शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील ४१ हजारावर शेतकरी होणार भूमिस्वामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 21:52 IST

विदर्भातील भूमिधारी शेतकऱ्यांच्या जमिनी कोणतीही रक्कम न आकारता निर्बंधमुक्त करण्याचा ऐतिहासिक निर्णय महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखालील उपसमितीने घेतला आहे. या निर्णयामुळे एकट्या विदर्भातील एक लाखांहून अधिक भूमिधारी शेतकरी कुटुंब आता भूमिस्वामी होणार आहेत.

ठळक मुद्दे१५ वर्षांपासूनचा लढा यशस्वी : शेतकऱ्यांना भरावयाची रक्कम माफ

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विदर्भातील भूमिधारी शेतकऱ्यांच्या जमिनी कोणतीही रक्कम न आकारता निर्बंधमुक्त करण्याचा ऐतिहासिक निर्णय महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखालील उपसमितीने घेतला आहे. या निर्णयामुळे एकट्या विदर्भातील एक लाखांहून अधिक भूमिधारी शेतकरी कुटुंब आता भूमिस्वामी होणार आहेत. एकट्या नागपुरातील ४१,७४६ शेतकऱ्यांना लाभ मिळणार असून ते आता भूमिस्वामी होतील, अशी माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत दिली.मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत बुधवारी वर्ग दोनच्या अशा भूमिधारी जमिनी आता भूमिस्वामी म्हणून रूपांतरित करून शेतकऱ्यांना त्या जमिनीचे स्वामी करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच या जमिनीचा धारणाधिकार बदलताना शुल्क आकारण्याची तरतूद रद्द करून यासाठी कोणतीही रक्कम न आकारता शासनानेच ही प्रक्रिया करण्याचे ठरविण्यात आले. यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल संहितेमध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी तातडीने अध्यादेश काढण्याचाही निर्णय घेण्यात आला असल्याचे पालकमंत्री बावनकुळे यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्य स्थापनेपासून हा विषय प्रलंबित होता. गेल्या १५ वर्षांपासून आम्हीही हा विषय सभागृहात लावून धरला होता. त्याला यश आले असून नागपूरसह भंडारा व गोंदियातील शेतकऱ्यांना याचा सर्वाधिक लाभ होणार असल्याचे पालकमंत्र्यांनी स्पष्ट केले.नागपुरात एकूण १ लाख २२ हजार ३६७ वर्ग २ खातेदारांची संख्या आहे. यापैकी मार्च २०१८ पर्यंत वर्ग १ मध्ये ८०,६२१ प्रकरणे रूपांतरित झाली आहेत. तब्बल ४१, ७४६ प्रकरणे शिल्लक आहेत. ती सर्व आता वर्ग एक मध्ये रूपांतरित होतील.पत्रपरिषदेला आ. समीर मेघे,. आ. सुधीर पारवे, आ. गिरीश व्यास, अशोक धोटे, अशोक मानकर, डॉ. राजीव पोतदार आदी उपस्थित होते.

 

टॅग्स :FarmerशेतकरीChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळे