शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंसोबत रात्री बैठक, सकाळी पत्रकार परिषद; महायुतीबाबत रवींद्र चव्हाणांचं मोठं विधान
2
मुंबई पागडीमुक्त हाेणार, इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; स्वतंत्र नियमावली करण्याची शिंदे यांची घोषणा
3
परदेशी लोकांच्या हातात जाणार का सरकारी IDBI बँक? कॅनडाची दिग्गज कंपनीही खरेदीसाठी रेसमध्ये
4
लुथरा बंधूंना पोलिसांनी पकडलं, पण थायलंडमधून भारतात आणण्यास आणखी उशीर होणार! कारण काय?
5
NPS, UPS आणि अटल पेन्शनच्या नियमांमध्ये मोठा बदल; कोणाला होणार किती फायदा?
6
Leopard Spotted in Pune Airport: अखेर सापडला! पुणे विमानतळ परिसरात लपलेला बिबट्या ७ महिन्यांनी अडकला पिंजऱ्यात
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांचं निधन 
8
आजचे राशीभविष्य, १२ डिसेंबर २०२५: सही करताना काळजी घ्या, जमीन-संपत्तीच्या प्रकरणात फसवणूक होण्याची शक्यता
9
चिथावणीमुळे मारहाणीचे आराेप राज यांना अमान्य; ठाणे सत्र न्यायालयात हजर; महिनाभरात खटल्याच्या निकालाचे संकेत
10
लोकसभेत तृणमूल खासदाराने ओढली ई-सिगारेट; भाजपचा आराेप; संसदेची प्रतिष्ठा कमी केल्याचा दावा
11
न संपणारा घोळ ! पाच दिवस विलंबाने म्हणजे १५ डिसेंबर रोजी मतदारयाद्या प्रसिद्ध होतील
12
गाेवा आग : लुथरा बंधू थायलंडमध्ये ताब्यात, लवकरच गोव्यात आणणार; दोघांचेही पासपोर्ट रद्द
13
मुंबईकरांना ओसी ‘गिफ्ट’, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांनी विधानसभेत केली सुधारित भोगवटा अभय योजनेची घोषणा
14
‘बिग डी’, ‘बिग ई’... अन् महायुतीचा पिक्चर ! एकाचवेळी दोघांना एकाच खिडकीजवळची जागा कशी देता येईल?
15
राज्यातील १७ शहरे महाबळेश्वरपेक्षाही थंड; मुंबईचे किमान तापमान १५, तर माथेरानचे किमान तापमान १७ अंश नोंदविण्यात आले
16
इंडिगोकडून प्रवाशांची बोळवण; देणार १० हजारांचे ट्रॅव्हल व्हाउचर; ३ ते ५ डिसेंबरदरम्यान फटका बसलेल्यांनाच मिळेल भरपाई
17
ईडी-एटीएसची राज्यात ४० ठिकाणी छापेमारी; दहशतवाद्यांना पैसा पुरवल्याचे प्रकरण
18
वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप भोसले यांचे निधन; पोलीस दलात शोककळा पसरली
19
IND vs SA : टॉस जिंकून फसलो! थेट शुभमन गिलचं नाव घेत सूर्या म्हणाला, तो पहिल्याच बॉलवर आउट झाला अन्...
20
PM मोदींची डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवरून सखोल चर्चा, 'या' ३ गोष्टींसाठी एकत्र काम करणार
Daily Top 2Weekly Top 5

देशातील ३७ टक्के शेतकरी आत्महत्या महाराष्ट्रात, विदर्भात २०२२ मध्ये सुमारे हजार आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2022 15:00 IST

शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी विविध प्रयत्न करण्यात येत असल्याचे दावे प्रशासनातर्फे करण्यात येत असले तरी प्रत्यक्षात ही प्रकरणे कायम आहे.

नागपूर :

शेतकरी आत्महत्या थांबविण्यासाठी विविध प्रयत्न करण्यात येत असल्याचे दावे प्रशासनातर्फे करण्यात येत असले तरी प्रत्यक्षात ही प्रकरणे कायम आहे. २०२१ साली देशातील एकूण शेतकरी आत्महत्यांपैकी ३७ टक्के घटना या महाराष्ट्र राज्यातील होत्या. सरासरी प्रत्येक तीन आत्महत्यांमागे एक आत्महत्या राज्यात झाली होती. राज्य शासनाच्याच आकडेवारीतून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.

विधानपरिषदेत डॉ.सुधीर तांबे, राजेश राठोड, अभिजीत वंजारी, अनिल परब इत्यादी सदस्यांनी यासंदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या उत्तरानुसार, २०२१ साली देशभरात १० हजार ८८१ शेतकरी व शेतमजुरांनी आत्महत्या केल्या. त्यातील ४ हजार ६४ आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या होत्या. यात २ हजार ६४० शेतकरी व १ हजार ४२४ शेतमजूर होते. अगदी हिवाळी अधिवेशनाअगोदर म्हणजे सप्टेंबर व ऑक्टोबर या दोन महिन्यांत ४९६ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली.

नागपूर, अमरावती, यवतमाळमध्ये दाहकता कायम

सरकारच्या आकडेवारीनुसार नागपूर व अमरावती विभागात शेतकरी आत्महत्यांची दाहकता काम आहे. फेब्रुवारी ते सप्टेंबर २०२२ या कालावधीत विदर्भात ९९१ आत्महत्यांची प्रकरणे समोर आली. यापैकी अमरावती विभागात ७४९ व नागपूर विभागात २४२ प्रकरणे होती. एकट्या यवतमाळ जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात ३१ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली.