शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

अकरावीच्या ४५ हजार जागा रिक्त : महाविद्यालयांची चिंता वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2020 22:17 IST

Concerns of colleges increased अकरावी केंद्रीय प्रवेश समितीने गुरुवारी शहरातील महाविद्यालयांमधील रिक्त जागांची यादी जारी केली. यानुसार नागपुरात कनिष्ठ महाविद्यालयात एकूण ४५ हजार ७१६ जागा रिक्त आहेत.

ठळक मुद्देदुसऱ्या फेरीत प्रवेशासाठी प्रयत्न

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर – अकरावी केंद्रीय प्रवेश समितीने गुरुवारी शहरातील महाविद्यालयांमधील रिक्त जागांची यादी जारी केली. यानुसार नागपुरात कनिष्ठ महाविद्यालयात एकूण ४५ हजार ७१६ जागा रिक्त आहेत. पहिल्या फेरीत केवळ १३ हजार ४५४ जागा भरू शकल्या.

पहिल्या फेरीत विज्ञान शाखेच्या सर्वाधिक २० हजार २३७ जागा रिक्त होत्या, तर वाणिज्य शाखेत १४ हजार ५२ जागा रिकाम्या राहिल्या. दोन्ही शाखांच्या तुलनेत कला शाखेत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी राहिली. त्यामुळे तेथील ८ हजाराहून अधिक जागा रिक्त राहिल्या. दुसऱ्या फेरीत जागा भरतील अशी शिक्षण विभागाला अपेक्षा आहे. कोरोनाच्या संसर्गामुळे महाविद्यालय मिळूनदेखील अनेक विद्यार्थ्यांनी प्रवेशच घेतला नाही.

विभागातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या फेरीत १८ हजार १३२ विद्यार्थ्यांना मेरिटनुसार महाविद्यालयांचे वाटप करण्यात आले होते. मात्र त्यातील केवळ १३ हजार ६४५४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. १ हजार ४१ विद्यार्थ्यांनी व्यवस्थापन कोट्यांतर्गत प्रवेश घेतला.

दुसऱ्या फेरीत जागा रिक्त राहू नये यासाठी महाविद्यालयांकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. अभियांत्रिकी व वैद्यकीय अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांचा वाढता कल लक्षात घेता, अनेक महाविद्यालयात विज्ञान अभ्यासक्रम संचालित केले जात आहेत.

पहिल्या फेरीतील स्थिती

शाखा - एकूण जागा - रिक्त जागा

कला - ९,९६० - ८,०५५

वाणिज्य - १८,००० - १४,०५२

विज्ञान - २७,३८० - २०,२३७

एमसीव्हीसी- ४,१३० - ३,३७२

टॅग्स :collegeमहाविद्यालयnagpurनागपूर