शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

विषबाधेच्या चौकशीसाठी ४ सदस्यीय समिती गठित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2020 20:14 IST

३२ विद्यार्थ्यांना पोषण आहारातून विषबाधा झाल्याच्या प्रकरणाला शिक्षण विभागाने गांभीर्याने घेतले आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी ४ सदस्यीय समिती गठित केली आहे. चौकशी समितीत दोषी आढळल्यास फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देदोषी आढळल्यास होणार फौजदारी कारवाई : बचतगटाकडून काढले पोषण आहाराचे काम

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : ३२ विद्यार्थ्यांना पोषण आहारातून विषबाधा झाल्याच्या प्रकरणाला शिक्षण विभागाने गांभीर्याने घेतले आहे. या प्रकरणाच्या चौकशीसाठी ४ सदस्यीय समिती गठित केली आहे. चौकशी समितीत दोषी आढळल्यास फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. ज्या बचतगटाकडून शाळेला पोषण आहाराचा पुरवठा होत होता. त्यांच्याकडून काम काढून घेण्यात आले आहे.हुडकेश्वर रोडवरील मारोतराव मुडे हायस्कूलमध्ये ७ सप्टेंबर रोजी ३२ मुलांना पोषण आहार खाल्याने विषबाधा झाली होती. या मुलांना मेडिकलमध्ये भरती करण्यात आले होते. शाळेत पोषण आहार पुरवठा करण्याचे कंत्राट शगुन महिला बचत गटाला देण्यात आले होते. जिल्हा परिषदच्या शिक्षण विभागाने हे प्रकरण गांभीर्याने घेतले असून शिक्षणाधिकारी चिंतामण वंजारी यांनी चार सदस्यीय समिती गठित केली आहे. उपशिक्षणाधिकारी प्रकाश ढवंगळे यांच्या नेतृत्वात गठित करण्यात आलेल्या समितीत लेखाधिकारी मनीष मानमोडे, शालेय पोषण आहार विभागाचे अधीक्षक गौतम गेडाम व सुजाता आगरकर यांचा समावेश आहे. समिती गुरुवारला पोषण आहार तयार करणाऱ्या स्थळाची पाहणी करणार आहे. त्याचप्रमाणे शाळेतील शिक्षक, मुख्याध्यापक व विद्यार्थ्यांचाही बयाण नोंदविणार आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाकडे आहाराच्या तपासणीचे नमुने पाठविले आहे. त्यांच्याकडून अद्यापही कोणत्याही प्रकारचा अहवाल आला नाही.

 बचतगटाला यापूर्वी दिल्या होत्या नोटीसया बचतगटाकडून पुरविण्यात येणाऱ्या आहारासंदर्भातील तक्रारी यापूर्वीच प्राप्त झाल्या होत्या. त्यावरून दोनदा कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली होती. पण गटाकडून सातत्याने निष्काळजीपणा होत असल्याने अखेर पोषण आहाराने विद्यार्थ्यांच्या आरोग्य बिघडले.

टॅग्स :food poisoningअन्नातून विषबाधाStudentविद्यार्थी