शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
2
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
3
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
4
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
5
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
6
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
7
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
8
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
9
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
10
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
11
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
12
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
13
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
14
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
15
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
16
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
17
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
18
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
19
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
20
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
Daily Top 2Weekly Top 5

२३ दिवसांत तोडले ४०४४ वीज कनेक्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:07 IST

नागपूर : थकबाकी वसुलीच्या मोहिमेला महावितरणने आणखी गती दिली असून, जुलै महिन्याच्या २३ तारखेपर्यंत शहरात ४०४४ ग्राहकांचे वीज कनेक्शन ...

नागपूर : थकबाकी वसुलीच्या मोहिमेला महावितरणने आणखी गती दिली असून, जुलै महिन्याच्या २३ तारखेपर्यंत शहरात ४०४४ ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडण्यात आले आहे. शहरातील आणखी हजारो ग्राहकांचे कनेक्शन तोडण्यात येणार असल्याचा दावा कंपनीने केला आहे. या ग्राहकांनी वीजबिल न भरल्यास त्यांचे कनेक्शनही तोडण्यात येणार आहे.

महावितरणच्या आकडेवारीनुसार नागपूर शहर परिमंडळात या महिन्यात सर्वाधिक १३२६ कनेक्शन महाल विभागातील तोडण्यात आले आहेत. त्याचप्रमाणे कॉंग्रेसनगर विभागात ८६२, सिव्हिल लाइन्समध्ये ८७१ आणि गांधीबाग विभागातील ५३१ ग्राहकांचे वीज कनेक्शन तोडण्यात आले आहे. शाखा कार्यालयापासून परिमंडळ कार्यालयातील कर्मचारी याच कामाला लागले आहेत. संवेदनशील परिसरात पोलिसांच्या मदतीने कनेक्शन तोडण्यात येत आहेत. दीर्घ कालावधीपासून वीजबिल न भरणाऱ्या ग्राहकांची वीज कापण्यास प्राधान्य द्यावे, असा आदेश कर्मचाऱ्यांना देण्यात आला असल्याचे कंपनीच्या सूत्रांनी सांगितले. परिमंडळात दोन लाखांहून अधिक ग्राहकांकडे विजेची थकबाकी आहे. आता उर्वरित थकबाकीदार असलेल्या ग्राहकांची वीज कापण्यात येणार आहे. महावितरणच्या या मोहिमेमुळे अभियंता आणि कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे. त्यांच्या मते अशी मोहीम मार्चमध्ये सुरू असते; परंतु यावर्षी जुलै-ऑगस्टमध्ये कारवाई होत आहे. यामुळे वितरण यंत्रणेवर लक्ष देण्यास कर्मचाऱ्यांना वेळ मिळत नसल्याची स्थिती आहे.

............

दागिने गहाण ठेवताहेत नागरिक

विजेचे बिल नियमितपणे भरले पाहिजे यात दुमत नाही; परंतु महावितरणच्या कार्यालयात पोहोचत असलेल्या थकबाकीदारांचा त्रासही मोठा आहे. नागरिकांच्या मते कोरोनाच्या काळात मिळकत बंद झाल्यामुळे ते बिल भरू शकले नाहीत. कंपनीच्या कार्यालयात गेलेल्या एका दांपत्याने सांगितले की, घरातील सर्वच जण कोरोना पॉझिटिव्ह झाले होते. त्यांच्या उपचारासाठी खूप पैसे खर्च झाले. त्यामुळे बिल भरू न शकल्याने त्यांचे वीज कनेक्शन तोडण्यात आले, तर वीज कनेक्शन तोडल्यानंतर बिल भरण्यासाठी दागिने गहाण ठेवल्याचे एका महिलेने सांगितले.

थकबाकी भरून कारवाईपासून बचाव करा : महावितरण

महावितरणच्या मते, आर्थिक स्थिती खराब झाली असल्यामुळे ही मोहीम सुरू करण्यात आली आहे. संपूर्ण प्रदेशात थकबाकीदारांचे वीज कनेक्शन तोडण्यात येत आहे. थकबाकीदारांनी थकबाकी भरून कारवाईपासून बचाव करावा.

.............