शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
2
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
3
जीएसटी नंतर MRP वर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; सामान्यांच्या थेट खिशावर परिणाम होणार...
4
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
5
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
6
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
7
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
8
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
9
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
10
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
11
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
12
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
13
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
14
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
15
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
16
"तरीही त्याला कुत्रा चावतो.."; पाकिस्तानी सलामीवीर सॅम अयुबबाबत नेमकं काय बोलला माजी खेळाडू?
17
वसईत ट्रॅफिकमुळे गेला २ वर्षाच्या मुलाचा बळी; मुंबई अहमदाबाद महामार्गावर पाच तास अडकून होती रुग्णवाहिका
18
पितृपक्ष २०२५: चतुर्दशी श्राद्धाला असते विशेष महत्त्व, पण असे का? पाहा, काही मान्यता
19
टॉस पूर्वीची ती चार मिनिटे...! भारत सरकारची मंजुरी अन् BCCIचा मॅच रेफरींना संदेश पोहोचला...
20
'या अली' गाण्यामागचा आवाज हरपला, प्रसिद्ध गायक जुबीनचा स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू

रस्ते दुरुस्तीसाठी गरज ३६४ कोटींची; मिळाले केवळ ५ कोटी 

By गणेश हुड | Updated: July 17, 2023 15:21 IST

जि.प.चे पदाधिकारी म्हणतात देताच कशाला तेही परत घ्या !

नागपूर : मागील वर्षात अतिवृष्टी  व पुरामुळेजिल्हयातील रस्ते व पुलांचे प्रचंड नुकसान झाले. त्याआधीच्या दोन-तीन वर्षातही अशीच परिस्थिती होती. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात तब्बल २ हजार किलोमीटरलर लांबीच्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी ३६४ कोटींची गरज आहे. जिल्हा नियोजन समितीकडे २०२३-२४ या वर्षात ३०/५४ शीर्षकात ५० कोटींचा निधी मिळावा असा प्रस्ताव पाठविला आहे. परंतु जिल्हा परिषदेतला फक्त ५ कोटी मिळाले. ही ग्रामीण भागातील लोकांची थट्टा असल्याने हाही निधी शासनाने परत घ्यावा, अशी भूमिका जिल्हा परिषदेतील पदाधिकाऱ्यांनी घेतली आहे.

ग्रामीण भागातील कमीत कमी २ हजार किलोमीटर रस्त्याचे बांधकाम व दुरुस्ती तसेच पुलाचे बांधकाम व दुरुस्ती करायची आहे .मागील वर्षात जुलै व ऑगस्ट महिन्यात महिन्यांत अनेकदा अतिवृष्टी झाली. यामुळे नदी, नाल्यांना पूर आले. जिल्ह्यात १ लाख १४ हजार हेक्टरमधील शेतीपिकांचे नुकसान झाले. त्याचप्रमाणे अनेकांचे जीवही गेले. जनावरेही वाहून गेली. तर काहींचा वीज पडून मृत्यू झाला. पावसामुळे ग्रामीण भागातील रस्त्यांचेही नुकसान झाले.

जिल्‍हा परिषद अंतर्गत ४ हजार किमींपेक्षा अधिकचे रस्ते येतात. यातील एक हजार  किमींचे रस्ते खराब झाले आहेत.  रस्ते खराब झाल्याने ग्रामीण भागातील नागरिकांना ये-जा करण्यास मोठी अडचण होत आहे. जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या प्रमुख व अंतर्गत रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी ३६४ कोटींची गरज आहे. रस्ते दुरुस्तीचा  दरवर्षी प्रस्ताव जिल्हा परिषदेकडून शासनाकडे पाठविला जातो. मात्र निधी मिळत नाही. 

५ कोटीही परत घ्या

दरवर्षी अतिवृष्टीमुळे रस्त्यांचे नुकसान होत आहे. परंतु शासनाकडून निधीच मिळत नाही. २०१६ ते १०२१ काळात रस्ते दुरुस्तीसाठी ३६४ कोटींच्या मागणीचे प्रस्ताव शासन स्तरावर पाठविण्यात आले. परंतु एकही रुपया शासनाकडून देण्यात आला नाही. परिषद बांधकाम विभागाच्या सभापतींना व जिल्हा परिषद च्या उपाध्यक्ष कुंदा राऊत यांना पडला प्रश्न पडला की या  ५ कोटी मध्ये पैसे द्यायचे तरी कोणाला. त्यामुळे हा निधी शासनाने परत घ्यावा. 

- कुंदा राऊत, उपाध्यक्ष, जि.प.

टॅग्स :zpजिल्हा परिषदroad safetyरस्ते सुरक्षाnagpurनागपूर