शहरं
Join us  
Trending Stories
1
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
2
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
3
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
4
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
5
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
6
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
7
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
8
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
9
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
10
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
11
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
12
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
13
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
14
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
15
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
16
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
17
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
18
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
19
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
20
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू

२३ दिवसांत तोडले नागपुरातील  ४०४४ वीज कनेक्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 21:13 IST

Power connections in Nagpur cut off थकबाकी वसुलीच्या मोहिमेला महावितरणने आणखी गती दिली असून, जुलै महिन्याच्या २३ तारखेपर्यंत शहरात ४०४४ ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडण्यात आले आहे.

ठळक मुद्देमहावितरणच्या मोहिमेला गती : शहरात आणखी हजारो ग्राहकांचे तोडणार कनेक्शन

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : थकबाकी वसुलीच्या मोहिमेला महावितरणने आणखी गती दिली असून, जुलै महिन्याच्या २३ तारखेपर्यंत शहरात ४०४४ ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडण्यात आले आहे. शहरातील आणखी हजारो ग्राहकांचे कनेक्शन तोडण्यात येणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. या ग्राहकांनी वीजबिल न भरल्यास त्यांचे कनेक्शनही तोडण्यात येणार आहे.

महावितरणच्या आकडेवारीनुसार नागपूर शहर परिमंडळात या महिन्यात सर्वाधिक १३२६ कनेक्शन महाल विभागातील तोडण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे कॉंग्रेसनगर विभागात ८६२, सिव्हिल लाइन्समध्ये ८७१ आणि गांधीबाग विभागातील ५३१ ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडण्यात आले आहे. शाखा कार्यालयापासून परिमंडळ कार्यालयातील कर्मचारी याच कामाला लागले आहेत. संवेदनशील परिसरात पोलिसांच्या मदतीने कनेक्शन तोडण्यात येत आहेत. दीर्घ कालावधीपासून वीजबिल न भरणाऱ्या ग्राहकांची वीज कापण्यास प्राधान्य द्यावे, असा आदेश कर्मचाऱ्यांना देण्यात आला असल्याचे कंपनीच्या सूत्रांनी सांगितले. परिमंडळात दोन लाखांहून अधिक ग्राहकांकडे विजेची थकबाकी आहे. आता उर्वरित थकबाकीदार असलेल्या ग्राहकांची वीज कापण्यात येणार आहे. महावितरणच्या या मोहिमेमुळे अभियंता आणि कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे. त्यांच्या मते अशी मोहीम मार्चमध्ये सुरू असते; परंतु यावर्षी जुलै-ऑगस्टमध्ये कारवाई होत आहे. यामुळे वितरण यंत्रणेवर लक्ष देण्यास कर्मचाऱ्यांना वेळ मिळत नसल्याची स्थिती आहे.

दागिने गहाण ठेवताहेत नागरिक

विजेचे बिल नियमितपणे भरले पाहिजे यात दुमत नाही; परंतु महावितरणच्या कार्यालयात पोहोचत असलेल्या थकबाकीदारांचा त्रासही मोठा आहे. नागरिकांच्या मते कोरोनाच्या काळात मिळकत बंद झाल्यामुळे ते बिल भरू शकले नाहीत. कंपनीच्या कार्यालयात गेलेल्या एका दांपत्याने सांगितले की, घरातील सर्वच जण कोरोना पॉझिटिव्ह झाले होते. त्यांच्या उपचारासाठी खूप पैसे खर्च झाले. त्यामुळे बिल भरू न शकल्याने त्यांचे वीज कनेक्शन तोडण्यात आले, तर वीज कनेक्शन तोडल्यानंतर बिल भरण्यासाठी दागिने गहाण ठेवल्याचे एका महिलेने सांगितले.

थकबाकी भरून कारवाईपासून बचाव करा : महावितरण

महावितरणच्या मते, आर्थिक स्थिती खराब झाली असल्यामुळे ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. संपूर्ण प्रदेशात थकबाकीदारांचे वीज कनेक्शन तोडण्यात येत आहे. थकबाकीदारांनी थकबाकी भरून कारवाईपासून बचाव करावा.

टॅग्स :electricityवीजbillबिल