शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
2
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
5
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
6
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
7
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
8
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
9
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
10
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
11
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
12
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
13
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
14
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
15
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
16
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
17
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
18
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ओशिवरामध्ये बोगस मतदान झाल्याची मनसे नेत्याची तक्रार
19
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
20
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप

विद्यापीठाने ‘त्या’ महाविद्यालयांवर काय कारवाई केली?

By निशांत वानखेडे | Published: September 05, 2023 4:45 PM

३८५ महाविद्यालयांचे अद्याप नॅक मूल्यांकन, पूनर्मूल्यांकन झालेच नाही

नागपूर : उच्च शिक्षणाची गुणवत्ता व दर्जा वाढविण्याच्या दृष्टीने सरकारने नॅक मूल्यांकन व पूनर्मूल्यांकन करणे बंधनकारक केले आहे. मात्र वेळोवेळी निर्देश देऊनही राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाशी संलग्नित ३८५ महाविद्यालयांनी अद्याप मूल्यांकन व पूनर्मूल्यांकन केलेले नाही. अशा महाविद्यालयांवर विद्यापीठाने काय कारवाई केली, हा प्रश्न अनुत्तरीत आहे.

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ च्या कलम १०९ नुसार महाविद्यालयांना नॅक मूल्यांकन अनिवार्य केले आहे. राज्याच्या प्रगतीसाठी महाविद्यालयांचा दर्जा सुधारणे व उच्च शिक्षणाच्या गुणवत्तेत वाढ करणे हा यामागे उद्देश आहे. केंद्र सरकारचे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाविद्यालयांनी त्यांच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करणे अपेक्षित आहे. या महाविद्यालयांचे शिक्षण जागतिक स्पर्धेत टिकावे, हाही यामागचा उद्देश आहे.

सरकारच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागातर्फे २ मार्च २०२३ च्या पत्रानुसार सर्व शासकीय, अशासकीय अनुदानित, विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित महाविद्यालयांना ३१ मार्च २०२३ पर्यंत नॅक मूल्यांकनाच्या नोंदणीची मुदत दिली होती. ज्यांचे एकदाही नॅक मूल्यांकन व मानांकन झाले नाही, ज्यांनी पूनर्मूल्यांकन केले नाही, अशा सर्वांना ही मुदत देण्यात आली होती. मात्र बहुतेक महाविद्यालयांनी मूल्यांकन केले नाही किंवा नोंदणीही केली नाही. त्यामुळे त्यात आणखी मुदतवाढ देत शैक्षणिक सत्र २०२३-२४ च्या प्रथम वर्ष प्रवेशाच्या प्रारंभ दिनांकापर्यंत मूल्यांकन व नोंदणीची संधी देण्यात आली होती. या दिनांकापर्यंत महाविद्यालयांना इन्स्टिट्यूशनल इन्फार्मेशन अॅण्ड क्वालिटी एसेसमेंट (आयआयक्युए) नॅक कार्यालयास सादर करणे बंधनकारक होते.

मात्र माहितीच्या अधिकारात मिळालेल्या मिळालेल्या माहितीनुसार नागपूर विद्यापीठाच्या जवळपास ५०७ महाविद्यालयांपैकी ३८५ महाविद्यालयांनी नॅक मूल्यांकन केले नसल्याची माहिती समोर येत आहे. यावरून शासनाच्या ध्येय धोरण व शिक्षणाच्या गुणवत्ता वाढीबाबत महाविद्यालये गंभीर नाहीत, असेच दिसून येत आहे. या महाविद्यालयांवर कारवाईबाबत विद्यापीठही गंभीर नसल्याचे दिसून येत आहे.

टॅग्स :Educationशिक्षणRashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठcollegeमहाविद्यालय