शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनले जोहरान ममदानी, ट्रम्प यांच्या धमक्यांनंतरही मोठा विजय!
3
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
4
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
5
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
6
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
7
“६ महिन्यात ४८ लाख मतदार वाढ, डबल स्टार नाही, डबल मतदारांची यादी हवी”; शरद पवार गटाची मागणी
8
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
9
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
10
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
11
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
12
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
13
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
14
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
15
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
16
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
17
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
18
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
19
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
20
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू

ई-पॉस मशीनमुळे ३.६४ मेट्रिक टन धान्याची बचत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2019 20:26 IST

सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत करण्यात येणारे धान्य वितरण हा सर्वसामान्य नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. धान्य वितरण योग्य लाभार्थ्यांनाच व्हावी, यासाठी सर्व रास्त भाव दुकानांमध्ये ई-पॉस मशीन बसविण्यात आली आहे. या ई-पॉसमुळे लाभार्थ्यांची बायोमेट्रिक ओळख पटवून शिधावस्तूंचे वाटप करण्यात येत आहे. ई-पॉस मशीनद्वारे धान्य वितरणामुळे ३.६४ मेट्रिक टनाहून अधिक धान्याची बचत झाली आहे.

लोकमत  न्यूज  नेटवर्क  नागपूर : सार्वजनिक वितरण प्रणालीअंतर्गत करण्यात येणारे धान्य वितरण हा सर्वसामान्य नागरिकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न आहे. धान्य वितरण योग्य लाभार्थ्यांनाच व्हावी, यासाठी सर्व रास्त भाव दुकानांमध्ये ई-पॉस मशीन बसविण्यात आली आहे. या ई-पॉसमुळे लाभार्थ्यांची बायोमेट्रिक ओळख पटवून शिधावस्तूंचे वाटप करण्यात येत आहे. ई-पॉस मशीनद्वारे धान्य वितरणामुळे ३.६४ मेट्रिक टनाहून अधिक धान्याची बचत झाली आहे.सार्वजनिक वितरण व्यवस्था गतिमान, पारदर्शक आणि लोकाभिमुख करण्यावर राज्य शासनाने भर दिला आहे. ई-पॉस मशीनद्वारे केरोसीनचे सुद्धा वाटप केले जात आहे. त्यामुळे सुमारे ६० टक्क्यांपर्यंत केरोसीनची बचत झाली आहे. दरमहा सव्वाकोटी कुटुंब आधार प्रमाणिकरण करून धान्य उचल करीत असल्यामुळे विक्री व्यवहार पारदर्शक झाले आहेत. या प्रणालीमुळे लाभार्थ्यांना राज्यातील कोणत्याही धान्य दुकानातून धान्य घेण्याची सुविधा पोर्टबिलिटीमुळे शक्य झाली आहे. ई-पॉस मशीनवरील विक्री व्यवहार mahafood.gov.in संकेतस्थळावर जनतेसाठी उपलब्ध असल्याने, विभागाच्या कामकाजात पारदर्शकता येण्यास मदत झाली असल्याची माहिती अन्न व नागरी पुरवठा मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली.ई-पॉसमुळे काळाबाजार रोखण्यास मदत होण्याबरोबरच रेशन दुकानदारांना उत्पन्नवाढीसाठी प्रोत्साहन मिळाले आहे. सर्व शिधापत्रिका या आधार कार्डशी जोडण्यात आल्यामुळे, पात्र लाभार्थ्यांंना नियमित धान्य मिळू लागले आहे. जून २०१७ पासून सर्व रास्त भाव दुकानांतून ई-पॉस मशीनद्वारे धान्य वितरण केले जात असून, १ मे २०१८ पासून आधार प्रमाणिकरण करूनच धान्य वितरण केले जात असल्याचे यावेळी अन्न व नागरी पुरवठा विभागाचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी सांगितले.

टॅग्स :foodअन्नnagpurनागपूर