शहरं
Join us  
Trending Stories
1
जैसलमेर दुर्घटनेतील मृतांचा आकडा २० वर; मोदींकडून दुःख व्यक्त, आर्थिक मदतीची घोषणा
2
जनरल झेडच्या आंदोलनामुळे आणखी एका देशात सत्तापालट!
3
'...तर पाकिस्तान उद्ध्वस्त झाला असता', ऑपरेशन सिंदूरबाबत लेफ्टिनेंट जनरल राजीव घईंचा मोठा खुलासा
4
'२५ हजार दिल्याशिवाय पेन्शन नाही!' रेल्वेच्या लाचखोर मुख्य अधीक्षकाला रंगेहाथ पकडलं
5
रुग्णालयात नेताना आजारी मुलाचा वाटेतच मृत्यू; धक्क्याने वडिलांनीही सोडले प्राण!
6
अमरावती-गडचिरोली मार्गावर २२० क्विंटल 'पोर्टिफाईड तांदूळ' घेऊन जाणारा ट्रक पकडला
7
आरमोरी मार्गावर भरधाव ट्रकची दुचाकीला धडक; दोन भाऊ जागीच ठार!
8
सोनं भारतात सव्वा लाखांच्या पार, पाकिस्तानात किंमत काय? भाव ऐकून तुम्हालाही बसेल 'शॉक'
9
निवडणूक न लढवताही कार्यकर्ते झेडपी, पंचायत समितीचे सदस्य बनणार? बावनकुळेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र 
10
भारत-पाक सामना बरोबरीत सुटला! मग दोन्ही संघातील खेळाडूंमध्ये जे घडलं ते चर्चेत
11
"मी तुमची अनेक प्रकरणे पाहिली आहेत; बोललो तर उगाच...", CJI गवईंनी ईडीला फटकारले
12
गायिका मैथिली ठाकूरचा भाजपमध्ये प्रवेश! दुसऱ्या यादीत येणार नाव, कोणत्या मतदारसंघातून लढणार?
13
‘पात्र गावांना सामूहिक वनहक्क देण्याबाबत तातडीने कार्यवाही करावी’, अजित पवार यांचे आदेश
14
IPS पूरन कुमाार यांच्या पत्नीला अटक करा, ASI संदीप यांच्या कुटुंबीयांनी केली मागणी, कारण काय?
15
तो बापाच्या वशिल्यावर टीम इंडियात आलेला नाही, असं का म्हणाले गंभीर? जाणून घ्या त्यामागचं कनेक्शन
16
मनसेचा मविआमध्ये समावेश होणार की नाही? प्रस्तावाबाबत हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्टच सांगितलं  
17
जैसलमेरमध्ये धावत्या बसला भीषण अचानक आग; १०-१२ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची भिती
18
घायवळला मोक्का लावला, रोहित पवारांनी तो उठवला; सभापती राम शिंदे यांचा गौप्यस्फोट
19
BJP Candidate list: भाजपने १० विद्यमान आमदारांची तिकिटं कापली, ५ जण आहेत माजी मंत्री; पहिल्या यादीमध्ये कोण?
20
३१ व्या मजल्यावरून पडला, चप्पल, मोबाईल सापडले २४ व्या मजल्यावर, तरुणाच्या मृत्यूचं गुढ वाढलं   

राज्यातील ५ औष्णिक वीज केंद्रे रविवारी राहिली बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 11:34 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार रविवारी रात्री ९ वाजता नागरिकांनी आपापल्या घरातील लाईट बंद केले, त्यावेळी राज्यातील केवळ दोनच औष्णिक वीज केंद्रे सुरू होती. उर्वरित पाच औष्णिक वीज केंद्रांना बंद ठेवण्यात आले होते.

ठळक मुद्देजलविद्युत प्रकल्पांचा वापर ग्रीड सुरक्षित ठेवण्यासाठी अधिकारी होते सज्ज

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनानुसार रविवारी रात्री ९ वाजता नागरिकांनी आपापल्या घरातील लाईट बंद केले, त्यावेळी राज्यातील केवळ दोनच औष्णिक वीज केंद्रे सुरू होती. उर्वरित पाच औष्णिक वीज केंद्रांना बंद ठेवण्यात आले होते. विजेची उर्वरित मागणी जलविद्युत केंद्रातून पूर्ण करण्यात आली.स्टेट लोड डिस्पॅच सेंटर पूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. त्यांना याची अपेक्षा होती की राज्यात जवळपास १७०० मेगावॅट विजेची मागणी कमी होईल. झालेही तसेच. पॉवर सिस्टिम आॅपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडच्या आकडेवारीनुसार १,७४४ मेगावॅट विजेची मागणी कमी झाली. राज्यातील वीज कंपन्यांनी मात्र १,४७९ मेगावॅटचा परिणाम पडल्याचा दावा केला आहे. महावितरणनुसार रविवारी सायंकाळी ७.३० वाजता एकूण मागणी १४,०५२ मेगावॅट होती, यात मुंबईचा वाटा ४०२ मेगावॅट इतका होता. ९ वाजताच मागणी कमी होणे सुरू झाले. कॉर्पोरेशनद्वारा ओपन एक्सेसला सामील केल्यामुळे त्याचे आकडे थोडे अधिक आहेत. राज्यात स्टेट लोड डिस्पॅच सेंटरचे कामावर लागले होते. ग्रिड वाचवण्यासाठी नाशिक, खापरखेडा, परळी, चंद्रपूर, भुसावळ औष्णिक वीज केंदे्र या दरम्यान बंद ठेवण्यात आली. औष्णिक वीज केंद्राच्या या बॅकडाऊन दरम्यान जलविद्युत प्रकल्प राज्यासाठी वरदान ठरले. कोयना जलविद्युत प्रकल्पातून १८३० मेगावॅट व टाटाच्या जलविद्युत प्रकल्पातून ४०२ मेगावॅट विजेचे उत्पादन करून राज्याची मागणी पूर्ण करण्यात आली.महाराष्ट्राने देशाला सतर्क केलेऊर्जा विभागातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, एकाच वेळी लाईट बंद केल्याने निर्माण होणाऱ्या संभावित धोक्याबाबत महाराष्ट्रानेच देशाचे लक्ष वेधले, सतर्क केले. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी लाईट सुरू ठेवून दिवे प्रज्वलित करण्याचे आवाहन केले होते. यानंतर परिस्थितीवर देशव्यापी चर्चा सुरू झाली. नॅशनल लोड डिस्पॅच सेंटरपासून तर प्रत्येक राज्यातील लोड डिस्पॅच सेंटरने परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पुढाकार घेतला.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस