शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
3
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
4
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
5
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
6
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
7
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
8
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
9
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
10
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
11
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
12
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
13
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
14
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
15
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
16
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
17
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
18
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
19
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
20
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 

भांडेवाडीतील कचऱ्याच्या ४२.८० कोटींच्या बायोमायनिंग प्रस्तावाला मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2022 08:00 IST

Nagpur News १० लाख मेट्रिक टन कचऱ्यावर बायोमायनिंग करण्याच्या प्रकल्पासाठी ४२.८० कोटींच्या प्रकल्पाला राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी मंजुरी दिली आहे. हा निधी प्राप्त होताच कामाचे वाटप केले जाणार आहे.

ठळक मुद्दे१० लाख मेट्रिक टन कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून मिळणार सुटका

राजीव सिंह

नागपूर : शहरातून निघणाऱ्या कचऱ्याचे भांडेवाडी येथे ढिगारे लागत आहे. प्रक्रिया बंद असल्याने ढिगारे वाढतच आहे. यातून सुटका व्हावी म्हणून मनपाने बायोमायनिंगच्या पर्यायावर काम सुरू केले आहे. १० लाख मेट्रिक टन कचऱ्यावर बायोमायनिंग करण्याच्या प्रकल्पासाठी ४२.८० कोटींच्या प्रकल्पाला राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी मंजुरी दिली आहे. हा निधी प्राप्त होताच कामाचे वाटप केले जाणार आहे. याआधी मनपा प्रशासनाने १६ लाख मेट्रिक टन कचऱ्यावर बायोमायनिंग प्रक्रिया सुरू केली आहे.

७७ एकर क्षेत्रात पसरलेल्या भांडेवाडी डम्पिंगयार्ड मधील ५२ एकर क्षेत्रात कचरा साठविला जातो. २५ एकर जागेत सांडपाणी प्रक्रिया केंद्र आहे. कचऱ्यावरील प्रक्रियेसाठी हंजर कंपनीची नियुक्ती केली होती. काही वर्षांपूर्वी कंपनीने काम बंद केले.

दररोज १,१०० मेट्रिक टन कचरा संकलित केला जातो. मात्र यावर प्रक्रिया होत नसल्याने कचऱ्याचे ढिगारे लागत आहे. मागील एका दशकात ३० लाख मेट्रिक टन कचरा येथे साठविण्यात आला आहे. मनपातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याला दुजोरा देत बायोमायनिंग प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याची माहिती दिली.

भांडेवाडी येथे साठविण्यात येत असलेल्या कचऱ्यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करून याकडे मनपाचे लक्ष वेधले होते. त्यानंतर मनपा प्रशासनाची झोड उघडली व बायोमायनिंग प्रक्रियेला मंजुरी मिळाली.

स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत मंजुरी

स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत ही मंजुरी मिळाली. राज्यातील २८ शहरांनी बायाेमायनिंगचा पर्याय निवडला.

यासाठी निविदा काढल्या जातील. ४२.८० कोटींपैकी केंद्र सरकारकडून १०.७० कोटी, राज्य सरकारकडून १४.९८ कोटींचा निधी मिळणार आहे. तर मनपा १७.१२ कोटींचा खर्च करणार आहे.

बायाेमायनिंग बनला पर्याय

-कचऱ्याचे ढिगारे कमी करण्यासाठी मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने काही वर्षांपूर्वी १० लाख मेट्रिक टन कचऱ्यावर बायोमायनिंगची निविदा काढली. यात ९ लाख टनावर प्रक्रिया झाला. जानेवारीपर्यंत १ लाख टनावर प्रक्रिया होण्याची शक्यता.

- स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या निधीतून ६ लाख मेट्रिक टन कचऱ्यावर बायोमायनिंग करण्याच्या प्रस्तावाला वर्ष २०२१ मध्ये मंजुरी दिली होती. जिग्मा कंपनीकडे जबाबदारी सोपविली.

- स्वच्छ महाराष्ट्र अभियान २ अंतर्गत नागपूरसह राज्यातील २८ शहरातील बायोमायनिंगचे प्रस्ताव मागविले होते. मनपाने १० लाख मेट्रिक टनाचा प्रस्ताव पाठविला होता. त्याला मंजुरी मिळाली.

- एका दशकात ३० लाख मेट्रिक टन कचरा साठला आहे. याची विल्हेवाट लागावी यासाठी शहरातील नागरिक व नेत्यांनी संघर्ष केला.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्न