शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात चार विमानांमधून आलेत ३७५ प्रवासी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2020 23:53 IST

दोन महिन्यानंतर सुरू झालेल्या घरगुती विमानसेवेंतर्गत देशाच्या विविध भागातून सोमवारी नागपूर विमानतळावर आलेल्या जवळपास ३७५ प्रवाशांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. सर्व प्रवाशांची थर्मल स्कॅनिंगने तपासणी करून हातावर २५ तारखेचे क्वारंटाईचे शिक्के लावण्यात आले.

ठळक मुद्देप्रतिज्ञापत्र भरून घेतले : सर्वांना केले होम क्वारंटाईन

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : दोन महिन्यानंतर सुरू झालेल्या घरगुती विमानसेवेंतर्गत देशाच्या विविध भागातून सोमवारी नागपूर विमानतळावर आलेल्या जवळपास ३७५ प्रवाशांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. सर्व प्रवाशांची थर्मल स्कॅनिंगने तपासणी करून हातावर २५ तारखेचे क्वारंटाईचे शिक्के लावण्यात आले. त्यामुळे नागपुरात आलेल्या प्रवाशांना १४ दिवस घरातच राहावे लागेल. नागपुरातून चार उड्डाणांद्वारे २२१ प्रवासी संबंधित ठिकाणी परतले. विमानात कुठलीही सीट रिक्त ठेवण्यात आली नव्हती, हे विशेष.एअर इंडियाचे दिल्लीहून एक विमान सकाळी ८.१० वाजता आणि इंडिगोची तीन विमाने बेंगळुरूहून सकाळी ९.५० वाजता, मुंबईहून १०.४० आणि दिल्लीहून सकाळी ११.४५ वाजता नागपुरात आली. २५ आणि २६ मे रोजी राज्यातून उड्डाणे होणार नाहीत, असे पश्चिम बंगाल सरकारने आधीच स्पष्ट केल्याने कोलकात्याहून सायंकाळी ७.२५ वाजता येणारे इंडिगोचे विमान रद्द  झाले. एअर इंडियाच्या विमानाने जवळपास ५५ प्रवासी आणि इंडिगोच्या तीन विमानाने ३२० प्रवासी आल्याची माहिती आहे. प्रवासी विमानतळावर उतरताच सर्वांची प्रशासनाने तैनात केलेल्या डॉक्टरांनी थर्मल स्कॅनिंग केली. प्रवाशांच्या सर्व सामानावर निर्जंतुकीकरण फवारणी करण्यात आली. यानंतर नियमाप्रमाणे सर्वांच्या हातावर क्वारंटाईनचे शिक्के लावले. काही प्रवाशांनी शिक्के मारण्यास मनाई केल्याने काहीकाळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. पण नियमानुसार शिक्के लावणे बंधनकारक असल्याचे सांगितल्यानंतर सर्वांनी होकार दिला. विमानाच्या उड्डाणापूर्वी संबंधित ठिकाणी प्रवाशांकडून प्रतिज्ञापत्र भरून घेतले. याशिवाय नागपुरातून उड्डाण करणाºया विमानातील प्रवाशांना प्रशाासनाने नागपुरात प्रतिज्ञापत्र भरून घेतले.एअर इंडियाच्या नागपूर विमानतळ व्यवस्थापिका प्रीती सावंत म्हणाल्या, एअर इंडियाच्या नियमानुसार सोमवारी विमान आले, पण मंगळवारी येणार नाही. त्यामुळे मंगळवारी अन्य कंपन्यांची विमाने नागपुरात येणार आहेत. कंपनीने प्रवाशांसाठी सर्व प्रकारच्या सोयीसुविधा केल्या आहेत. इंडिगो कंपनीने मास्क आणि चेहरा कव्हर करणारे प्लास्टिकचे आवरण प्रत्येक प्रवाशाला उपलब्ध करून दिले. शिवाय सॅनिटायझरची व्यवस्था केली होती. क्रू मेंबरने पीपीई किट परिधान केली होती.

क्वारंटाईन प्रवाशांकडून कोरोनाचा धोका कायमनागपुरात येणाऱ्या सर्व प्रवाशांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. या सर्व प्रवाशांचे मोबाईल क्रमांक आणि पत्ता प्रशासन व कंपन्यांकडे उपलब्ध आहेत. हे प्रवासी खरेच घरी आहेत का किंवा बाहेर फिरत तर नाही ना, याची शहानिशा करण्यात येणार आहे. त्यामुळे यंत्रणेवर ताण येणार आहे. प्रवाशांची शहानिशा होणार किंवा नाही, यावरही प्रश्नचिन्ह आहे. जर एखादा प्रवासी बाहेर फिरताना आढळल्यास त्याच्यावर कोणती कारवाई करणार, हे अद्याप स्पष्ट नाही. नागपुरात आलेल्या ३७५ प्रवाशांमध्ये काही प्रवासी पॉझिटिव्ह असल्यास त्यांच्या संसर्गाचा धोका इतर प्रवासी आणि नागरिकांना होण्याची भीती निर्माण झाली आहे. कदाचित या कारणाने राज्य शासनाने घरगुती विमान सेवेला प्रारंभी परवानगी नाकारली होती.

प्रवाशांच्या हातावर क्वारंटाईनचे शिक्केप्रशासनाच्या नियमानुसार विमानातून नागपुरात आलेल्या सर्व प्रवाशांच्या हातावर होम क्वारंटाईनचे शिक्के लावण्यात आले आहेत. या सर्व प्रवाशांना १४ दिवस घरातच राहावे लागेल. या सर्वाचे मोबाईल क्रमांक आणि घरांच्या पत्त्यांची प्रशासनाकडे नोंद आहे. चार विमानाने नागपुरात ३७५ प्रवासी आले तर याच विमानांनी २२१ प्रवासी देशाच्या विविध भागात गेले. मंगळवारी केवळ इंडिगोची विमाने येणार आहेत.- मो. आबिद रुही, वरिष्ठ विमानतळ संचालक, मिहान इंडिया लिमिटेड.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar International Airportडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूरpassengerप्रवासीcorona virusकोरोना वायरस बातम्या