शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
2
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
3
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
4
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
5
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
6
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
7
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
8
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
9
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
10
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
11
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?
12
'एक गरिबांचा, तर दुसरा श्रीमंतांचा; दोन देश निर्माण केले', राहुल गांधींचा PM मोदींवर निशाणा
13
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठी घसरण, Silver ₹३५०० तर Gold किती रुपयांनी झालं स्वस्त?
14
DSP Rishikant Shukla: दहा वर्षांच्या सेवेतच जमवली १०० कोटींची माया; एक दोन नव्हे, तब्बल १२ भूखंड, ११ दुकाने अन्...
15
पत्नीने दिला जुळ्यां मुलांना जन्म, पती म्हणाला, ही माझी मुलंच नाहीत, जोरदार राडा, अखेरीस समोर आलं वेगळंच सत्य
16
बाजारात खळबळ! Hyundai ने ₹७.९० लाखात लाँच केली नवीन 'व्हेन्यू २०२५'; जबरदस्त फीचर्स आणि ADAS सह एंट्री
17
अरे व्वा! पांढरे केस हे वाढलेल्या वयाचं लक्षण नाही, ही तर आहे शरीरासाठी संरक्षण ढाल
18
दीड वर्षांपूर्वीच्या पल्लेदार कौशल हत्येचा पर्दाफाश! बायकोच्या 'डबल गेम'ने पोलीसही हादरले
19
मैदान गाजवले, आता ब्रँड व्हॅल्यूही वाढली! महिला क्रिकेटपटूंच्या कमाईत दुप्पट वाढ; सर्वाधिक फी कोणाची?
20
पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टात मोठा स्फोट! इस्लामाबादमध्ये खळबळ; बेसमेंटमध्ये झालेल्या ब्लास्टने इमारतीला हादरवले

नागपूर व रामटेकमध्ये प्रत्येकी ४०० उमदेवार उभे करणार

By गणेश हुड | Updated: March 19, 2024 20:02 IST

इंडिया अगेंस्ट ईव्हीएमचा निर्धार : आयोगाची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप

नागपूर : 'ईव्हीएम'च्या वापराबाबत अनेक तक्रारी आहेत. त्यात छेडछाड करता येते, निकाल फिरविता येत असल्याने 'ईव्हीएम'द्वारे मतदान घेण्यावर नागरिकांचा विश्वास राहिलेला नाही. केंद्रीय निवडणूक आयोगाकडे बॅलेट पेपरवर निवडणुका घेण्याची वारंवार मागणी केली, यासाठी देशभरात आंदोलन केले. परंतु निवडणूक आयोगाने त्याची दखल घेतलेली नाही. देशातील लोकशाही जीवंत ठेवण्यासाठी नागपूर व रामटेक लोकसभा मतदार संघात प्रत्येकी ४०० उमेदवार उभे करण्याचा निर्धार इंडिया अगेंस्ट ईव्हीएम चे पदाधिकारी अॅड. आकाश मून, अॅड. स्मिता कांबळे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

देशातील निवडणूक प्रक्रीया ही निष्पक्ष व पारदर्शी असणे आवश्यक आहे. परंतु निवडणूक आयोगाचीच भूमिका संशयास्पद आहे. सर्वोच्च न्यायालय सुध्दा यावर ठोस भूमिका घेताना दिसत नसल्याने देशापुढे मोठे संकट आहे. यामुळे रामटेक व नागपूर लोकसभा मतदार संघात प्रत्येकी ४०० उमेदवार उभे केल्यास ईव्हीएम मशीन काम करणार नाही. पर्यायाने बॅलेट पेपरवर निवडणुका घ्याव्या लागतील. महाराष्ट्रात रामटेक व नागपूर लोकसभेची निवडणूक पहिल्या टप्प्यात असल्याने त्यानंतरच्या टप्प्यात राज्याच्या अन्य भागातही नागपूर व रामटेक प्रमाणे प्रत्येकी ४०० उमेदवार उभे राहतील असा विश्वास इंडिया अगेंस्ट ईव्हीएमच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. यावेळी इंडिया अगेंस्ट ईव्हीएमचे मार्गदर्शक अमन कांबळे , राष्ट्रीय प्रवक्ते विश्वास पाटील, राज सुखदेवे,भारत लोखंडे, अरुण भारशंक,राजेश लांजेवार यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

२०१८ पासून ईव्हीएम विरोधात लढा

ईव्हीएम विरोधात २०१८ पासून देशभरात लढा सुरू आहे. निवडणूक आयोगाकडे ८ हजार तक्रारी आहेत. सर्वोच्च न्यायालयानेही ईव्हीएम हॅक होवू शकते असे मान्य केले आहे. अशा परिस्थितीत देशातील निवडणुका निष्पक्ष व पारदर्शी होणार नाही. ईव्हीएम नसेल तर भाजपची सत्ता येणार नाही. मतदारांच्या मतांची चोरी होत असल्याने बॅलेटनुसार निवडणुका घ्याव्यात अशी मागणी अॅड. आकाश मून यांनी केली.

जपान,अमेरिकेत ईव्हीएमवर बंदी का?

ईव्हीएमध्ये छेडछाड करता येत नसल्याचा दावा निवडणूक आयोगाकडून केला जातो. परंतु भारतापेक्षा तंत्रज्ञानात प्रगत असलेल्या जपान, अमेरिका यासारख्या देशात ईव्हीएमवर बंदी आहे. या देशांनी ईव्हीएमवर बंदी का घातली याचाही निवडणूक आयोगाने खुलासा करावा, सोबतच याचा अभ्यास करावा असा सल्ला इंडिया अगेंस्ट ईव्हीएमच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी दिला.

तर निवडणूक विभागाची चिंता वाढणार

लोकसभा निवडणुकीत ४०० पेक्षा जास्त उमेदवार उभे राहिल्यास ईव्हीएम काम करणार नाही. परिणामी बॅलेटवर निवडणुका घ्याव्या लागतील. नागपूर व रामटेक मतदार संघात असे झाले जिल्हा निवडणूक विभागाची चिंता वाढणार आहे. त्यांना अडचणींना सामोरे जावे लागेल अशी शक्यता वर्तवली जात आहे.

 

टॅग्स :nagpurनागपूर