शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

भांडेवाडीतील कचऱ्याच्या ४२.८० कोटींच्या बायोमायनिंग प्रस्तावाला मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2022 08:00 IST

Nagpur News १० लाख मेट्रिक टन कचऱ्यावर बायोमायनिंग करण्याच्या प्रकल्पासाठी ४२.८० कोटींच्या प्रकल्पाला राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी मंजुरी दिली आहे. हा निधी प्राप्त होताच कामाचे वाटप केले जाणार आहे.

ठळक मुद्दे१० लाख मेट्रिक टन कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून मिळणार सुटका

राजीव सिंह

नागपूर : शहरातून निघणाऱ्या कचऱ्याचे भांडेवाडी येथे ढिगारे लागत आहे. प्रक्रिया बंद असल्याने ढिगारे वाढतच आहे. यातून सुटका व्हावी म्हणून मनपाने बायोमायनिंगच्या पर्यायावर काम सुरू केले आहे. १० लाख मेट्रिक टन कचऱ्यावर बायोमायनिंग करण्याच्या प्रकल्पासाठी ४२.८० कोटींच्या प्रकल्पाला राज्य सरकारने काही दिवसांपूर्वी मंजुरी दिली आहे. हा निधी प्राप्त होताच कामाचे वाटप केले जाणार आहे. याआधी मनपा प्रशासनाने १६ लाख मेट्रिक टन कचऱ्यावर बायोमायनिंग प्रक्रिया सुरू केली आहे.

७७ एकर क्षेत्रात पसरलेल्या भांडेवाडी डम्पिंगयार्ड मधील ५२ एकर क्षेत्रात कचरा साठविला जातो. २५ एकर जागेत सांडपाणी प्रक्रिया केंद्र आहे. कचऱ्यावरील प्रक्रियेसाठी हंजर कंपनीची नियुक्ती केली होती. काही वर्षांपूर्वी कंपनीने काम बंद केले.

दररोज १,१०० मेट्रिक टन कचरा संकलित केला जातो. मात्र यावर प्रक्रिया होत नसल्याने कचऱ्याचे ढिगारे लागत आहे. मागील एका दशकात ३० लाख मेट्रिक टन कचरा येथे साठविण्यात आला आहे. मनपातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याला दुजोरा देत बायोमायनिंग प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याची माहिती दिली.

भांडेवाडी येथे साठविण्यात येत असलेल्या कचऱ्यासंदर्भात ‘लोकमत’ने वृत्त प्रकाशित करून याकडे मनपाचे लक्ष वेधले होते. त्यानंतर मनपा प्रशासनाची झोड उघडली व बायोमायनिंग प्रक्रियेला मंजुरी मिळाली.

स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत मंजुरी

स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत ही मंजुरी मिळाली. राज्यातील २८ शहरांनी बायाेमायनिंगचा पर्याय निवडला.

यासाठी निविदा काढल्या जातील. ४२.८० कोटींपैकी केंद्र सरकारकडून १०.७० कोटी, राज्य सरकारकडून १४.९८ कोटींचा निधी मिळणार आहे. तर मनपा १७.१२ कोटींचा खर्च करणार आहे.

बायाेमायनिंग बनला पर्याय

-कचऱ्याचे ढिगारे कमी करण्यासाठी मनपाच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने काही वर्षांपूर्वी १० लाख मेट्रिक टन कचऱ्यावर बायोमायनिंगची निविदा काढली. यात ९ लाख टनावर प्रक्रिया झाला. जानेवारीपर्यंत १ लाख टनावर प्रक्रिया होण्याची शक्यता.

- स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या निधीतून ६ लाख मेट्रिक टन कचऱ्यावर बायोमायनिंग करण्याच्या प्रस्तावाला वर्ष २०२१ मध्ये मंजुरी दिली होती. जिग्मा कंपनीकडे जबाबदारी सोपविली.

- स्वच्छ महाराष्ट्र अभियान २ अंतर्गत नागपूरसह राज्यातील २८ शहरातील बायोमायनिंगचे प्रस्ताव मागविले होते. मनपाने १० लाख मेट्रिक टनाचा प्रस्ताव पाठविला होता. त्याला मंजुरी मिळाली.

- एका दशकात ३० लाख मेट्रिक टन कचरा साठला आहे. याची विल्हेवाट लागावी यासाठी शहरातील नागरिक व नेत्यांनी संघर्ष केला.

टॅग्स :Garbage Disposal Issueकचरा प्रश्न