल्या घरातील लाईट बंद केले, त्यावेळी राज्यातील केवळ दोनच औष्णिक वीज केंद्रे सुरू होती. उर्वरित पाच औष्णिक वीज केंद्रांना बंद ठेवण्यात आले होते.

ठळक मुद्देजलविद्युत प्रकल्पांचा वापर ग्रीड सुरक्षित ठेवण्यासाठी अधिकारी होते सज्ज

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार रविवारी रात्री ९ वाजता नागरिकांनी आपापल्या घरातील लाईट बंद केले, त्यावेळी राज्यातील केवळ दोनच औष्णिक वीज केंद्रे सुरू होती. उर्वरित पाच औष्णिक वीज केंद्रांना बंद ठेवण्यात आले होते. विजेची उर्वरित मागणी जलविद्युत केंद्रातून पूर्ण करण्यात आली.स्टेट लोड डिस्पॅच सेंटर पूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. त्यांना याची अपेक्षा होती की राज्यात जवळपास १७०० मेगावॅट विजेची मागणी कमी होईल. झालेही तसेच. पॉवर सिस्टिम आॅपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडच्या आकडेवारीनुसार १,७४४ मेगावॅट विजेची मागणी कमी झाली. राज्यातील वीज कंपन्यांनी मात्र १,४७९ मेगावॅटचा परिणाम पडल्याचा दावा केला आहे. महावितरणनुसार रविवारी सायंकाळी ७.३० वाजता एकूण मागणी १४,०५२ मेगावॅट होती, यात मुंबईचा वाटा ४०२ मेगावॅट इतका होता. ९ वाजताच मागणी कमी होणे सुरू झाले. कॉर्पोरेशनद्वारा ओपन एक्सेसला सामील केल्यामुळे त्याचे आकडे थोडे अधिक आहेत. राज्यात स्टेट लोड डिस्पॅच सेंटरचे कामावर लागले होते. ग्रिड वाचवण्यासाठी नाशिक, खापरखेडा, परळी, चंद्रपूर, भुसावळ औष्णिक वीज केंदे्र या दरम्यान बंद ठेवण्यात आली. औष्णिक वीज केंद्राच्या या बॅकडाऊन दरम्यान जलविद्युत प्रकल्प राज्यासाठी वरदान ठरले. कोयना जलविद्युत प्रकल्पातून १८३० मेगावॅट व टाटाच्या जलविद्युत प्रकल्पातून ४०२ मेगावॅट विजेचे उत्पादन करून राज्याची मागणी पूर्ण करण्यात आली.महाराष्ट्राने देशाला सतर्क केलेऊर्जा विभागातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, एकाच वेळी लाईट बंद केल्याने निर्माण होणाऱ्या संभावित धोक्याबाबत महाराष्ट्रानेच देशाचे लक्ष वेधले, सतर्क केले. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी लाईट सुरू ठेवून दिवे प्रज्वलित करण्याचे आवाहन केले होते. यानंतर परिस्थितीवर देशव्यापी चर्चा सुरू झाली. नॅशनल लोड डिस्पॅच सेंटरपासून तर प्रत्येक राज्यातील लोड डिस्पॅच सेंटरने परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पुढाकार घेतला.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस