शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
2
अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
3
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
4
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
5
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
6
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
7
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
8
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
9
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
10
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
11
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
12
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
13
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार
14
WTC मध्ये राडा! हाताने चेंडूने जमिनीवर टाकला तरीही फलंदाज नाबाद; ऑस्ट्रेलिया टीम हैराण, नियम काय?
15
Air India Flight Emergency Landing : Air India च्या विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी; 156 प्रवाशांचा जीव टांगणीला
16
पुण्याला मुसळधार पावसाने झोडपले; सिंहगड रोडवरील नाल्यात ज्येष्ठ महिला वाहून गेली
17
Israel Attack Iran: इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे लष्करप्रमुख हुसैन सलामी ठार, दोन अणुशास्त्रज्ञांचाही मृत्यू 
18
तीन लग्न, ४ मुलं, करिश्मा कपूरच्या एक्स पती किती होता श्रीमंत?, मागे सोडली इतकी संपत्ती
19
विमान, वेग अन् विनाश : हे आहेत जगभरातील आतापर्यंतचे सर्वात मोठे विमान अपघात
20
Nandita Mahtani : रणबीर कपूरला केलं डेट, विराट कोहलीशीही कनेक्शन; संजय कपूरची पहिली पत्नी कोण?

२३ दिवसांत तोडले नागपुरातील  ४०४४ वीज कनेक्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 21:13 IST

Power connections in Nagpur cut off थकबाकी वसुलीच्या मोहिमेला महावितरणने आणखी गती दिली असून, जुलै महिन्याच्या २३ तारखेपर्यंत शहरात ४०४४ ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडण्यात आले आहे.

ठळक मुद्देमहावितरणच्या मोहिमेला गती : शहरात आणखी हजारो ग्राहकांचे तोडणार कनेक्शन

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : थकबाकी वसुलीच्या मोहिमेला महावितरणने आणखी गती दिली असून, जुलै महिन्याच्या २३ तारखेपर्यंत शहरात ४०४४ ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडण्यात आले आहे. शहरातील आणखी हजारो ग्राहकांचे कनेक्शन तोडण्यात येणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. या ग्राहकांनी वीजबिल न भरल्यास त्यांचे कनेक्शनही तोडण्यात येणार आहे.

महावितरणच्या आकडेवारीनुसार नागपूर शहर परिमंडळात या महिन्यात सर्वाधिक १३२६ कनेक्शन महाल विभागातील तोडण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे कॉंग्रेसनगर विभागात ८६२, सिव्हिल लाइन्समध्ये ८७१ आणि गांधीबाग विभागातील ५३१ ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडण्यात आले आहे. शाखा कार्यालयापासून परिमंडळ कार्यालयातील कर्मचारी याच कामाला लागले आहेत. संवेदनशील परिसरात पोलिसांच्या मदतीने कनेक्शन तोडण्यात येत आहेत. दीर्घ कालावधीपासून वीजबिल न भरणाऱ्या ग्राहकांची वीज कापण्यास प्राधान्य द्यावे, असा आदेश कर्मचाऱ्यांना देण्यात आला असल्याचे कंपनीच्या सूत्रांनी सांगितले. परिमंडळात दोन लाखांहून अधिक ग्राहकांकडे विजेची थकबाकी आहे. आता उर्वरित थकबाकीदार असलेल्या ग्राहकांची वीज कापण्यात येणार आहे. महावितरणच्या या मोहिमेमुळे अभियंता आणि कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे. त्यांच्या मते अशी मोहीम मार्चमध्ये सुरू असते; परंतु यावर्षी जुलै-ऑगस्टमध्ये कारवाई होत आहे. यामुळे वितरण यंत्रणेवर लक्ष देण्यास कर्मचाऱ्यांना वेळ मिळत नसल्याची स्थिती आहे.

दागिने गहाण ठेवताहेत नागरिक

विजेचे बिल नियमितपणे भरले पाहिजे यात दुमत नाही; परंतु महावितरणच्या कार्यालयात पोहोचत असलेल्या थकबाकीदारांचा त्रासही मोठा आहे. नागरिकांच्या मते कोरोनाच्या काळात मिळकत बंद झाल्यामुळे ते बिल भरू शकले नाहीत. कंपनीच्या कार्यालयात गेलेल्या एका दांपत्याने सांगितले की, घरातील सर्वच जण कोरोना पॉझिटिव्ह झाले होते. त्यांच्या उपचारासाठी खूप पैसे खर्च झाले. त्यामुळे बिल भरू न शकल्याने त्यांचे वीज कनेक्शन तोडण्यात आले, तर वीज कनेक्शन तोडल्यानंतर बिल भरण्यासाठी दागिने गहाण ठेवल्याचे एका महिलेने सांगितले.

थकबाकी भरून कारवाईपासून बचाव करा : महावितरण

महावितरणच्या मते, आर्थिक स्थिती खराब झाली असल्यामुळे ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. संपूर्ण प्रदेशात थकबाकीदारांचे वीज कनेक्शन तोडण्यात येत आहे. थकबाकीदारांनी थकबाकी भरून कारवाईपासून बचाव करावा.

टॅग्स :electricityवीजbillबिल