शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

नागपूर व रामटेकमध्ये प्रत्येकी ४०० उमदेवार उभे करणार

By गणेश हुड | Updated: March 19, 2024 20:02 IST

इंडिया अगेंस्ट ईव्हीएमचा निर्धार : आयोगाची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप

नागपूर : 'ईव्हीएम'च्या वापराबाबत अनेक तक्रारी आहेत. त्यात छेडछाड करता येते, निकाल फिरविता येत असल्याने 'ईव्हीएम'द्वारे मतदान घेण्यावर नागरिकांचा विश्वास राहिलेला नाही. केंद्रीय निवडणूक आयोगाकडे बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची वारंवार मागणी केली, यासाठी देशभरात आंदोलन केले. परंतु निवडणूक आयोगाने त्याची दखल घेतलेली नाही. देशातील लोकशाही जीवंत ठेवण्यासाठी नागपूर व रामटेक लोकसभा मतदार संघात प्रत्येकी ४०० उमेदवार उभे करण्याचा निर्धार इंडिया अगेंस्ट ईव्हीएम चे पदाधिकारी अॅड. आकाश मून, अॅड. स्मिता कांबळे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

देशातील निवडणूक प्रक्रीया ही निष्पक्ष व पारदर्शी असणे आवश्यक आहे. परंतु निवडणूक आयोगाचीच भूमिका संशयास्पद आहे. सर्वोच्च न्यायालय सुध्दा यावर ठोस भूमिका घेताना दिसत नसल्याने देशापुढे मोठे संकट आहे. यामुळे रामटेक व नागपूर लोकसभा मतदार संघात प्रत्येकी ४०० उमेदवार उभे केल्यास ईव्हीएम मशीन काम करणार नाही. पर्यायाने बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्या लागतील. महाराष्ट्रात रामटेक व नागपूर लोकसभेची निवडणूक पहिल्या टप्प्यात असल्याने त्यानंतरच्या टप्प्यात राज्याच्या अन्य भागातही नागपूर व रामटेक प्रमाणे प्रत्येकी ४०० उमेदवार उभे राहतील असा विश्वास इंडिया अगेंस्ट ईव्हीएमच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. यावेळी इंडिया अगेंस्ट ईव्हीएमचे मार्गदर्शक अमन कांबळे , राष्ट्रीय प्रवक्ते विश्वास पाटील, राज सुखदेवे,भारत लोखंडे, अरुण भारशंक,राजेश लांजेवार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

२०१८ पासून ईव्हीएम विरोधात लढा

ईव्हीएम विरोधात २०१८ पासून देशभरात लढा सुरू आहे. निवडणूक आयोगाकडे ८ हजार तक्रारी आहेत. सर्वोच्च न्यायालयानेही ईव्हीएम हॅक होवू शकते असे मान्य केले आहे. अशा परिस्थितीत देशातील निवडणुका निष्पक्ष व पारदर्शी होणार नाही. ईव्हीएम नसेल तर भाजपची सत्ता येणार नाही. मतदारांच्या मतांची चोरी होत असल्याने बॅलेटनुसार निवडणुका घ्याव्यात अशी मागणी अॅड. आकाश मून यांनी केली.

जपान,अमेरिकेत ईव्हीएमवर बंदी का?

ईव्हीएमध्ये छेडछाड करता येत नसल्याचा दावा निवडणूक आयोगाकडून केला जातो. परंतु भारतापेक्षा तंत्रज्ञानात प्रगत असलेल्या जपान, अमेरिका यासारख्या देशात ईव्हीएमवर बंदी आहे. या देशांनी ईव्हीएमवर बंदी का घातली याचाही निवडणूक आयोगाने खुलासा करावा, सोबतच याचा अभ्यास करावा असा सल्ला इंडिया अगेंस्ट ईव्हीएमच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिला.

तर निवडणूक विभागाची चिंता वाढणार

लोकसभा निवडणुकीत ४०० पेक्षा जास्त उमेदवार उभे राहिल्यास ईव्हीएम काम करणार नाही. परिणामी बॅलेटवर निवडणुका घ्याव्या लागतील. नागपूर व रामटेक मतदार संघात असे झाले जिल्हा निवडणूक विभागाची चिंता वाढणार आहे. त्यांना अडचणींना सामोरे जावे लागेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

 

टॅग्स :nagpurनागपूर