शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

नागपूर व रामटेक लोकसभा मतदारसंघ निवडणुकीसाठी ४० हजार कर्मचारी सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2019 21:35 IST

सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. नागपूर व रामटेक लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही पहिल्याच टप्प्यात म्हणजे ११ एप्रिल रोजी होणार आहे. यासोबतच काटोल विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूकही होणार आहे. यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असून पारदर्शी निवडणुका पार पाडण्यासाठी तब्बल ४० हजार कर्मचारी सज्ज आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी सोमवारी पत्रपरिषदेत दिली.

ठळक मुद्देप्रशासन सज्ज : आदर्श आचारसंहितेचे पालन व्हावे : जिल्हाधिकारी अश्विन मुदगलजिल्ह्यात एकूण ४३८२ मतदान केंद्रे : रामटेक २३४५, नागपूर २०३७, ८२ मतदान केंद्र संवेदनशील

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. नागपूर व रामटेक लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही पहिल्याच टप्प्यात म्हणजे ११ एप्रिल रोजी होणार आहे. यासोबतच काटोल विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूकही होणार आहे. यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असून पारदर्शी निवडणुका पार पाडण्यासाठी तब्बल ४० हजार कर्मचारी सज्ज आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी सोमवारी पत्रपरिषदेत दिली.जिल्हाधिकारी मुदगल यांनी सांगितले की, लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यामुळे तत्काळ प्रभावाने नागपूर जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे. याच्या काटेकोर अंमलबजावणीसाठी सर्व राजकीय पक्ष, सर्व शासकीय, निमशासकीय कार्यालये, संस्था तसेच प्रशासकीय नियंत्रणाखालील महामंडळे, सार्वजनिक उपक्रम आदींना निर्देश जारी करण्यात आले आहेत. निवडणुकीसाठी संपूर्ण प्रशासन यंत्रणा सज्ज आहे. प्रत्यक्ष निवडणुकीच्या कामात २८ हजार कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. ५ ते ६ हजार कर्मचारी इतर कामांसाठी लागतात. अशी एकूण ३५ ते ३६ हजार कर्मचाऱ्यांची गरज आहेत. प्रत्यक्षात ४० हजार कर्मचारी सज्ज ठेवण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, मनपा आयुक्त अभिजित बांगर, पोलीस अधीक्षक ओला, नासुप्र सभापती शीतल उगले, सीईओ संजय यादव, अतिरिक्त जिल्हाधिकारी श्रीकांत फडके, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र खजांजी, उपजिल्हाधिकारी राजलक्ष्मी शहा उपस्थित होते.नामांकन अर्ज दाखल करण्याचीनामांकन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया १८ मार्चपासूनलोकसभा निवडणुकीसाठी १८ मार्चपासून नामांकन अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकरी अश्विन मुदगल यांनी दिली.नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदार क्षेत्रात मतदानासाठी ४३८२ मतदान केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत. यात रामटेक मतदारसंघात २३४५ तर नागपूर मतदारसंघात २०३७ मतदार केंद्रे आहेत. यापैकी ८२ मतदार केंद्रे संवेदनशील आहेत. यात ५२ केंद्रे शहरात तर ३० केंद्रे रामटेक लोकसभा मतदार संघात आहेत. या मतदान केंद्रावर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त किंवा सीसीटीव्ही लावण्यात येणार असल्याचेही जिल्हाधिकारी मुदगल यांनी सांगितले.असा आहे कार्यक्रम

  • १८ मार्चपासून अर्ज भरण्यास सुरुवात
  • २५ मार्च अर्ज दाखल करण्याची अंतिम तारीख
  • २६ मार्चला अर्जाची छाननी
  • २८ मार्चपर्यंत अर्ज मागे घेता येईल
  • ११ एप्रिलला मतदान
  • २३ मे रोजी मतमोजणी

नागपूर लोकसभा : विधानसभा क्षेत्रनिहाय मतदार केंद्राची संख्यादक्षिण- पश्चिम - ३७२दक्षिण नागपूर - ३४४पूर्व नागपूर - ३३४मध्य नागपूर - ३०५पश्चिम नागपूर - ३३१उत्तर नागपूर - ३५१रामटेक लोकसभा : विधानसभा क्षेत्रनिहाय मतदान केंद्रांची संख्याकाटोल - ३२८सावनेर - ३६४हिंगणा - ४३३उमरेड - ३८३कामठी - ४८०रामटेक - ३५७कायदा व सुव्यवस्थेसाठी नऊ हजारावर पोलीस कर्मचारी तैनात : भूषणकुमार उपाध्यायलोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था सांभाळण्यासाठी तब्बल ८ ते ९ हजार पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले असल्याची माहिती पोलीस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी पत्रपरिषदेत दिली.डॉ. उपाध्याय यांनी सांगितले की, तब्बल ६ हजार पोलीस कर्मचारी, १ हजार पोलीस अधिकारी, १५०० होमगार्ड तैनात राहतील. यासोबतच सीआरपीएफच्या दोन कंपनीही देण्यात आलेल्या आहेत. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने शहरात फ्लॅग मार्च काढण्यात येईल. निवडणुकीमध्ये जी असामाजिक तत्त्वांची मंडळी गडबड करू शकतात अशा लोकांची यादी तयार करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध कारवाई केली जाईल. यासोबतच इतर संवेदनशील लोकांविरुद्धही कारवाई केली जाणार आहे. वॉण्टेड लोकांची यादी सुद्धा तयार करण्यात आलेली आहे. तसेच गंभीर गुन्हे असलेल्या गुन्हेगारांवर आवश्यक कारवाई करण्यात येणार असल्याचेही डॉ. उपाध्याय यांनी सांगितले.१२५ ठिकाणी अचानक होणार नाकेबंदीनागपुरातील १२५ ठिकाणे अशी निश्चित करण्यात आली आहेत. जिथे वाहतूक आणि पोलीस विभाग मिळून अचानक नाकेबंदी करून वाहनांची तपासणी करतील. जेणेकरून दारूचा साठा किंवा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इतर काही अवैध कृत्य होऊ नयेत.नागपूर सीमेवर अतिरिक्त सुरक्षा पथकनागपूर जिल्ह्याला लागून मध्य प्रदेशची सीमा आहे. निवडणुकीच्या काळात मध्य प्रदेशातून नागपूर जिल्ह्यात दारूचा पुरवठा होता कामा नये किंवा मतदानाच्या दिवशी तिकडील लोक इकडे येता कामा नये, यासाठी सीमवेर अतिरिक्त सुरक्षा ठेवण्यात येईल. तसेच विशेष पथक नियुक्त करण्यात येणार असून १३ तारखेला दोन्ही जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची बैठक होणार असल्याचे जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी सांगितले.

 

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९nagpurनागपूर