शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

नागपुरात उष्माघाताचे ४१० रुग्ण : मृत्यूची नोंद नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2019 22:47 IST

शहराचे तापमान ४६ अंश सेल्सिअसपर्यंत गेल्याने उष्माघाताच्या रुग्णांत वाढ झाली आहे. आतापर्यंत ४१० रुग्णांची नोंद झाली असून गेल्या आठवड्याभरात यात ८० वर रुग्णांची भर पडल्याची माहिती आहे. उष्माघातासोबतच गॅस्ट्रोच्या रुग्णांचीही संख्या वाढली आहे. ३८० वर रुग्णांना भरती करून उपचार करण्यात आले आहेत.

ठळक मुद्देगॅस्ट्रोच्याही रुग्णांत वाढ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहराचे तापमान ४६ अंश सेल्सिअसपर्यंत गेल्याने उष्माघाताच्या रुग्णांत वाढ झाली आहे. आतापर्यंत ४१० रुग्णांची नोंद झाली असून गेल्या आठवड्याभरात यात ८० वर रुग्णांची भर पडल्याची माहिती आहे. उष्माघातासोबतच गॅस्ट्रोच्या रुग्णांचीही संख्या वाढली आहे. ३८० वर रुग्णांना भरती करून उपचार करण्यात आले आहेत.शासकीय रुग्णालयांच्या शीत वॉर्डमध्ये उष्माघाताच्या रुग्णांची संख्या कमी आहे, मात्र, दूषित अन्न व पाण्यामुळे होणाऱ्या गॅस्ट्रोच्या रोगाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. विशेषत: वृद्ध व लहान मुलांची संख्या मोठी आहे. मनपा आयसोलेशन रुग्णालयात एप्रिल महिन्यात १४०० रुग्णांनी उपचार घेतले, तर मे महिन्यात आतापर्यंत १२५० रुग्णांनी उपचार घेतल्याची माहिती आहे. यातील ३८० रुग्णांवर भरती करून उपचार करण्यात आले आहेत. दूषित अन्न व पाण्यामुळे होणाऱ्या या आजारापासून सतर्क राहण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.उष्माघाताचा मृत्यू नाहीउष्माघात संशयित मृत्यूची संख्या नऊवर गेली आहे. परंतु महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडे अद्यापही या आजराच्या मृत्यूची नोंद नाही. ‘डेथ ऑडिट’ झाल्यावरच तशी नोंद केली जाणार असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

टॅग्स :Sun strokeउष्माघातnagpurनागपूर