शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

नागपूरच्या मनोरुग्णालयात २० दिवसात ४ रुग्णांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 00:04 IST

प्रादेशिक मनोरुग्णालयात उपचारार्थ असलेल्या ४ रुग्णांचा गेल्या २० दिवसात मृत्यू झाला आहे. रु ग्णांच्या वाढत्या मृत्यूमुळे रुग्णालय प्रशासनाची चिंता वाढली आहे.

ठळक मुद्देरुग्णालय प्रशासनाची चिंता वाढली : वैद्यकीय सुविधा नसल्याची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : प्रादेशिक मनोरुग्णालयात उपचारार्थ असलेल्या ४ रुग्णांचा गेल्या २० दिवसात मृत्यू झाला आहे. रु ग्णांच्या वाढत्या मृत्यूमुळे रुग्णालय प्रशासनाची चिंता वाढली आहे. सूत्रांच्या मते, प्रत्येक महिन्यात दोन रुग्णाचा मृत्यू होत आहे. त्यामुळे वर्षभरात मृत्यूचा आकडा २४ ते २६ झाला आहे. याचे कारण रुग्णालयात मेडिसीन फिजिशियन नसल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु गेल्या पाच ते सहा महिन्यापूर्वी आरोग्य उपसंचालकांनी येथे प्रतिनियुक्तीवर एका फिजिशियनची नियुक्ती केली होती, तरीसुद्धा येथे रुग्णांचा मृत्यू होतच आहे. या वर्षाच्या सुरुवातीलाच जानेवारीच्या २० तारखेपर्यंत येथे उपचार घेत असलेल्या चार रुग्णांचा मृत्यू झाल्याने प्रशासनाच्या दुर्लक्षावर बोट दाखविले जात आहे. रुग्णालय प्रशासनाकडून रुग्णांची देखभाल नीट होत नसल्याची चर्चा आहे तसेच डॉक्टरांची मानसिकतासुद्धा येथे केवळ दीड ते दोन तास काम करण्याची आहे.वैद्यकीय सुविधांचा अभावरुग्णालयाचे अधीक्षक डॉ. प्रवीण नवखरे म्हणाले की, रुग्णालयात फिजिशियनकडून प्राथमिक उपचार केले जातात, परंतु रुग्ण हे वेगवेगळ्या आजाराने ग्रस्त असतात. त्या अनुषंगाने रुग्णालयात वैद्यकीय सुविधा उपलब्ध नाही. रुग्णाला स्थानिक डॉक्टरांच्या सल्ल्याने उपचारासाठी मेडिकल रुग्णालयात पाठविण्यात येते. रुग्णालयात येण्यापूर्वी जर रुग्णाची वैद्यकीय तपासणी झाल्यास त्याच्यावर योग्य उपचार करता येऊ शकतात.

टॅग्स :mental hospitalमनोरूग्णालयnagpurनागपूर