शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

वीज खंडित ३७,८३४ ग्राहकांची थकबाकीतून केली मुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2025 14:08 IST

Nagpur : कायमस्वरूपी कापलेल्या कनेक्शनसाठी अभय योजना ३१ मार्चपर्यंत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ज्या ग्राहकांचे वीज कनेक्शन कायमचे खंडित झाले होते, अशा ३७ हजार ८३४ वीज ग्राहकांना अभय योजनेचा लाभ घेऊन थकबाकीतून दिलासा मिळाला आहे. त्यापैकी सर्वाधिक १०,१९६ ग्राहक हे नागपूर जिल्ह्यातील आहेत. 

या योजनेचा कालावधी ३१ मार्च रोजी संपत आहे. याअंतर्गत ३१ मार्च २०१४ पूर्वी कायमस्वरूपी खंडित कनेक्शनची मूळ देय रक्कम भरल्यास व्याज आणि विलंब शुल्क माफ केले जात आहे. रिकनेक्शनदेखील घेता येईल. ३० टक्के मुद्दल भरल्यानंतर उर्वरित रक्कम ६ हप्त्यांमध्ये भरण्याची सुविधाही आहे. कमी दाबाच्या ग्राहकांना एकरकमी रक्कम भरणाऱ्यांना १० टक्के सवलत आणि उच्च दाबाच्या ग्राहकांना ५ टक्के सवलत दिली जात आहे. विदर्भाबाबत बोलायचे झाले तर आतापर्यंत ३७,८३४ ग्राहकांनी ४० कोटी ३३ लाख ८५ हजार रुपयांचा भरणा करून थकबाकीवरील व्याज आणि विलंब आकारात माफी मिळवीत थकबाकीतून मुक्तता मिळवली आहे. यात सर्वाधिक १०,१९६ ग्राहक नागपूर जिल्ह्यातील आहेत. त्याखालोखाल बुलढाणा जिल्ह्यातील ५,८९३ ग्राहक, गडचिरोली जिल्ह्यातील ३,९०२ ग्राहकांचा समावेश आहे. याशिवाय अकोला २,९२९, वाशिम २,८७२, यवतमाळ २,५८६, अमरावती २,४४४, गोंदिया २,१५३, चंद्रपूर २,००६, वर्धा १,९२६ आणि भंडारा ९२७ या जिल्ह्यातील ग्राहकांचा समावेश आहे.

१ एप्रिलपासून कडक कारवाईयेत्या १ एप्रिलपासून या योजनेचा लाभन घेणाऱ्या ग्राहकांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा महावितरणने दिला आहे. अशा सर्व थकबाकीदारांचे वीज कनेक्शन तपासले जाईल. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार जमीन खरेदी करणाऱ्याला वीज देय रक्कम भरणे बंधनकारक आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी कंपनीची वेबसाइट आणि मोबाईल अॅपचा वापर करता येईल, असे महावितरणने म्हटले आहे. 

टॅग्स :nagpurनागपूरelectricityवीज