शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
2
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
3
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
4
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
6
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
7
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
8
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
9
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
10
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
11
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
12
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
13
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
14
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
15
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
16
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
17
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
18
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
19
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
20
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'

नागपूर व रामटेकमध्ये प्रत्येकी ४०० उमदेवार उभे करणार

By गणेश हुड | Updated: March 19, 2024 20:02 IST

इंडिया अगेंस्ट ईव्हीएमचा निर्धार : आयोगाची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप

नागपूर : 'ईव्हीएम'च्या वापराबाबत अनेक तक्रारी आहेत. त्यात छेडछाड करता येते, निकाल फिरविता येत असल्याने 'ईव्हीएम'द्वारे मतदान घेण्यावर नागरिकांचा विश्वास राहिलेला नाही. केंद्रीय निवडणूक आयोगाकडे बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची वारंवार मागणी केली, यासाठी देशभरात आंदोलन केले. परंतु निवडणूक आयोगाने त्याची दखल घेतलेली नाही. देशातील लोकशाही जीवंत ठेवण्यासाठी नागपूर व रामटेक लोकसभा मतदार संघात प्रत्येकी ४०० उमेदवार उभे करण्याचा निर्धार इंडिया अगेंस्ट ईव्हीएम चे पदाधिकारी अॅड. आकाश मून, अॅड. स्मिता कांबळे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

देशातील निवडणूक प्रक्रीया ही निष्पक्ष व पारदर्शी असणे आवश्यक आहे. परंतु निवडणूक आयोगाचीच भूमिका संशयास्पद आहे. सर्वोच्च न्यायालय सुध्दा यावर ठोस भूमिका घेताना दिसत नसल्याने देशापुढे मोठे संकट आहे. यामुळे रामटेक व नागपूर लोकसभा मतदार संघात प्रत्येकी ४०० उमेदवार उभे केल्यास ईव्हीएम मशीन काम करणार नाही. पर्यायाने बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्या लागतील. महाराष्ट्रात रामटेक व नागपूर लोकसभेची निवडणूक पहिल्या टप्प्यात असल्याने त्यानंतरच्या टप्प्यात राज्याच्या अन्य भागातही नागपूर व रामटेक प्रमाणे प्रत्येकी ४०० उमेदवार उभे राहतील असा विश्वास इंडिया अगेंस्ट ईव्हीएमच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. यावेळी इंडिया अगेंस्ट ईव्हीएमचे मार्गदर्शक अमन कांबळे , राष्ट्रीय प्रवक्ते विश्वास पाटील, राज सुखदेवे,भारत लोखंडे, अरुण भारशंक,राजेश लांजेवार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

२०१८ पासून ईव्हीएम विरोधात लढा

ईव्हीएम विरोधात २०१८ पासून देशभरात लढा सुरू आहे. निवडणूक आयोगाकडे ८ हजार तक्रारी आहेत. सर्वोच्च न्यायालयानेही ईव्हीएम हॅक होवू शकते असे मान्य केले आहे. अशा परिस्थितीत देशातील निवडणुका निष्पक्ष व पारदर्शी होणार नाही. ईव्हीएम नसेल तर भाजपची सत्ता येणार नाही. मतदारांच्या मतांची चोरी होत असल्याने बॅलेटनुसार निवडणुका घ्याव्यात अशी मागणी अॅड. आकाश मून यांनी केली.

जपान,अमेरिकेत ईव्हीएमवर बंदी का?

ईव्हीएमध्ये छेडछाड करता येत नसल्याचा दावा निवडणूक आयोगाकडून केला जातो. परंतु भारतापेक्षा तंत्रज्ञानात प्रगत असलेल्या जपान, अमेरिका यासारख्या देशात ईव्हीएमवर बंदी आहे. या देशांनी ईव्हीएमवर बंदी का घातली याचाही निवडणूक आयोगाने खुलासा करावा, सोबतच याचा अभ्यास करावा असा सल्ला इंडिया अगेंस्ट ईव्हीएमच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिला.

तर निवडणूक विभागाची चिंता वाढणार

लोकसभा निवडणुकीत ४०० पेक्षा जास्त उमेदवार उभे राहिल्यास ईव्हीएम काम करणार नाही. परिणामी बॅलेटवर निवडणुका घ्याव्या लागतील. नागपूर व रामटेक मतदार संघात असे झाले जिल्हा निवडणूक विभागाची चिंता वाढणार आहे. त्यांना अडचणींना सामोरे जावे लागेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

 

टॅग्स :nagpurनागपूर