शहरं
Join us  
Trending Stories
1
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
2
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
3
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
4
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
5
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
6
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
7
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
8
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
9
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
10
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
11
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
12
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
13
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
14
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
15
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
16
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
17
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
18
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
19
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
20
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी

नागपुरात ४०० टन बटाटे आणि ३०० टन कांदे विक्रीविना शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 00:13 IST

गुरुवारी ५० ट्रक बटाटे (एक ट्रक १६ ते २० टन) आणि ३० पेक्षा जास्त ट्रकची आवक झाली. विक्रीविना ४०० टन बटाटे आणि ३०० टन कांदे बाजारात शिल्लक आहेत. त्यामुळे भाव घसरले आहेत.

ठळक मुद्देकोरोनामुळे विक्री घटली : शेतकऱ्यांकडून आवक वाढली

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : येथील कळमन्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डमध्ये तीन दिवसांपासून कांदे-बटाट्यांची आवक अचानक वाढली आहे. तर दुसरीकडे ग्राहकांनी खरेदी कमी केली आहे. गुरुवारी ५० ट्रक बटाटे (एक ट्रक १६ ते २० टन) आणि ३० पेक्षा जास्त ट्रकची आवक झाली. विक्रीविना ४०० टन बटाटे आणि ३०० टन कांदे बाजारात शिल्लक आहेत. त्यामुळे भाव घसरले आहेत.कळमन्यात २० रुपये किलोवर गेलेले दर्जेदार कांदे १५ रुपये आणि बटाटे १८ रुपयांवरून १५ रुपयांपर्यंत उतरले आहेत. ठोकमध्ये भाव उतरल्याचा फायदा किरकोळमध्ये ग्राहकांना मिळत नाही. त्यांच्याकडे जास्त भावात खरेदी केलेला साठा असल्याने किरकोळ विक्रेते भाव कमी करण्यास तयार नाहीत. रेस्टॉरंट आणि हॉटेल्स ३१ मार्चपर्यंत बंद असल्याने कांदे-बटाट्यांचा साठा करण्यास कुणीही तयार नाही. याशिवाय ग्राहकांकडून खरेदी कमी झाली आहे. त्यामुळे भाव आणखी कमी होणार असल्याचे अडतियांनी सांगितले. बाजारपेठा बंद राहण्याच्या अफवांमुळे लोकांनी आधीच जास्त खरेदी केली आहे. त्यामुळे ग्राहक आवश्यक तेवढीच भाजी करीत आहेत.आज पुन्हा वाढणार कांदे-बटाट्यांची आवकशुक्रवारी कळमना कांदे-बटाटे बाजारपेठ बंद आहे. आधीच माल पडून आहे. शनिवारी आवक मोठ्या प्रमाणात होणार आहे. कांदे आणि बटाटे चार ते पाच दिवस टिकणारे आहेत. आवकीच्या प्रमाणात मागणी कमी असल्याने माल विक्रीविना पडून राहण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे अडतिया आणि व्यापारी मालाची ऑर्डर कमी करण्याच्या तयारीत आहेत. पूर्वीच शिल्लक असलेला माल विकण्याची व्यापाऱ्यांची तयारी आहे. कळमन्यात अन्य राज्यात आणि जिल्ह्यामध्येही पुरवठा कमी झाला आहे.देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता केंद्रासह अनेक राज्ये सरकारांनी लोकोपयोगी निर्णय घेतले आहेत. बाजारपेठा बंद राहण्याची भीती व्यापाऱ्यांमध्ये आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या बाजारपेठा वगळता रेस्टॉरंट, मॉल आणि अन्ये दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याचाच परिणाम म्हणून शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी गुरुवारी मोठ्या प्रमाणात कांदे-बटाटे विक्रीसाठी कळमना बाजारात पाठविले. पण मागणीपेक्षा जास्त माल बाजारात आल्याने कांदे-बटाट्यांचा साठा शिल्लक आहे.फळांची आवक वाढलीसध्या कळमन्यात संत्री, सफरचंद आणि अननसाची आवक वाढली आहे. ग्राहक नसल्याने फळे मोठ्या प्रमाणात बाजारात विक्रीविना शिल्लक आहेत. दिवसेंदिवस आवक वाढत आहे. विक्री कशी करायची, याची चिंता व्यापाऱ्यांना सतावत आहे.

टॅग्स :onionकांदाnagpurनागपूर