शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
2
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
3
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
4
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
5
सोड्याचीच 'हवा', पेप्सी-कोला 'फुस्स'! तब्बल १५०० कोटींची सोडा विक्री, 'या' ब्रँडने बाजी मारली!
6
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
7
Chaitra Amavasya 2025: चैत्र अमावस्येपासून दर अमावास्येला सुरू करा अग्निहोत्र; होतील अपार लाभ!
8
देशातील पहिला टेस्ला सायबर ट्रक गुजरातमध्ये पोहोचला, सुरतच्या हीरा व्यापाऱ्याची मोठी खरेदी, कोण आहे ती व्यक्ती?
9
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
10
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
11
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
12
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
13
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
14
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
15
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
16
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
17
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
18
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
19
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
20
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या

देशातील ३७ टक्के शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात, विदर्भात २०२२ मध्ये सुमारे हजार आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2022 15:00 IST

शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी विविध प्रयत्न करण्यात येत असल्याचे दावे प्रशासनातर्फे करण्यात येत असले तरी प्रत्यक्षात ही प्रकरणे कायम आहे.

नागपूर :

शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी विविध प्रयत्न करण्यात येत असल्याचे दावे प्रशासनातर्फे करण्यात येत असले तरी प्रत्यक्षात ही प्रकरणे कायम आहे. २०२१ साली देशातील एकूण शेतकरी आत्महत्यांपैकी ३७ टक्के घटना या महाराष्ट्र राज्यातील होत्या. सरासरी प्रत्येक तीन आत्महत्यांमागे एक आत्महत्या राज्यात झाली होती. राज्य शासनाच्याच आकडेवारीतून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.

विधानपरिषदेत डॉ.सुधीर तांबे, राजेश राठोड, अभिजीत वंजारी, अनिल परब इत्यादी सदस्यांनी यासंदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या उत्तरानुसार, २०२१ साली देशभरात १० हजार ८८१ शेतकरी व शेतमजुरांनी आत्महत्या केल्या. त्यातील ४ हजार ६४ आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या होत्या. यात २ हजार ६४० शेतकरी व १ हजार ४२४ शेतमजूर होते. अगदी हिवाळी अधिवेशनाअगोदर म्हणजे सप्टेंबर व ऑक्टोबर या दोन महिन्यांत ४९६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली.

नागपूर, अमरावती, यवतमाळमध्ये दाहकता कायम

सरकारच्या आकडेवारीनुसार नागपूर व अमरावती विभागात शेतकरी आत्महत्यांची दाहकता काम आहे. फेब्रुवारी ते सप्टेंबर २०२२ या कालावधीत विदर्भात ९९१ आत्महत्यांची प्रकरणे समोर आली. यापैकी अमरावती विभागात ७४९ व नागपूर विभागात २४२ प्रकरणे होती. एकट्या यवतमाळ जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात ३१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली.