शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वे चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
3
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
4
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
5
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
6
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
7
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
8
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
9
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
10
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
11
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
12
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
13
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
14
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
15
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
16
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
17
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
18
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
19
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."
20
Video: ऑन कॅमेरा उपमुख्यमंत्री अन् आमदारात खडाजंगी; एकमेकांवर वाहिली शिव्यांची लाखोळी...

नागपुरात ४०० टन बटाटे आणि ३०० टन कांदे विक्रीविना शिल्लक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2020 00:13 IST

गुरुवारी ५० ट्रक बटाटे (एक ट्रक १६ ते २० टन) आणि ३० पेक्षा जास्त ट्रकची आवक झाली. विक्रीविना ४०० टन बटाटे आणि ३०० टन कांदे बाजारात शिल्लक आहेत. त्यामुळे भाव घसरले आहेत.

ठळक मुद्देकोरोनामुळे विक्री घटली : शेतकऱ्यांकडून आवक वाढली

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : येथील कळमन्यात कृषी उत्पन्न बाजार समितीच्या यार्डमध्ये तीन दिवसांपासून कांदे-बटाट्यांची आवक अचानक वाढली आहे. तर दुसरीकडे ग्राहकांनी खरेदी कमी केली आहे. गुरुवारी ५० ट्रक बटाटे (एक ट्रक १६ ते २० टन) आणि ३० पेक्षा जास्त ट्रकची आवक झाली. विक्रीविना ४०० टन बटाटे आणि ३०० टन कांदे बाजारात शिल्लक आहेत. त्यामुळे भाव घसरले आहेत.कळमन्यात २० रुपये किलोवर गेलेले दर्जेदार कांदे १५ रुपये आणि बटाटे १८ रुपयांवरून १५ रुपयांपर्यंत उतरले आहेत. ठोकमध्ये भाव उतरल्याचा फायदा किरकोळमध्ये ग्राहकांना मिळत नाही. त्यांच्याकडे जास्त भावात खरेदी केलेला साठा असल्याने किरकोळ विक्रेते भाव कमी करण्यास तयार नाहीत. रेस्टॉरंट आणि हॉटेल्स ३१ मार्चपर्यंत बंद असल्याने कांदे-बटाट्यांचा साठा करण्यास कुणीही तयार नाही. याशिवाय ग्राहकांकडून खरेदी कमी झाली आहे. त्यामुळे भाव आणखी कमी होणार असल्याचे अडतियांनी सांगितले. बाजारपेठा बंद राहण्याच्या अफवांमुळे लोकांनी आधीच जास्त खरेदी केली आहे. त्यामुळे ग्राहक आवश्यक तेवढीच भाजी करीत आहेत.आज पुन्हा वाढणार कांदे-बटाट्यांची आवकशुक्रवारी कळमना कांदे-बटाटे बाजारपेठ बंद आहे. आधीच माल पडून आहे. शनिवारी आवक मोठ्या प्रमाणात होणार आहे. कांदे आणि बटाटे चार ते पाच दिवस टिकणारे आहेत. आवकीच्या प्रमाणात मागणी कमी असल्याने माल विक्रीविना पडून राहण्याची शक्यता वाढली आहे. त्यामुळे अडतिया आणि व्यापारी मालाची ऑर्डर कमी करण्याच्या तयारीत आहेत. पूर्वीच शिल्लक असलेला माल विकण्याची व्यापाऱ्यांची तयारी आहे. कळमन्यात अन्य राज्यात आणि जिल्ह्यामध्येही पुरवठा कमी झाला आहे.देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता केंद्रासह अनेक राज्ये सरकारांनी लोकोपयोगी निर्णय घेतले आहेत. बाजारपेठा बंद राहण्याची भीती व्यापाऱ्यांमध्ये आहे. जीवनावश्यक वस्तूंच्या बाजारपेठा वगळता रेस्टॉरंट, मॉल आणि अन्ये दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्याचाच परिणाम म्हणून शेतकरी आणि व्यापाऱ्यांनी गुरुवारी मोठ्या प्रमाणात कांदे-बटाटे विक्रीसाठी कळमना बाजारात पाठविले. पण मागणीपेक्षा जास्त माल बाजारात आल्याने कांदे-बटाट्यांचा साठा शिल्लक आहे.फळांची आवक वाढलीसध्या कळमन्यात संत्री, सफरचंद आणि अननसाची आवक वाढली आहे. ग्राहक नसल्याने फळे मोठ्या प्रमाणात बाजारात विक्रीविना शिल्लक आहेत. दिवसेंदिवस आवक वाढत आहे. विक्री कशी करायची, याची चिंता व्यापाऱ्यांना सतावत आहे.

टॅग्स :onionकांदाnagpurनागपूर