शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
2
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
3
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
4
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: ईश्वरपूरमध्ये जयंत पाटलांचा महायुतीला मोठा धक्का; एका क्लिकवर वाचा निकाल
6
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
7
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
8
Jawhar Nagar Parishad Election Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
9
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
10
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
12
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
13
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
14
इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
15
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
16
Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं?
17
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
18
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
19
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
20
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

चार वर्षात ४ लाख ३४ हजार कृषीपंप वीज जोडण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 22:42 IST

राज्य शासनाने नोव्हेंबर २०१४ ते आॅगस्ट २०१८ या काळात राज्यातील ४ लाख ३४ हजारापेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना वीज कनेक्शन देण्यात आले. या कनेक्शनपोटी ऊर्जा विभागाने शेतकऱ्यांसाठी ४ १८७ कोटी रुपये खर्च केले.

ठळक मुद्देशेतकऱ्यांसाठी ४ १८७ कोटी खर्च : मुख्यमंत्र्यांकडे झाले ऊर्जा विभागाचे सादरीकरण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्य शासनाने नोव्हेंबर २०१४ ते आॅगस्ट २०१८ या काळात राज्यातील ४ लाख ३४ हजारापेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना वीज कनेक्शन देण्यात आले. या कनेक्शनपोटी ऊर्जा विभागाने शेतकऱ्यांसाठी ४ १८७ कोटी रुपये खर्च केले.मुख्यमंत्री देवेंद्र्र फडणवीस यांच्यासमोर ऊर्जा विभागाने नुकतेच प्रमुख कामांचे सादरीकरण केले. या सादरीकरणासाठी राज्याचे ऊर्जामंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे व ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव अरविंद सिंग उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांनी ऊर्जा विभागाच्या कामाचे कौतुक केले. गडचिरोली, चंद्र्रपूर, ठाणे व रायगड या चार जिल्ह्यातील कृषीपंप वीज जोडणीचा अनुशेष याच सरकारने पूर्ण केला आहे. नोव्हेंबर २०१४-१५ मध्ये ६२ हजार ६५०, २०१५-१६ मध्ये १ लाख ३० हजार, २०१६-१७ मध्ये १ लाख २५ हजार, २०१७-१८ मध्ये ६६ हजार १७४ आणि २०१८ आॅगस्ट अखेरपर्यंत ४९ हजार ९५८ शेतकऱ्यांच्या कृषी पंपांना वीज कनेक्शन देण्यात आले. कृषी पंपांना यापुढे उच्च दाब वीज वितरण प्रणालीद्वारे वीज जोडणी देण्यासाठी नवीन योजना मे १८ मध्ये जाहीर करण्यात आली.वीजनिर्मिती क्षमतेत वाढगेल्या चार वर्षाच्या काळात महानिर्मिती कंपनीच्या वीजनिर्मिती क्षमतेत वाढ करण्यात आली. सन २०१४-१५ मध्ये ५० मेगावॅट वीजनिर्मितीचे सौर ऊर्जा प्रकल्प सुरू करण्यात आले. शिरसुफळ (बारामती) ३६.३३ मेगावॅट आणि १४ मेगावॅट सौर ऊर्जा प्रकल्प अनुक्रमे १९ डिसेंबर २०१४ आणि ३१ मार्च २०१५ ला कार्यान्वित झाले. सन २०१५-१६ मध्ये औष्णिक ऊर्जा प्रकल्प ६६० मेगावॅटचे कोराडी येथे १६ फेब्रुवारी २०१५ मध्ये कार्यान्वित झाला. सन २०१६-१७ मध्ये औष्णिक ऊर्जा प्रकल्प २५७० मेगावॅट, चंद्र्रपूर संच ८ (५०० मेगावॅट) ४ जून २०१६ रोजी, परळी संच क्रमांक ८ - २५० मेगावॅट १९ नोव्हेंबर २०१६ रोजी आणि कोराडी संच क्रमांक ९ - ६६० मेगावॅट २२ नोव्हेंबर २०१६ रोजी, चंद्र्रपूर येथे संच क्रमांक ९ (५०० मेगावॅट) २४ नोव्हेंबर २०१६ रोजी आणि कोराडी संच क्रमांक १० (६६०) मेगावॅट १७ जानेवारी २०१७ रोजी कार्यान्वित झाले.भारनियमनमुक्त महाराष्ट्रसन २०१४ ते २०१७ या कालावधीत वीजनिर्मिती क्षमतेमध्ये ३२८० मेगावॅट वाढ झाल्यामुळे राज्यात सर्व भागात अखंडित वीजपुरवठा करण्यात येत आहे. काही तांत्रिक बिघाडामुळे वीजपुरवठा खंडित राहू शकतो पण भारनियमन म्हणून कुठेही वीजपुरवठा खंडित होत नाही, अशी माहिती या सादरीकरणातून मुख्यमंत्र्यांना ऊर्जा विभागाने दिली. मार्च २०१७ अखेर राज्यातील ४१ हजार ९२८ गावांपैकी १११ गावे विद्युतीकरण करावयाची शिल्लक होती. यापैकी सर्व गावांचे विद्युतीकरण मार्च २०१८ अखेरपर्यंत पूर्ण करण्यात आले. केंद्र शासनाने आॅक्टोबर २०१७ मध्ये सौभाग्य योजना जाहीर केली. त्यावेळी राज्यात ७ लाख ५८ हजार ७३० इतक्या घरांना वीज जोडणे देणे शिल्लक होते. यापैकी ६ लाख ३५ हजार ४४९ घरांना वीज जोडणी देण्यात आली. १ लाख २३ हजार २८१ घरांना वीज जोडणी देणे शिल्लक असून ती डिसेंबर २०१८ पर्यंत देण्याचे ऊर्जा विभागाचे प्रयत्न आहेत.औद्योगिक ग्राहकांना वीज दरात सवलतविदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र व डी आणि डी प्लस क्षेत्रातील औद्योगिक ग्राहकांना १ एप्रिल २०१६ पासून वीज दरात सवलत देण्यात आहे. ३ लाख २० हजार ग्राहकांना सुमारे दोन हजार कोटींची सवलत देण्यात आली. दोन वर्षात १५ हजारावर नवीन औद्योगिक ग्राहक आले आहेत.मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनीमुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी या योजनेअंतर्गत कृषी फिडरद्वारे शेतकऱ्यांना दिवसा शाश्वत वीजपुरवठा सुरु करण्यात येत आहे. या योजनेंतर्गत राज्यात राळेगणसिध्दी (जि. अहमदनगर) व कोळंबी (जि. यवतमाळ) या ठिकाणी प्रत्येकी २ मेगावॅट क्षमतेचे पथदर्शी सौर ऊर्जा प्रकल्पांचे काम पूर्ण झाले. या प्रकल्पाचा फायदा १८११ आणि ६०५ कृषी ग्राहकांना होणार आहे. महानिर्मितीचे २०० मेगावॅटचे ४१ प्रकल्प डिसेंबर २०१८ पर्यंत, ३०० मेगावॅटचे ६७ प्रकल्प मार्च २०१९ पर्यंत, महावितरणचे ५०४ मेगावॅटचे प्रकल्प मार्च २०१९ पर्यंत पूर्ण होतील. महावितरणचे २३५ मेगावॅटचे प्रकल्प ३१ जानेवारी २०२० पर्यंत पूर्ण होणार आहे. या प्रकल्पांमधील वीज स्वस्त मिळणार असल्याने शासनाद्वारे देण्यात येणाऱ्या क्रास सबसिडीची बचत होणार आहे.

 

टॅग्स :agricultureशेतीelectricityवीज